🕒 1 min read
पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Govt) घेतला आहे.
18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून पडून केतन अग्रवाल (Ketal Agrawal) यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांच्या तपासानुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) यांनी कट रचून केतनला लोहगडावर नेले आणि दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालय स्थापन करण्यास तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. विधी व न्याय विभागाला याबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी साहिल गोयल याला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, साहिल गोयलला तपासाशी संबंधित प्रश्न विचारण्यात येत असून कागदोपत्री पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. अग्रवाल कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांच्या दिशेनेही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर केतन अग्रवाल प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. पुढील न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “राज्यसभा नाही, आता लोकसभेची तयारी”; नवनीत राणा अॅक्शन मोडवर!
- Ketan Agrawal Death Case: सियाला लग्न का करायचं नव्हतं? तपासात धक्कादायक कारण समोर
- मोठी बातमी: केंद्रात ‘मोठा बदल’ होणार? महाराष्ट्रातील दोन खासदारांना संधी मिळण्याची शक्यता!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












