Share

सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही – जावेद अख्तर

Javed Akhtar expressed deep gratitude to Mumbai and Maharashtra, saying he can never repay the debt of this land.

Published On: 

At a recent event, Javed Akhtar praised Sanjay Raut as a fearless player like a T20 batsman. He also expressed deep gratitude to Mumbai and Maharashtra, saying he can never repay the debt of this land.

🕒 1 min read

मुंबई | खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर ( Javed Akhtar ) यांनी राऊत यांचं भरभरून कौतुक केलं. ते म्हणाले, “संजय राऊत हे टी-20 क्रिकेटसारखे खेळाडू आहेत. ते फक्त चौकार आणि षटकारच मारतात. घाबरत नाहीत आणि चेंडू थेट स्टेडियमबाहेर टोलवतात.” ते पुढे म्हणाले, “माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि ते लोकशाहीत अत्यंत गरजेचे असणारे निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे.”

Javed Akhtar expresses deep gratitude to Mumbai

“मी जे काही मिळवलं ते मुंबई आणि महाराष्ट्रामुळे मिळालं. सात जन्मातही मुंबईचं ऋण फेडू शकणार नाही. गेल्या ३० वर्षांत मला चार वेळा पोलीस संरक्षण मिळालं. त्यापैकी तीन वेळा धर्मांध लोकांकडून धमक्या मिळाल्या होत्या. पण मुंबई पोलिसांनी मला सुरक्षित ठेवलं.”

जावेद अख्तर यांनी सांगितले की, “पूर्वी ए. एन. रॉय पोलीस आयुक्त होते. त्यांनी मला वेळच्या वेळी मदत केली. म्हणूनच ही मुंबई माझ्या हृदयात आहे आणि राहील.”

जावेद अख्तर यांनी त्यांच्या सोशल मिडिया अनुभवाबाबतही बोलताना म्हटले, “काही लोक माझ्यावर शिव्या देतात, तर काही कौतुक करतात. काही मला काफीर म्हणतात तर काही जिहादी, काहींनी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. पण जर मला पाकिस्तान आणि नरक यात निवड करायची असेल तर मी नरकात जाणे पसंत करेन,” अशी थेट प्रतिक्रिया दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही