🕒 1 min read
अमरावती : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. या दुर्घटनेत ट्रक आणि वॅगनार कारची (Wagon r Car) जोरदार धडक होऊन कारमधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Amravati Truck Car Accident)
हा अपघात समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 104 जवळ झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
कारमधील सर्व प्रवासी चंद्रपूरचे रहिवासी
मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेले सर्व प्रवासी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील रहिवासी होते. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा समावेश असल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका कायम
नागपूर ते मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग देशातील महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक आहे. मात्र, गेल्या काही काळात या महामार्गावर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वेग, वाहनचालकांचा निष्काळजीपणा आणि इतर कारणांमुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना येलो-ऑरेंज अलर्ट
- ‘मराठीला हलक्यात घेऊ नका’; हिंदीतून ऑफर असूनही श्रेयस तळपदेने ‘मर्दिनी’ मराठीतच का बनवला? सांगितला किस्सा
- विश्वास नांगरे पाटील प्रकरणात भाजपची एन्ट्री; चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












