🕒 1 min read
नागपूर ( महाराष्ट्र ) | Devendra Fadnavis । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नसल्याचे म्हणत महाविकास आघाडीने आज आंदोलन करत निषेध मोर्चा काढला आहे.
यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की,” छत्रपती शिवरायांचा कधीही काँग्रेसने आदर केला नाही. आजचे आंदोलन पूर्णपणे राजकीय आहे. महाविकास आघाडी असो वा काँग्रेस पक्ष, त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही. नेहरूजींनी द डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. यावर काँग्रेस माफी मागणार का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सुरत लुटली नाही, सुरतच्या (गुजरात ) लोकांनी छत्रपतींचा पुतळा बसवला. काँग्रेसने लोकांना चुकीचं शिकवले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Chhatrapati Shivaji Maharaj never looted Surat – Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी माफी मागून पंतप्रधानांनी चूक मान्य केली
- महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
- नितेश राणेंना नेपाळमध्ये पाठवायला जनता उत्सुक – अमोल मिटकरी












