मुंबई : माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल! या उद्देशाने २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ (Jalsandharan Din) करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने ‘महा-वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे.
Eknath Shinde on Jalsandharan Din
यासोबतच जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘रिल चॅलेंज’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाहिरातीतील QR कोड स्कॅन करून नावनोंदणी करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
जलसंधारण आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन यांबाबत जनजगृती करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबवले जात आहेत. शिंदे यांनी नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आणि जलसंधारणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
“पाणी अडवूया, पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित व समृद्ध महाराष्ट्र घडवूया,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘चोरी यांनीच, तपास यांनीच अन् क्लीन चिटही यांनीच द्यायची’; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
- Maratha OBC Reservation: आझाद मैदानावर मराठा-ओबीसी आमनेसामने; आंदोलनाच्या परवानगीवरून पेच
- मेट्रो-13 साठी 17,724 कोटी मंजूर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











