🕒 1 min read
मुंबई: आज मुंबईत पार पडलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बहुचर्चित ‘विजयी मेळाव्या’ला काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याने हजेरी न लावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हा मेळावा राजकीय नसल्याने, ठाकरे बंधूंनी सर्व पक्षांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती, मात्र काँग्रेसचा एकही मोठा चेहरा व्यासपीठावर दिसला नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे घेतलेल्या या मेळाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येत असल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसच्या अनुपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण झालेआहेत.
Raj Thackeray-Uddhav Thackeray in Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी या मेळाव्यास उपस्थिती लावत आघाडीतील एकसंधता दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे आघाडीमध्ये सर्व आलबेल आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
या दांडीमागे नेमके काय कारण आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसने जाणीवपूर्वक हा मेळावा टाळला की, त्यांची अनुपस्थिती ही पूर्वनियोजित रणनीतीचा भाग आहे, यावर राजकीय विश्लेषकांकडून चर्चा सुरू झाली आहे. या घटनेचे पडसाद आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात उमटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यकाळात आमदाराच्या हत्येचा कट! SIT चौकशीचे आदेश, सूत्रधाराचा शोध सुरू
- एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’ घोषणेवर अजित पवारांकडून सावध भूमिका; म्हणाले..!
- ‘लव्ह, सेक्स अन् धोका!’ अर्धवट सेक्सने बिनसलं; कोंढवा बलात्कार प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट













