खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे अत्यंत आक्रमक झाल्या आहेत. पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर त्यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला असून जनतेला थेट आवाहन केले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांना संकटाच्या काळात सोडून जे खासदार स्वार्थासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत, त्यांना जनतेने घरात घुसून जाब विचारला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला खासदारकी दिली, सन्मान दिला; मग त्यांना काय कमी पडले होते, याचे उत्तर या गद्दारांना द्यावेच लागेल.”
निष्ठावंतांच्या बंडखोरीमुळे ठाकरे गटातील नेत्यांमधील संताप आता चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात ग्राउंड लेव्हलवर संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.