Share

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या

Supreme Court directs Maharashtra government to hold local body elections within four months. Court emphasizes the importance of timely elections for democratic representation.

Published On: 

Supreme Court directs Maharashtra government to hold local body elections within four months. Court emphasizes the importance of timely election for democratic representation.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने सांगितले आहे की, राज्य सरकारने चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर, 1994 ते 2022 पर्यंतच्या स्थितीचा आधार घेत निवडणुका घेतल्या जातील, असे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी स्पष्ट केले.

कोविड-19 महामारीमुळे मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, आणि याव्यतिरिक्त राज्याच्या काही भागांमध्ये प्रशासकांची नियुक्ती केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या स्थितीवर टीका करत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आणखी विलंब होऊ न देण्याचा निर्णय घेतला.

Supreme Court Orders Maharashtra to Hold Local Body Elections Within Four Months

वकील देवदत्त पालोदकर यांनी सांगितले की, राज्यात 5 वर्षांहून अधिक काळ प्रशासकांची नेमणूक होऊ नये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकप्रतिनिधीच करावेत, अशी राज्यघटनेतील तरतूद आहे. यामुळे राज्य सरकारला आगामी निवडणुकीचे आयोजन करण्यास भाग पाडले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे, आणि सत्ताधारी पक्ष या निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी रणनिती आखत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही