🕒 1 min read
मुंबई, प्रतिनिधी: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार गट यांच्यातील संभाव्य विलिनीकरणावर खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांना संभाव्य ‘केंद्रीय मंत्री’ पदाची भीती असल्यामुळे हे विलिनीकरण होणार नाही,” असा थेट आरोप राऊतांनी केला आहे.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “अजित पवार गट एकीकडे म्हणतो की शरद पवार हेच आमचे नेते आहेत, आम्हीच मूळ पक्ष आहोत. पण जेव्हा एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा पावले मागे घेतात. तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी स्वतःचा फायदा बघून विलिनीकरण रोखलं आहे. याचा अर्थ ‘मोदींच्या मुख्य दुकानासोबत’ आपले राजकारण चालवायचे आहे.”
Sanjay Raut says Sunil Tatkare won’t allow NCP faction merger
राऊत यांनी प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांनाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, “प्रफुल पटेल महान नेते नाहीत आणि तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण विलिनीकरण झाल्यास त्यांच्या पदांवर गदा येईल. म्हणूनच हे विलिनीकरण थांबवले जात आहे.”
तसेच राऊत यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये संपर्काचा अभाव असल्याचं सांगितलं. “फडणवीस, शिंदे आणि अजित पवार एकत्र नाहीत. शिंदे एका बेटावर, अजित पवार दुसऱ्या टोकाला आणि फडणवीस वेगळ्याच दिशेने आहेत. हा संवाद कोमात गेला आहे,” अशी जहाल टीका राऊतांनी केली.
तसेच महिला आयोगाच्या नियुक्त्यांवरही त्यांनी भाष्य करत, “महिला आयोगावर राजकीय नेत्यांच्या जवळच्या महिलांना नोकऱ्या दिल्या जातात. पण हे आयोग अराजकीय असावेत,” असं मत मांडलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान!
- जयंत पाटील अडचणीत? पक्षातील युवा आमदारांनी शरद पवारांकडे दाखवली नाराजी!
- घटस्फोटाच्या आदल्या रात्री काय घडलं? मलायका अरोराचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












