🕒 1 min read
Sambhajiraje । सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलीस आरोपींकडून कसून चौकशी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढले जात आहेत.
या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड आहे, असा आरोप केला जात आहे. तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे. या पार्श्वभूमीवर काल अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. मात्र अजित पवार यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अद्याप भाष्य केलं नाही. त्यामुळे आता याबाबत त्यांच्याकडून मुंडेंची पाठराखण केली जात असल्याचं दिसतंय. यावर संभाजीराजे (Sambhajiraje ) यांनी अनेक सवाल केले आहेत.
Sambhajiraje on Ajit Pawar
“मला आश्चर्य आहे, मुख्यमंत्री, अजित पवार यावर शांत कसे? यांना संरक्षण का देताय? या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला एवढं घाबरताय. कुठल्याही सामान्य माणसाला बीडमध्ये विचारलं, हे सात जण कोणाचे? वाल्मिक कराड कोणाचा? उत्तर एकच येणार, सरकार का घाबरतय?”, असे सवाल संभाजीराजे (Sambhajiraje ) यांनी केले आहेत.
“अशोक चव्हाण, आर.आर.पाटील यांनी आधी राजीनामा दिला, मग ते पुन्हा सत्तेत आले. तुम्ही सुद्धा तसेच पुन्हा सत्तेवर या. मात्र आता धनंजय मुंडे यांनी मोठ्या मनाने राजीनामा दिला पाहिजे”, असं संभाजी राजे यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Health tips। तुम्हालाही असतील ‘या’ सवयी तर सोडाच, नाहीतर जीव येईल धोक्यात
- बीड हत्याप्रकरणात Bajarang Sonawane यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, “मास्टरमाईंडला…”
- Dhananjay Munde स्वत:च्या राजीनाम्याच्या प्रश्नावर स्पष्टच म्हणाले, “मी काहीही…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










