Hockey World Cup 2026 : २०२६ च्या हॉकी विश्वचषकात भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ‘क्रॉसओव्हर’ (Cross Over) फेरीत धडक मारली. हॉकी विश्वचषकातील भारताचे वर्चस्व कायम राहिले आणि पाकिस्तानचे भारताला हरवण्याचे स्वप्न जे २०१० पासून अपूर्णच राहिले आहे. यावेळीही पूर्ण होऊ शकले नाही.
या सामन्यात अनेक गोल झाले, तरीही पाकिस्तानला एकदाही आघाडी घेता आली नाही. पहिल्या हाफपासून भारतीय संघ गोलच्या बाबतीत आघाडीवर राहिला. पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि सामन्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत चुरस कायम राहिली, तरीही त्यांना गोलमधील अंतर कमी करता आले नाही.
India beats Pakistan 5-3 in Hockey World Cup 2026
पहिल्या सत्रातील घडामोडी
पहिल्या १५ मिनिटांच्या सत्रात भारताने आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने भारताला आघाडी मिळवून दिली. त्याने मारलेला जोरदार फटका पाकिस्तानी खेळाडूच्या पायांमधून जाऊन थेट गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यात विसावला. त्यानंतर ११ व्या मिनिटाला आणखी एक गोल झाला.
अभिषेकच्या पासवर पाकिस्तानच्या एका गोलपोस्टला चेंडू लागला आणि दिशा बदलली. मनदीप सिंगने या संधीचा फायदा घेत चपळाईने चेंडू गोलजाळीत धाडला. यासह भारताने पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रातही भारताची उत्कृष्ट कामगिरी सुरूच राहिली. २१ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून आघाडी ३-० अशी वाढवली. पाकिस्तान पिछाडीवर पडल्याचे दिसत होते, पण २२ व्या मिनिटाला त्यांनी गोलमधील अंतर कमी केले. सुफियान खानने गोल करत धावसंख्या ३-१ अशी केली.
त्यानंतर, २४ व्या मिनिटाला अभिषेकने उत्कृष्ट ‘ड्रिबलिंग’ करून मैदानी गोल मारत ४-१ स्थिती आणली. मात्र, २५ व्या मिनिटाला पाकिस्तानच्या सुफियान खानने पुन्हा एकदा गोल करत अंतर कमी केले. पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत त्याने गोल मारत ४-२ अशी केली.
दुसऱ्या सत्रातील घडामोडी
पहिल्या सत्राच्या अखेरीस एका भारतीय खेळाडूला ‘ग्रीन कार्ड’ मिळाले होते. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला सुखजीतला दोन मिनिटांसाठी मैदानाबाहेर बसावे लागले, ज्यामुळे भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन पाकिस्तानने जोरदार चढाई केली. परंतु त्यांना गोल करण्यात यश आले नाही.
या क्वार्टरमध्ये काही मिनिटांनंतर भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. हार्दिक सिंगने या संधीचा पुरेपूर लाभ उठवत चेंडू गोलच्या डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात मारला आणि भारतासाठी सामन्यातील पाचवा गोल नोंदवला.
भारताकडे ५-२ अशी आघाडी होती, मात्र पाकिस्तानने एक गोल करून हे अंतर कमी केले. मिडफील्डमध्ये हार्दिककडून चेंडू गमावला गेल्याने पाकिस्तानला प्रतिहल्ला करण्याची संधी मिळाली.
या प्रतिहल्लादरम्यान शाहिदने सामन्यातील आपला दुसरा गोल केला आणि धावसंख्या ५-३ अशी झाली. शेवटच्या मिनिटापर्यंत धावसंख्येत कोणताही बदल न झाल्याने भारताने विजय निश्चित केला. या पराभवामुळे स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “धनुष्यबाण तातडीने गोठवा!” कपिल सिबलांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी
- बारामतीत मोदी येणार? युगेंद्र पवार म्हणाले, ‘शरद पवारांच्या विनंतीला मान देतील’
- शरद पवार गटाचा मोठा डाव! पुण्यात दोन शहराध्यक्ष; दोघांवर मोठी जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











