🕒 1 min read
Maharashtra Heavy Rain : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत रस्ते जलमय झाले आहे. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईतील (Mumbai) एका दुर्दैवी घटनेत चाळीचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
पुणे (Pune) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी (School Holiday) जाहीर केली आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, कर्जत-लोणावळा दरम्यानच्या दक्षिण-पूर्व घाट विभागात ठाकूरवाडी ते मंकी हिल परिसरात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
याशिवाय मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai–Pune Expressway) मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक 2 बाहेरही दरड कोसळल्याने पहाटेपासून वाहतूक वळवण्यात आली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Rain Alert: 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
- Cloud Research: ढगांमध्ये आढळले ब्लॅक कार्बनचे कण; पावसाच्या प्रक्रियेवर होऊ शकतो परिणाम
- दिल्लीत हालचालींना वेग! अमित शाह उपपंतप्रधान होणार?













