🕒 1 min read
Eknath Shinde । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्हा चर्चेच्या प्रकाशझोतात आला आहे. वाल्मिक कराडवर मोक्काअंतर्गत कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तब्बल चार तासानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
अशातच आता संतोष देशमुख हत्याप्रकरणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. “संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. अतिशय निर्घृणपणे हत्या झाली आहे. शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सीआयडी, एसआयटी लावलेली आहे. यातील एकही आरोपी सुटणार नाही,” असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Eknath Shinde on Santosh Deshmukh case
पुढे ते म्हणाले की, “कोणाशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणाला पाठीशी घालणार नाही. आरोपींना फाशी सारखी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. फास्टट्रॅकवर हा खटला चालवला जाईल. एखाद्या सरपंचाची निर्घृण हत्या होते हे अत्यंत दुर्दैवी आहे. या तपासात कोणीही सुटणार नाही,” अशी माहिती शिंदे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
- “मला ड्रग्ज देऊन त्याने माझ्यावर…”; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर Kangana Ranaut चा गंभीर आरोप
- ‘या’ 65 इंचाच्या Smart TV वर मिळतेय चक्क 63 हजारांची सवलत, कुठे मिळतोय लाभ? जाणून घ्या
- “देशमुख कुटुंबातील एकाही माणसाला काही झालं तर धनंजय मुंडेंच्या…”; Manoj Jarange यांचा थेट इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










