🕒 1 min read
Manoj Jarange vs MNS Raj Thackeray | राज ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नसल्याचे व्यक्तव्य केले होते. यावर मनोज जरांगे यांनी ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे का? याचा विचार राज ठाकरेंनी करायला पाहिजे. जे त्यांना वैभव मिळाले ते गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालेले. श्रीमंताला आरक्षणाची किंमत नाही. Raj Thackeray यांनी या गोरगरीब जनतेची भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग ठरवा मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे का नाही?
विद्यार्थ्यांना विचारा आरक्षण ची गरज आहे का ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा. प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही. तुमचे विचार लादू नका, असे आवाहन त्यांनी राज ठाकरे यांना जरागेंनी केले.
Manoj Jarange vs MNS Raj Thackeray
राज्यात कुठे पण मराठा समाजाचे आंदोलन सुरू नाही. कुणाला ही अडवू नका. कुणाला जाब विचारू नका. विनाकारण गालबोट लावायचा प्रयत्न करु नका. देवेंद्र फडणवीस यांनी असे आंदोलन करण्यासाठी षडयंत्र चालवले आहे.
देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी वेगवेगळ्या टोळ्या तयार केल्याचा आरोप जरागेंनी केला. मराठा आंदोलनाविरोधात सर्वात अगोदर येवल्याचा मुकादमाला ( Chhagan Bhujbal ) कामाला लावले, त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्यामार्फत काही जणांमध्ये फूट पाडली. आता नारायण राणे यांच्या आडून आंदोलन सुरू केल्याचा आरोप Jarange Patil यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राच्या भल्यासाठी आयाराम-गयाराम चे असंवैधानिक सरकार घालवून मविआचे सरकार आणा
- महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा-आरएसएसचा कंट्रोल, एकनाथ शिंदे फक्त मुखवटा
- सुप्रिया सुळेंच्या हॅक फोनमध्ये लपलंय काय? हॅकरला सुळेंची विनंती तर अजित पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












