Ashish Shelar : मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या काळात त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील अमराठी रिक्षाचालकांनी एकमेकांना मिठाई वाटून या निर्णयाचे स्वागत केले.
मात्र, मुख्यमंत्री फडणवीस (CM Fadnavis) यांच्या या निर्णयामुळे शिंदे गटात नाराजी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच या निर्णयामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. तरीही, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नाराजीबाबतच्या या चर्चांचे मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी खंडन केले आहे.
मंत्री आशिष शेलार यांनी सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसारमाध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले, “गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा (ASHA) कार्यकर्त्यांसोबत रक्षाबंधन साजरा करण्याचा मला बहुमान मिळाला आहे. माझ्या या भगिनी खूप चांगले काम करतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळवून मला आनंद होतो.”
Ashish Shelar on Eknath Shinde
उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याच्या चर्चा फेटाळून लावताना शेलार म्हणाले, “त्यात कोणतीही नाराजी नाही. मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतर मंत्र्यांचा त्याला होकारच होता. टॅक्सी चालकांना वेळ देणं हे सर्वसमावेशकच आहे.”
मराठी न आल्यास चालकांना फटकवणार, असा इशारा मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिला. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “मराठीचा आग्रह आमचा पण आहे. मराठी शिकलं पाहिजे, यासाठी तुमचे काका मुख्यमंत्री असताना कारवाई का नाही झाली? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे कारटे. आम्ही सगळ्यांना वेळ दिलाय, कायदा हातात घेता कामा नये. तुमच्या काकांनी का केलं नाही, असा प्रश्न त्यांनी विचारावा किंवा कांग्रेसला विचारावा.”
महापौरपद हे पुढील अडीच वर्षांसाठी शिंदे गटाला मिळणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. यावरही आशिष शेलार यांनी भाष्य केले. “शिंदे आमचे नेते, ते अनौपचारिक बोलले असतील, तर मी औपचारिक का बोलावे? मुख्यमंत्री आणि त्यांचे बोलणे झालं असेल, तर माहिती नाही”
मराठा आंदोलनावर आशिष शेलार म्हणाले, “मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांना त्यांचा अधिकार मिळायलाच हवा. सरकार अपेक्षेप्रमाणे काम करत आहे. काही गोष्टी राहिल्या असतील तर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री बोलले आहेत”
📌 महत्वाच्या बातम्या
- शाळकरी मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या गुटखामाफियांवर बिडकीन पोलिसांचे ‘सर्जिकल स्ट्राईक’!
- अहिरांच्या एक्झिटनंतर ठाकरेंनी बदलली रणनीती; पुण्यासाठी नवा शिलेदार
- मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्रासाठी समितीला मुदतवाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











