🕒 1 min read
मुंबई – क्रिकेटच्या मैदानात एखादा खेळाडू शतक ठोकूनही नाराज असू शकतो का? तर याचं उत्तर ‘हो’ असं आहे. वडोदरा येथे पार पडलेल्या India vs New Zealand पहिल्या वनडे सामन्यात भारताने ४ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतरही भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) स्वतःवर नाराज असू शकतो, असा दावा भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने केला आहे. दुखापतीतून सावरत कमबॅक करणाऱ्या अय्यरने मॅच तर गाजवली, पण ऐन मोक्याच्या क्षणी काय घडलं?
ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर श्रेयस अय्यरने कालच्या मॅचमध्ये पुनरागमन केलं. त्याने ४७ चेंडूत ४९ धावांची खेळी केली. मात्र, विजयासाठी ५३ चेंडूत ५९ धावांची गरज असताना तो बाद झाला. यावर बोलताना रहाणे म्हणाला, “श्रेयस स्वतःवरच खूप चिडला असेल. ज्या टप्प्यावर तो आऊट झाला, ते त्याला नक्कीच आवडलं नसेल.”
Ajinkya Rahane on Shreyas Iyer
श्रेयसने विकेट फेकली असली तरी रहाणेने त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. रहाणे पुढे म्हणाला, “आज त्याने ज्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट केली आणि स्पिनर्सना मोठे फटके मारले, ते पाहता तोच चौथ्या क्रमांकासाठी (No. 4) योग्य माणूस आहे. टीम अडचणीत असताना डावाला आकार देण्याची आणि गेम डीप नेण्याची ताकद त्याच्यात आहे.”
या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवण्यात आलं, यावरही रहाणेने प्रकाश टाकला. सुंदरच्या दुखापतीमुळेच हा बदल करण्यात आला होता. १४ जानेवारीला राजकोटमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडेत सुंदरच्या जागी कोणाला संधी मिळणार? रहाणेच्या मते, पेस बॉलिंग ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी याला संधी मिळू शकते. पण जर फिरकीला वाव असेल, तर ‘मिस्ट्री स्पिनर’ वरूण चक्रवर्ती याला संधी मिळाल्यास मला आवडेल, असंही रहाणेने सुचवलं आहे. आता दुसऱ्या वनडेत कर्णधार कोणाला संधी देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- Ind vs NZ: वडोदऱ्यात कोहलीनं हार्टबीट वाढवले; शतक हुकलं तरी भारताची ‘विराट’ विजयपताका!
- “दाखव रे तो फोटो…”; आदित्य ठाकरेंनी पुन्हा केली फडणवीसांची ‘मिमिक्री’, शिवाजी पार्कवर हास्याचे फवारे!
- ‘अरे भडव्या, तुझा संबंध काय?’; राज ठाकरेंचा भाजपच्या ‘रसमलाई’वर तोफखाना, अदानींची पोलखोल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










