Tuesday - 26th September 2023 - 8:29 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Uddhav Thackeray | बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी…दोन वांझ भाषणे; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis is currently in the company of adulterers - Samana Editorial

by Mayuri Deshmukh
15 July 2023
Reading Time: 1 min read
Thackeray group criticize eknath shinde and Devendra fadnavis on current political situation through samana editorial

अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरी नंतर राज्यातील राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहे.

Share on FacebookShare on Twitter

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीवर आजच्या सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटना पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या व्यभिचार करणाऱ्यांच्या संगतीत आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला एकेकाळी महाराष्ट्रात वजन होते. त्यांचे बोलणे काही प्रमाणात गांभीर्याने घेतले जात होते. त्यांचे चित तेव्हा स्थिर होते. मनही शांत होते, पण 2019 सालापासून त्यांची मनशांती, संयम वगैरे साफ ढळला आहे, असही या अग्रलेखात (Uddhav Thackeray) म्हटलं आहे.

Read Samana Editorial

आयुष्यभर ज्या संस्थेत, ज्या नेत्यांबरोबर राहिलो तिला क्षणात सोडणे हा व्यभिचार आहे, पण अशा व्यभिचान्यांची मोट बांधून त्यास कूटनीती, बेरजेचे राजकारण वगैरे मुलामा देणे हे राजकारण नसून एक राष्ट्रीय संकट आहे. देवेंद्र फडणवीस आता याच कूटनीती आणि धर्म अधर्माची भाषा करू लागले आहेत. पण ते व्यभिचार करणाऱ्यांच्या संगतीत आहेत.

तिकडे मुख्यमंत्री शिंदही आपल्या मिथ्या कार्यकर्त्यांना म्हणाले, राष्ट्रवादीचे सोबत येणे हे बेरजेचे राजकारण आहे. माणसाला गजकर्ण झाले की अशा बेरजा सुचतात. ‘थुकलेले चाटणे’ असा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. बेरजेचे राजकारण वगैरे वल्गना करणाऱ्यांनी त्याचा अर्थ समजून घ्यावा.

देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला एकेकाळी महाराष्ट्रात वजन होते. त्यांचे बोलणे काही प्रमाणात गांभीर्याने घेतले जात होते. त्यांचे चित तेव्हा स्थिर होते. मनही शांत होते, पण 2019 सालापासून त्यांची मनशांती, संयम वगैरे साफ ढळला आहे. ठाणे जिल्ह्यात काल दोन भाषणे झाली.

दोन्ही भाषणांत ढोंग व खोटेपणाचा ‘कूट’ होता. त्यातील एक भाषण श्री. फडणवीस यांचे होते. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले की, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसशी म्हणजे अजित पवार गटाशी झालेली युती ही कूटनीती आहे. अधर्म नव्हे भगवान श्रीकृष्णासारखी कूटनीती राजकारणात वापरावी लागते, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांना झाले आहे तरी काय? मुख्यमंत्री मधे यांच्या संगतीत आल्यापासून त्यांनी सत्य व नीतिमत्तेची कास सोडली आहे. त्यांना जुने काही आठवत नाही असेच एकंदरीत दिसत आहे. इकडे फडणवीस कार्यकर्त्यांसमोर बोलले.

त्याच वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मिध्या कार्यकत्यांसमोर भाषण केले व सांगितले, ‘राष्ट्रवादीबरोबर सत्तेत सहभागी झालो हे आपले बेरजेचे राजकारण आहे शिंदे- फडणवीस या जोडीचे डोके ठिकाणावर नाही व दोघांना ठाण्यातल्या मानसोपचार इस्पितळातील उपचाराची गरज आहे.

फडणवीस हे अलीकडे वारंवार दुतोंडीपणा करीत आहेत. राजकारणात कोणताच पक्ष हा कायमचा अस्पृश्य नसतो असे म्हणतात. पण एकवेळ मी अविवाहित राहीन, पण राष्ट्रवादीशी कदापि युती करणार नाही, हा ‘ठेका’ फडणवीस यांनी अलीकडेच धरला होता. आज त्याच

राष्ट्रवादीसोबत

त्यांनी फेर धरला आहे. तेही ठीक आहे, पण त्यांनी कूटनीती म्हणून राष्ट्रवादीशी युती केली व त्यासाठी भगवान श्रीकृष्णाची साक्ष काढली हे अतिच झाले. मग हीच कूटनीती 2019 साली शिवसेनेने केली तेव्हा आजचे हे दुतोंडी साप का जहर ओकत होते?

तुम्ही करता ती कूटनीती व दुसयांनी केली की ती अनीती, हे कसले धोरणर अजित पवार भुजबळ, हसन मुश्रीफ वगैरे लोकांना चक्की पिसायला लावण्याची भाषा तुम्हीच केली. मग आता श्रीकृष्णाने तुमच्या हाती असे कोणते सुदर्शन चक्र दिले, की त्यांचे सर्व गुन्हे माफ करून ‘धर्म म्हणून तुम्ही त्यांना सत्तेत सहभागी केले?

श्रीकृष्णाने कौरवांना राज्य मिळू नये यासाठी कूटनीती आखली. देवेंद्र वगैरेंनी महाराष्ट्रात कौरवांचेच राज्य आणले व त्यास ते कूटनीती म्हणत आहेत. हा भगवान श्रीकृष्णांनाच खोटे ठरविण्याचा प्रकार आहे. भाजपवाले इतिहास बदलायला निघाले आहेत. पण इथे तर रामायण, महाभारतही बदलत आहेत.

शिंदे, भुजबळ, अजित पवार वगैरे लोकांना कोणतीही तात्त्विक विचारप्रणाली नाही. आपले गुन्हे धुण्यासाठी आर्थिक साम्राज्य टिकविण्यासाठी सत्तेच्या प्रवाहात राहायचे हा काही मौलिक विचार होत नाही.

ती सत्तेपुढे शरणागती ठरते. पण ही शरणागती भुजबळ, शिंदे पवारांनी पत्करली असे म्हणण्यापेक्षा संघाच्या शिलेदारांनी स्वीकारली. महाराष्ट्रात त्यांनी आजपर्यंत जे कमावले ते सर्व कवडीमोल ठरले.

आपले गुन्हे कण्यासाठी सपती टिकविण्यासाठी लोक वारंवार पक्ष बदलत आहेत व त्यांना भाजप बळ देत आहे. आयुष्यभर ज्या संस्थेत, ज्या नेत्यांबरोबर राहिलो तिला क्षणात सोडणे हा

व्यभिचार

आहे. पण अशा व्यभिचान्यांची मोट बांधून त्यास कूटनीती, बेरजेचे राजकारण वगैरे मुलामा देणे हे राजकारण नसून एक राष्ट्रीय संकट आहे. देवेंद्र फडणवीस आता याच कूटनीती आणि धर्म अधर्माची भाषा करू लागले आहेत, पण ते व्यभिचार करणाऱ्यांच्या संगतीत आहेत. म्हणजे अधर्माच्या चिखलात आहेत याची जाणीव त्यांना आहे.

फडणवीसांनी ‘धर्मवीर’ अमितभाई शहांचा हवाला देऊन कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘ते मला म्हणाले, देवेंद्र राजकारणात 10 वेळा अपमान सहन कर पण बेइमानी खपवून घेऊ नको. मुळात देशात गेल्या 8-9 वर्षांत मान नावाची चीज गुंजभर तरी उरली आहे काय? मानाचे पानिपत दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत रोजच चालू आहे.

‘हम छेड़ते नहीं तो छोड़ते नही, असा शेर श्री. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर मारला व टाळता मिळवल्या. तुम्ही टाळता मिळवा किंवा टाळकुटा, पण राजकारण सत्य व धर्माचे करा.

ईडी, सी.बी. आय. वगैरे चिलखते बाजूला करा व नंतर ही असली संवादफेक करा. मग तुम्हाला अथम, कूटनीती, छेडणे वगैरेचे प्रत्यंतर या अर्थानि येईल तिकडे मुख्यमंत्री विदिही आपल्या विध्या कार्यकर्त्यांना म्हणाले, राष्ट्रवादीचे सोबत येणे हे बेरजेचे राजकारण आहे.

माणसाला झाले की अशा बेरजा सुचतात. ‘थुकलेले चाटणे असा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. बेरजेचे राजकारण वगैरे वाना करणायांनी त्याचा अर्थ समजून घ्यावा

सौजन्य – सामना

महत्वाच्या बातम्या

  • Ajit Pawar | अजित पवारांना अर्थ खात, तर गटातील इतर नेत्यांना मिळाले ‘हे’ खाते
  • Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची कूटनीती आपल्याला कुटून टाकायची – उद्धव ठाकरे
  • Raj Thackeray | “मी उद्धव ठाकरेंसोबत युती करणार…”; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
  • Dhananjay Munde | अब्दुल सत्तारांची सुट्टी? धनंजय मुंडेंना कृषी खात मिळण्याची शक्यता
  • Ajit Pawar | खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे, अजित पवार गटाला मिळणार ‘ही’ खाती
SendShare34Tweet15Share
Previous Post

Ajit Pawar | अजित पवारांना अर्थ खात, तर गटातील इतर नेत्यांना मिळाले ‘हे’ खाते

Next Post

Ajit Pawar | अजित पवार मैदानात! नाशिकमध्ये करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

जॉईन WhatsApp ग्रुप

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS mhd news whatsapp no

Google News वर Follow करा

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS

महत्वाच्या बातम्या

Chandrakant Khaire reacted to Chandrashekhar Bawankule statement on the journalist
Editor Choice

Chandrakant Khaire | चंद्रशेखर बावनकुळेंना काही किंमत नाहीये – चंद्रकांत खैरे

Supriya Sule reacted to Chandrasekhar Bawankule's statement on the journalist
Editor Choice

Supriya Sule | चहा पाजण्याची गोष्ट पहिल्यांदाच ऐकली; सुप्रिया सुळेंनी बावनकुळेंचे कान टोचले

Girish Mahajan has responded to the opposition's criticism of Pankaja Munde
Editor Choice

Girish Mahajan | स्वतःच सोडायचं आणि दुसऱ्याच्या मागे पळायचं हा उद्योग विरोधक का करतात? – गिरीश महाजन

Chandrasekhar Bawankule criticized Uddhav Thackeray and Sharad Pawar on statement of Udhayanidhi Stalin
Editor Choice

Chandrashekhar Bawankule | शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याला समर्थन – चंद्रशेखर बावनकुळे

NEWSLINK

Eknath Shinde | धनगरांना आरक्षण मिळणार? CM शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

Chandrakant Khaire | चंद्रशेखर बावनकुळेंना काही किंमत नाहीये – चंद्रकांत खैरे

Imtiaz Jaleel | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुस्लिम मत पाहिजे, पण मी नको – इम्तियाज जलील

Sanjay Raut | 2024 पर्यंत भाजप फुटलेला असेल – संजय राऊत

Jitendra Awhad | पत्रकार विरोधात का लिहितात याचं आत्मपरीक्षण करा म्हणजे विषय संपेल; बावनकुळेंच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया

Eknath Shinde | शिंदेंचे आमदार अपात्र ठरणार? उद्धव ठाकरे आणि शिंदेंना विधानसभा अध्यक्ष पाठवणार नोटीस

Satyajeet Tambe | शिक्षण विभाग काही प्रयोगशाळा नाही; सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • जीवनमान
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In