🕒 1 min read
Manoj Jarange । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या अपहरणानंतर हत्येच्या घटनेने राज्यात खळबळ उडवली आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरीही आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून, न्याय मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) पाटील यांनी मस्साजोगला भेट देऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सरकारला इशारा दिला की, “उपोषण करणाऱ्यांच्या जीवाला काही झाले तर जबाबदार सरकार असेल. गावकऱ्यांवर ही जबाबदारी टाकता येणार नाही. सरकारने लोकशाहीचा गळा घोटू नये. हत्या झाली असूनही मुख्य आरोपी फरार आहे, मग कोणावर कारवाई केली?”
Manoj Jarange again warned Devendra Fadnavis gov
जरांगे पाटील यांनी सरकारच्या आश्वासनांवरही टीका करत म्हटले, “सरकारने योग्य वेळी कारवाई केली असती, तर आज हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. देशमुख कुटुंबाला न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय, ही लाजिरवाणी बाब आहे.”
तुम्ही 144 लावा नाहीतर 145 लावा, तुमच्या हातात सत्ता आल्यावर तुम्ही लोकशाही मारून टाकली का? तुम्ही म्हणता एकालाही सोडणार नाही, तुम्ही नेमकं कोणाला धरलं? ते आधी आम्हाला सांगा, जे अटक झाले आहेत , ते स्वत:हून आले आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
याचबरोबर, त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जर मुख्यमंत्री दिलेली वचने पाळत असतील, तर बीड जिल्ह्याचा मोठा भाग आज जलसंपन्न असता. सरकारच्या हलगर्जीपणामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतोय,” असे ते म्हणाले.
देशमुख कुटुंबाच्या उपोषणामुळे आणि ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. न्यायाची मागणी अधिक तीव्र होत असून, सरकारवर तातडीने कारवाईचा दबाव वाढत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chhava : ‘छावा’ची स्क्रिप्ट ऐकून Vicky Kaushal भावूक झाला, अन् हात जोडले…
- IND vs PAK मॅचवेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा…भारतविरोधी घोषणा दिल्याने दुकानावर थेट बुलडोझर
- Santosh Deshmukh हत्येला 77 दिवस पूर्ण, ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












