🕒 1 min read
मुंबई: राजकारणात शत्रू कोण आणि मित्र कोण हेच समजेनासं झालंय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असाच काहीसा गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. पण यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेल्या मुलाखतीत असा एक बॉम्ब टाकलाय, ज्याने महायुतीत नक्कीच मोठी खळबळ उडाली आहे. “जर आरोप खरे असतील तर लाड नको, थेट कारवाई करा,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना घेरलंय.
“फडणवीसांनी माफी मागावी किंवा…”
सत्तेत असूनही महायुतीचे नेते एकमेकांचे कपडे फाडत आहेत, असा घणाघात ठाकरेंनी केला. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलंय. ठाकरे म्हणाले, “जर ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा खोटा असेल, तर फडणवीसांनी अजित पवारांची माफी मागावी. आणि जर तो आरोप खरा असेल, तर आता किसिंग नको, चक्की पिसिंग (तुरुंगाची हवा) करावं!” सत्तेसाठी हे लोक वाट्टेल ते करत असल्याचा, अगदी ‘पुणेरी मिसळ’ खायला एकत्र आल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि अजित पवार गट यांच्यातच जुंपली असल्याचं चित्र आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, “आजवर भाजपने अजितदादांवर ब्र काढला नव्हता, पण आता हे सगळं फडणवीसांच्या अंगलट आलंय.” महायुतीत अजित पवारांवरून अंतर्गत धुसफूस वाढल्याचं हे लक्षण असल्याचं बोललं जातंय.
एकिकडे हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे सत्तेसाठी कोणाशीही हात मिळवायचा, यावरही ठाकरेंनी बोट ठेवलं. अकोटमध्ये भाजपने चक्क एमआयएम (MIM) सोबत, तर अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली आहे. परभणीत शिंदे गटही MIM च्या मांडीला मांडी लावून बसलाय. यालाच ‘नंगानाच’ म्हणतात का? असा रोखठोक सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानात जनता या ‘पारदर्शक’ कारभाराचा फैसला करेलच.
📌 महत्वाच्या बातम्या
- शुभमन गिलचं टेन्शन वाढणार? जयस्वालला टीम इंडियात फिक्स होण्यासाठी दिग्गजाचा ‘हा’ गुरुमंत्र!
- ‘बॉम्बे’ महाराष्ट्राचं शहर नाही? भाजप नेत्याच्या वक्तव्याने मुंबईत आगडोंब; विरोधकांच्या हाती आयतं कोलीत!
- पुण्यात मोठा राजकीय भूकंप! अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर; भाजपचं टेन्शन वाढवणारी ‘ती’ बातमी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










