Share

भारताने किती विमाने गमावली आणि पाकिस्तानला हल्ल्याची माहिती का दिली? – राहुल गांधी

Rahul Gandhi questions Modi government over Operation Sindoor: How many jets did India lose and why was Pakistan informed in advance?

Published On: 

Atul Londhe Clarifies Rahul Gandhi tweet on Chhatrapati Shivaji Maharaj

🕒 1 min read

नवी दिल्ली | ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या विधानाचा संदर्भ देत सरकारला थेट सवाल केला की, भारताने किती विमाने गमावली? आणि हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती का देण्यात आली?

राहुल गांधींनी एक व्हिडिओ शेअर करत एक्स (Twitter) वरून सरकारला प्रश्न विचारले. त्यांनी म्हटले, “आपल्या हल्ल्याच्या आधी पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीच याची कबुली दिली आहे. हे कोणी अधिकृत केलं? यामुळे आपल्या वायुदलाचे किती नुकसान झाले?”

Rahul Gandhi Questions Govt on Operation Sindoor

त्या व्हिडिओमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणतात, “ऑपरेशनच्या सुरुवातीला आम्ही पाकिस्तानला कळवलं की आम्ही फक्त दहशतवादी तळांवर हल्ला करत आहोत, लष्करावर नाही.” यावरून राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, 7 मे रोजी लष्कराने 9 दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची माहिती दिली होती. यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली, भींबर, सियालकोट आणि बहावलपूर येथील लाँचपॅड, प्रशिक्षण केंद्रे, आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या गटांचे मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचे सांगण्यात आले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही