आजचा थरार आपण इथेच थांबवूया.
येत्या रविवारी, ८ मार्चला अहमदाबादच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंडची काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
सगळ्यांना गुड नाईट! रविवारी IND vs NZ Final पहिली अपडेट आली की लगेच भेटू!
आजचा थरार आपण इथेच थांबवूया.
येत्या रविवारी, ८ मार्चला अहमदाबादच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंडची काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
सगळ्यांना गुड नाईट! रविवारी IND vs NZ Final पहिली अपडेट आली की लगेच भेटू!
विश्वचषकाचा महाअंतिम सामना आता अहमदाबादच्या विशाल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या फायनलमध्ये विजयाला गवसणी घालण्यासाठी भारतासमोर आता न्यूझीलंडचे तगडे आव्हान असणार आहे. दोन्ही संघ तगडे असल्यामुळे हा सामना एकदम हाय-व्होल्टेज होणार यात काहीच शंका नाही!
संजूने बुमराहचं तोंडभरून कौतुक केलं. तो म्हणाला, “बुमराह हा एक जागतिक दर्जाचा आणि पिढीतून एकदाच पाहायला मिळणारा गोलंदाज आहे. आज त्याने जे करून दाखवलं, त्यासाठी हा पुरस्कार त्यालाच मिळायला हवा.” इंग्लंडचे फलंदाज खतरनाक फॉर्ममध्ये असताना बुमराहने मोक्याच्या क्षणी १७ व्या आणि १८ व्या षटकात फक्त ८ आणि ६ धावा देऊन भारताचा विजय पक्का केला होता.
संजूने आपल्या विजयाचं संपूर्ण श्रेय गोलंदाजांना दिलं. तो म्हणाला, “जर आज आपण शेवटच्या ओव्हर्समध्ये तशी अचूक गोलंदाजी केली नसती, तर आज मी इथे उभा राहून हा पुरस्कार घेत नसतो.”संजूच्या या बोलण्याने सगळ्या क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.
या अटीतटीच्या सामन्यात ४२ चेंडूत ८९ धावांची वादळी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला. पण त्याने मोठेपणा दाखवत हा पुरस्कार थेट जसप्रीत बुमराहला देऊ केला! संजू म्हणाला, “आज टीमने जसा खेळ केला त्याचा खूप आनंद आहे, पण या विजयाचं खरं श्रेय जसप्रीत बुमराहला जातं.”
इंग्लंडकडून जेकब बेथेलने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्याने अतिशय आक्रमक खेळत अवघ्या ४८ चेंडूत १०५ धावांची खतरनाक खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले. तो एकटाच इंग्लंडला विजयाकडे घेऊन चालला होता, पण अगदी मोक्याच्या क्षणी हार्दिक पंड्याने त्याला धावबाद (Run Out) केलं आणि तिथेच संपूर्ण मॅच भारताच्या बाजूने वळली. दुसऱ्या बाजूने विल जॅक्सने २० चेंडूत ३५ धावांची भर घातली.
इंग्लंडकडून जेकब बेथेलने ४८ चेंडूत १०५ धावांची वादळी खेळी केली, पण हार्दिक पंड्याने त्याला मोक्याच्या क्षणी धावबाद करून मॅच भारताच्या बाजूने वळवली. गोलंदाजीत हार्दिकने ४ षटकांत ३८ धावा देऊन २ तर बुमराहने ३३ धावा देऊन १ महत्त्वाची विकेट घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला.
वानखेडेवर रंगलेल्या या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात अखेर भारताने बाजी मारली आहे! भारताने ठेवलेल्या २५३ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने जोरदार झुंज दिली, पण त्यांना २० षटकांत ७ बाद २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. यासह भारताने हा सामना ७ धावांनी खिशात घातला आहे!
या हाय-स्कोअरिंग आणि प्रेशरच्या मॅचमध्ये भारतीय गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिक पंड्याने ४ षटकांत ३८ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले, तर जसप्रीत बुमराहने ४ षटकांत ३३ धावा खर्च करत १ विकेट मिळवली आणि इंग्लंडला रोखून धरण्यात मोठे योगदान दिले.
शेवटच्या विसाव्या षटकात शिवम दुबे गोलंदाजीला आला आणि त्याने आपल्या एकाच ओव्हरमध्ये तब्बल २२ धावा दिल्या. जोफ्रा आर्चरने मैदानात येताच फक्त ४ चेंडूत ३ खणखणीत षटकार ठोकत ४७५.० च्या स्ट्राईक रेटने नाबाद १९ धावा चोपल्या! पण इंग्लंडला विजयापर्यंत पोहोचता आलं नाही. दुसऱ्या बाजूला जेमी ओव्हरटन ३ चेंडूत २ धावांवर नाबाद राहिला.
अखेर तो क्षण आलाच! २० षटकांचा हा श्वास रोखून धरायला लावणारा सामना संपला असून भारताने इंग्लंडवर ७ धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने शेवटच्या चेंडूपर्यंत जोरदार झुंज दिली, पण त्यांना २० षटकांत ७ बाद २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
बेथेल आऊट झाल्यामुळे इंग्लंडची धावसंख्या आता ७ बाद २२५ अशी झाली आहे. शेवटच्या आणि निर्णायक विसाव्या षटकाची जबाबदारी शिवम दुबेला देण्यात आली असून त्याने पहिल्या चेंडूवर १ धाव दिली आहे. आता इंग्लंडला जिंकण्यासाठी शेवटच्या ५ चेंडूंमध्ये तब्बल २९ धावांची अशक्यप्राय गरज आहे आणि त्यांचा आवश्यक रनरेट (RRR) ३४.८ वर गेला आहे. या स्थितीमुळे भारताच्या विजयाची शक्यता थेट ९९.२% वर पोहोचली आहे. सध्या मैदानावर जेमी ओव्हरटन २ चेंडूत १ धाव करून उभा आहे.
भारतासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेला जेकब बेथेल अखेर तंबूत परतला आहे! १९.१ षटकांनंतर इंग्लंडला सातवा आणि सामन्यातला सर्वात मोठा धक्का बसला. हार्दिक पंड्याने चपळाई दाखवत त्याला थेट धावबाद (Run Out) केलं. बेथेलने आऊट होण्यापूर्वी २१८.७५ च्या स्ट्राईक रेटने ४८ चेंडूत १०५ धावांची खतरनाक खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ खणखणीत षटकार ठोकले. या एका विकेटमुळे भारताने आता सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली आहे!
हार्दिक पंड्याने आपल्या गोलंदाजीचा कोटा पूर्ण केला असून या अटीतटीच्या सामन्यात त्याने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या स्पेलमध्ये ३८ धावा देऊन २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे इंग्लंडचा शतकवीर जेकब बेथेल अजूनही मैदानावर पाय रोवून उभा आहे; तो ४७ चेंडूत १०४ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याने आतापर्यंत ८ चौकार आणि ७ खणखणीत षटकार लगावले आहेत. त्याला साथ देणारा नवीन फलंदाज जेमी ओव्हरटन २ चेंडूत १ धाव करून खेळत आहे.
हार्दिक पंड्याने १९ व्या षटकात अतिशय मोक्याच्या क्षणी एक जबरदस्त ओव्हर टाकली आहे! आता सामन्यात १९ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून इंग्लंडची धावसंख्या ६ बाद २२४ धावा अशी झाली आहे. आता इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ६ चेंडूंमध्ये तब्बल ३० धावांची गरज आहे. त्यांचा आवश्यक रनरेट (RRR) थेट ३०.० वर पोहोचला असून, भारताच्या विजयाची शक्यता आता ९८% झाली आहे. भारताचा विजय आता निश्चित मानला जात आहे!
सॅम करनच्या विकेटमुळे सामन्याचं चित्र पुन्हा भारताच्या बाजूने झुकलं असून विजयाची शक्यता आता ९०% वर पोहोचली आहे. इंग्लंडला विजयासाठी आता शेवटच्या ९ चेंडूंमध्ये ३२ धावांची गरज आहे आणि त्यांचा आवश्यक रनरेट (RRR) थेट २१.३ वर गेला आहे. हार्दिक पंड्याने आतापर्यंत आपल्या ३.३ षटकांत ३६ धावा देऊन २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला शतकवीर जेकब बेथेल ४६ चेंडूत १०३ धावांवर नाबाद उभा आहे, त्यामुळे मॅचमध्ये अजूनही रंगत बाकी आहे.
१८.३ षटकांनंतर इंग्लंडला सहावा धक्का बसला आहे. मोक्याच्या क्षणी हार्दिक पंड्याने भारताला यश मिळवून दिलं असून तिलक वर्माने त्याचा एक सुंदर झेल टिपला आहे. सॅम करन १४ चेंडूत १८ धावा करून बाद झाला, यात त्याने २ चौकार लगावले. या विकेटमुळे इंग्लंडची धावसंख्या आता ६ बाद २२२ अशी झाली आहे.
सामन्यात आता १८.१ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून इंग्लंडची धावसंख्या ५ बाद २२१ अशी झाली आहे. आता इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ११ चेंडूंमध्ये ३३ धावांची गरज आहे आणि त्यांचा आवश्यक रनरेट (RRR) १८.० वर पोहोचला आहे. बेथेलच्या या वादळी शतकामुळे भारताच्या विजयाची शक्यता आता ९०% वरून थेट ७९% वर घसरली आहे. दुसऱ्या बाजूने सॅम कुरन १३ चेंडूत १८ धावांवर खेळत त्याला साथ देत आहे. सध्या हार्दिक पंड्या गोलंदाजी करत आहे.
जेकब बेथेलने भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई करत आपलं शानदार शतक साजरं केलं आहे! तो सध्या २२६.६७ च्या भन्नाट स्ट्राईक रेटने खेळत असून ४५ चेंडूत १०२ धावांवर नाबाद उभा आहे. या खतरनाक खेळीत त्याने आतापर्यंत ८ चौकार आणि तब्बल ७ खणखणीत षटकार ठोकले आहेत. भारतासाठी तो आता सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे!
भारताचा विजय दृष्टिपथात असला तरी जेकब बेथेल अजूनही मैदानावर पाय रोवून उभा आहे. तो आपले शतक पूर्ण करण्यापासून फक्त ४ धावा दूर आहे. बेथेल २१८.१८ च्या भन्नाट स्ट्राईक रेटने खेळत असून ४४ चेंडूत ९६ धावांवर नाबाद आहे. त्याने आतापर्यंत ८ चौकार आणि ६ खणखणीत षटकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने सॅम कुरन १३ चेंडूत १८ धावांवर खेळत त्याला साथ देत आहे.
सामन्यात १८ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून इंग्लंडची धावसंख्या आता ५ बाद २१५ धावा झाली आहे. जसप्रीत बुमराहने अत्यंत मोक्याच्या क्षणी अतिशय भेदक आणि कंजूस गोलंदाजी करत भारतावरील दबाव कमी केला आहे. बुमराहचा स्पेल आता पूर्ण झाला असून त्याने आपल्या ४ षटकांत फक्त ३३ धावा देऊन १ विकेट घेतली आहे. आता इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या १२ चेंडूंमध्ये ३९ धावांची गरज असून, त्यांचा आवश्यक रनरेट (RRR) वाढून थेट १९.५ वर पोहोचला आहे. यामुळे भारताच्या विजयाची शक्यता आता ९०% झाली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपली ४ षटके पूर्ण केली आहेत, ज्यात त्याने ५१ धावा खर्च करून १ विकेट घेतली आहे. सध्या भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत आहे. बुमराहने आतापर्यंत ३.१ षटकांत फक्त २७ धावा देत १ विकेट मिळवली आहे. बेथेलचं वादळ रोखण्याची मोठी जबाबदारी आता बुमराहवरच आहे.
जेकब बेथेल भारतीय गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडला आहे! तो २२३.८१ च्या भन्नाट स्ट्राईक रेटने खेळत असून ४२ चेंडूत ९४ धावांवर नाबाद उभा आहे. त्याने आतापर्यंत ८ खणखणीत चौकार आणि ६ उत्तुंग षटकार ठोकले आहेत. दुसऱ्या टोकाकडून सॅम कुरन त्याला साथ देत असून तो १० चेंडूत १४ धावांवर खेळत आहे.
सामन्यात १७.१ षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि इंग्लंडची धावसंख्या ५ बाद २०९ अशी पोहोचली आहे. आता त्यांना विजयासाठी शेवटच्या १७ चेंडूंमध्ये ४५ धावांची गरज आहे. इंग्लंडचा आवश्यक रनरेट (RRR) वाढून १५.९ वर गेला आहे. भारताच्या विजयाची शक्यता ८२% दिसत असली तरी, मैदानावरील परिस्थिती पाहता मॅच अजूनही कुणाच्याही बाजूने झुकू शकते.
भारतासाठी जेकब बेथेल अजूनही मोठा धोका बनून उभा आहे. तो २१८.४२ च्या भन्नाट स्ट्राईक रेटने ३८ चेंडूत ८३ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याने आतापर्यंत ७ चौकार आणि ५ षटकार ठोकले आहेत. दुसऱ्या बाजूने सॅम कुरन ७ चेंडूत ११ धावा करून त्याला साथ देत आहे.
सामन्यात आता १६ षटके पूर्ण झाली असून इंग्लंडने ५ बाद १९३ धावा केल्या आहेत. आता त्यांना विजयासाठी शेवटच्या २४ चेंडूंमध्ये ६१ धावांची गरज आहे. इंग्लंडचा आवश्यक रनरेट (RRR) वाढून १५.३ वर पोहोचला आहे. सध्या भारताच्या विजयाची शक्यता ८७% दिसत आहे.
जेकब बेथेलने भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला आहे. तो सध्या ३६ चेंडूत ७ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांच्या मदतीने २२५.०० च्या स्ट्राईक रेटने ८१ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याला साथ देण्यासाठी आलेला नवीन फलंदाज सॅम कुरन ३ चेंडूत ५ धावांवर खेळत आहे. दुसरीकडे, वरुण चक्रवर्तीचा स्पेल संपला असून त्याने आपल्या ४ षटकांत तब्बल ६४ धावा खर्च केल्या आहेत.
सामन्यात आता १५ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून इंग्लंडची धावसंख्या ५ बाद १८५ अशी झाली आहे. विल जॅक्स आऊट झाल्यानंतर मैदानावर आलेला नवीन फलंदाज सॅम कुरन सध्या ३ चेंडूत ५ धावांवर नाबाद आहे. पण भारतासाठी सर्वात मोठा धोका अजूनही जेकब बेथेलच आहे! तो अतिशय आक्रमक फलंदाजी करत असून २२५.०० च्या भन्नाट स्ट्राईक रेटने ३६ चेंडूत ८१ धावांवर नाबाद उभा आहे. त्याने आतापर्यंत ७ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार ठोकले आहेत.
दुसरीकडे, भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा स्पेल पूर्ण झाला आहे. त्याने आज खूप धावा लुटवल्या; आपल्या ४ षटकांत तब्बल ६४ धावा देत त्याने फक्त १ विकेट घेतली आहे.
आता सामना एकदम अटीतटीच्या वळणावर आलाय! इंग्लंडला जिंकण्यासाठी शेवटच्या ३० चेंडूंमध्ये ६९ धावांची गरज असून त्यांचा आवश्यक रनरेट (RRR) १३.८ वर पोहोचला आहे.
सामन्यात १४ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. धोकादायक वाटणाऱ्या विल जॅक्सला अर्शदीप सिंगने बाद करत भारताला महत्त्वाचं यश मिळवून दिलं आहे. जॅक्सने २० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या. १४ षटकांअखेर इंग्लंडची धावसंख्या ५ बाद १७२ अशी झाली आहे. आता विजयासाठी इंग्लंडला शेवटच्या ३६ चेंडूत ८२ धावांची गरज असून त्यांचा आवश्यक रनरेट १३.७ वर पोहोचला आहे. इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला असला तरी, जेकब बेथेल मात्र अजूनही ३३ चेंडूत ७४ धावांवर नाबाद खेळत आहे.
जेकब बेथेल आणि विल जॅक्स या जोडीने भारतीय गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला आहे. जेकब बेथेल सध्या २८ चेंडूंत ५ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ६५ धावांवर खेळत आहे. त्याला साथ देणारा विल जॅक्स १९ चेंडूंत ३५ धावांवर नाबाद असून त्याने आतापर्यंत ४ चौकार आणि २ षटकार ठोकले आहेत. अक्षर पटेलने आतापर्यंत 3 षटकांत ३५ धावा दिल्या आहेत.
वानखेडेवर रंगात आलेल्या या सामन्यात १३ षटकाअखेर इंग्लंडने ४ बाद १६० धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी आता शेवटच्या ७ षटकांत (४२ चेंडू) ९४ धावांची गरज आहे. सध्या इंग्लंडचा रनरेट १२.३१ असून त्यांना विजयासाठी १३.४ च्या सरासरीने धावा कराव्या लागतील.
जेकब बेथेल आज भारतीय गोलंदाजांना दाद देताना दिसत नाहीये. त्याने आतापर्यंत अवघ्या २५ चेंडूंत ५ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ६१ धावा कुटल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला विल जॅक्स १६ चेंडूंत २४ धावांवर खेळत आहे. वरुण चक्रवर्ती आज भारतासाठी चिंतेचा विषय ठरला असून त्याने २.६ षटकांत तब्बल ५१ धावा लुटवल्या आहेत.
वानखेडेवर थरार शिगेला पोहोचला आहे. १२ षटकाअखेर इंग्लंडने ४ बाद १४५ धावा केल्या असून सामना आता रंजक वळणावर आला आहे. इंग्लंडला विजयासाठी आता शेवटच्या ८ षटकांत (४८ चेंडू) १०९ धावांची गरज आहे. सध्या इंग्लंडचा रनरेट १२.०८ असून त्यांना विजयासाठी १३.६ च्या सरासरीने धावा कराव्या लागतील.
जेकब बेथेल आज भारतीय गोलंदाजांना दाद देताना दिसत नाहीये. त्याने आतापर्यंत अवघ्या २२ चेंडूंत ४ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावा कुटल्या आहेत. त्याला साथ देणारा विल जॅक्स १३ चेंडूंत १६ धावांवर खेळत आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने आपल्या 2 षटकांत १९ धावा दिल्या आहेत, तर अक्षर पटेलने २ षटकांत २० धावा देत धावगती रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
वानखेडेवर थरार अजूनही कायम आहे. ११ षटकाअखेर इंग्लंडने ४ बाद १३१ धावा केल्या असून सामन्यात दोन्ही बाजूने चुरस पाहायला मिळतेय. इंग्लंडला विजयासाठी आता शेवटच्या ९ षटकांत (५४ चेंडू) १२३ धावांची गरज आहे. सध्या इंग्लंडचा रनरेट ११.९ असून त्यांना विजयासाठी १३.७ च्या सरासरीने धावा कराव्या लागतील.
सामना आता अत्यंत अटीतटीच्या वळणावर पोहोचला आहे. १०.३ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून इंग्लंडने ४ बाद १२७ धावा केल्या आहेत. बेथेलला साथ देणारा विल जॅक्स सध्या १३ चेंडूंत १६ धावांवर नाबाद खेळत आहे. इंग्लंडचा सध्याचा रनरेट १२.१ असून त्यांना विजयासाठी आता उरलेल्या ५७ चेंडूंत १२७ धावांची गरज आहे. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत १.३ षटकांत केवळ १५ धावा दिल्या आहेत.
इंग्लंडच्या युवा जेकब बेथेलने भारतीय गोलंदाजांची पिसं काढत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. बेथेलने अवघ्या १९ चेंडूंत ५ उत्तुंग षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा कुटल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट २६८.४२ इतका भयंकर असून त्याने एकट्याने इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
सामना आता अतिशय रंजक वळणावर असून इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ६० चेंडूंत १३५ धावांची गरज आहे. स्फोटक फलंदाजी करणारा जेकब बेथेल १८ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४९ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याला साथ देणारा विल जॅक्स ११ चेंडूंत ११ धावा करून खेळत आहे. अक्षर पटेलने आतापर्यंत आपल्या २ षटकांत २० धावा दिल्या असून इंग्लंडचा रिक्वायर्ड रनरेट आता १३.५ वर पोहोचला आहे.
वरुण चक्रवर्तीने 2 ओवरमध्ये ३७ धावा लुटवल्यानंतर भारतीय संघ दबावाखाली आला होता, पण अक्षर पटेलने आपल्या अनुभवाच्या जोरावर भारताला सावरले आहे. १० व्या षटकात अक्षरने केवळ ६ धावा देऊन इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले, ज्यामुळे धावगती (CRR) पुन्हा एकदा ११.९ वर आली आहे. १० षटकांचा खेळ पूर्ण झाला असून इंग्लंडची धावसंख्या ४ बाद ११९ अशी आहे.
सामना आता अटीतटीच्या वळणावर आला असून ९ षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडने ४ बाद ११३ धावा करून आपली स्थिती भक्कम केली आहे. जेकब बेथेल सध्या १७ चेंडूंत ४८ धावांवर (३ चौकार, ५ षटकार) नाबाद खेळत असून तो आपल्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्याला साथ देणारा विल जॅक्स ६ चेंडूंत ९ धावांवर खेळत आहे. इंग्लंडला विजयासाठी आता उरलेल्या ६६ चेंडूंत १४१ धावांची गरज आहे.
वानखेडेवर आज टीम इंडियाचा ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्ती पूर्णपणे फिका पडताना दिसतोय. वरुणने आतापर्यंत टाकलेल्या आपल्या २ षटकांत तब्बल ३७ धावा लुटवल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट १८.५ इतका प्रचंड आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी वरुणच्या फिरकीचा समाचार घेत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सोपा केला आहे.
एका बाजूने विकेट्स पडत असताना जेकब बेथेल मात्र भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतोय. बेथेल सध्या अवघ्या १४ चेंडूंत ५ षटकारांच्या मदतीने ३९ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याला साथ देण्यासाठी आता स्फोटक फलंदाज विल जॅक्स मैदानात आला असून त्याने ३ चेंडूंत ४ धावा केल्या आहेत. भारताकडून अक्षर पटेलने आपल्या पहिल्या षटकात १६ धावा दिल्या आहेत.
सध्या क्रीझवर जेकब बेथेल (३९ धावा) आणि विल जॅक्स (४ धावा) यांची जोडी पाय रोवून उभी आहे. भारताचा स्टार स्पिनर अक्षर पटेलने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये १६ धावा लुटवल्यामुळे इंग्लंडला हा वेग पकडता आला. आता कर्णधार सूर्यकुमार यादव मधल्या ओव्हर्समध्ये कुलदीप यादवला पाचारण करतो की बुमराहला परत आणतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
वानखेडेवर २५४ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने अवघ्या ८.१ षटकांतच १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. जरी भारताने ४ विकेट्स घेतल्या असल्या, तरी इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांची गती अजिबात कमी होऊ दिलेली नाही. विजयासाठी अजूनही मोठ्या धावसंख्येची गरज असली, तरी इंग्लंडचा हा प्रतिहल्ला भारतीय गोलंदाजांसाठी चिंतेचा विषय ठरतोय.
आज मैदानावर अक्षर पटेलचे हात जिथे लागतायत तिथे विकेट मिळतेय असं चित्र आहे. जोस बटलर आणि हॅरी ब्रूकनंतर आता टॉम बँटनचाही झेल अक्षर पटेलनेच पकडला आहे. इंग्लंडला विजयासाठी आता उरलेल्या ७५ चेंडूंत १५९ धावांची गरज आहे आणि त्यांचा रनरेट १२.६७ वर पोहोचला आहे. जेकब बेथेल अजूनही ३९ धावांवर नाबाद असून त्याला साथ देण्यासाठी आता नवीन फलंदाज कोण येतोय, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
वानखेडेवर सलग दोन षटकार ठोकून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणारा टॉम बँटन (१७ धावा) अखेर बाद झाला आहे. बँटनने अवघ्या ५ चेंडूंत २ षटकारांच्या मदतीने ३४० च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली, पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. ७.३ षटकांत इंग्लंडची अवस्था आता ४ बाद ९५ अशी झाली आहे.
जोस बटलर बाद झाल्यानंतर आता बेथेलला साथ देण्यासाठी टॉम बँटन मैदानात आला आहे. ७ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून इंग्लंडने ३ बाद ८३ धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी आता उरलेल्या ७८ चेंडूंमध्ये १७१ धावांची गरज आहे. भारताकडून हार्दिक पांड्याने आतापर्यंत २.६ षटकांत २९ धावा देऊन १ बळी घेतला आहे.
इंग्लंडचा युवा फलंदाज जेकब बेथेलने भारतीय गोलंदाजीची अक्षरशः पिसं काढायला सुरुवात केली आहे. वरुण चक्रवर्तीनंतर आता त्याने हार्दिक पांड्यालाही लक्ष्य केलं आहे. बेथेल सध्या अवघ्या १४ चेंडूंत ५ उत्तुंग षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ३९ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याचा स्ट्राईक रेट २७८.५७ च्या भयंकर वेगाने धावत असून त्याने सामना पुन्हा एकदा जिवंत केला आहे.
सलग षटकार खाल्ल्यानंतर वरुण चक्रवर्तीने त्याच ओव्हरच्या ५ व्या चेंडूवर (५.५ ओव्हर) पुनरागमन करत इंग्लंडचा सर्वात मोठा अडथळा दूर केला आहे. इंग्लंडचा सेट झालेला सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज जोस बटलर (२५ धावा) वरुणच्या फिरकीवर बाद झाला आहे. बटलर बाद झाल्यामुळे इंग्लंडला तिसरा आणि अत्यंत मोठा धक्का बसला असून त्यांची अवस्था ५.५ षटकांत ३ बाद ६४ अशी झाली आहे.
एका बाजूने धावांची लयलूट होत असतानाच वरुण चक्रवर्तीने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाला सर्वात मोठे यश मिळवून दिले आहे. इंग्लंडचा सेट झालेला सलामीवीर आणि कर्णधार जोस बटलर (२५ धावा) वरुणच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. बटलर बाद झाल्यामुळे इंग्लंडला तिसरा आणि सर्वात मोठा धक्का बसला आहे. ६ षटकांचा पॉवरप्ले संपला असून इंग्लंडची धावसंख्या आता ३ बाद ६४ अशी आहे.
मैदानावर नवीन आलेल्या जेकब बेथेलने भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला येताच बेथेलने त्याचे स्वागत सलग ३ उत्तुंग षटकारांनी केले. पहिल्या ५ चेंडूंत त्याने वरुणला अक्षरशः फोडून काढत २६ धावा वसूल केल्या, ज्यामुळे इंग्लंडचा रनरेट अचानक ११ वर पोहोचला आहे. बेथेल सध्या ९ चेंडूंत ४ षटकारांच्या मदतीने २६ धावांवर नाबाद खेळत आहे.
अक्षर पटेलने हॅरी ब्रूकचाही एक अविश्वसनीय झेल पकडून सर्वांना थक्क केले आहे. बुमराहच्या गोलंदाजीवर अक्षरने ज्या पद्धतीने झेल घेतला, ते पाहून संपूर्ण वानखेडे स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. ४.१ षटकांत इंग्लंडची धावसंख्या आता २ बाद ३८ अशी झाली असून भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे.
वानखेडेवर जसप्रीत बुमराहच्या आगमनाने इंग्लंडची दाणादाण उडाली आहे. पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला (७ धावा) बाद करून टीम इंडियाला दुसरे मोठे यश मिळवून दिले आहे. बुमराहच्या या अचूक चेंडूवर ब्रूकने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला.
सलामीवीर फिल सॉल्ट स्वस्त्यात बाद झाल्यानंतर कर्णधार जोस बटलरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. बटलर सध्या १६ चेंडूंत २५ धावांवर (४ चौकार, १ षटकार) नाबाद खेळत असून त्याचा स्ट्राईक रेट १५६.२५ वर पोहोचला आहे. त्याला दुसऱ्या बाजूने नवा कर्णधार हॅरी ब्रूक ५ चेंडूंत ७ धावांवर खेळत साथ देत आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंत १.५ षटकांत १४ धावा देत १ महत्त्वाची विकेट काढली आहे.
२५४ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने ४ षटकांत १ बाद ३८ धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी १३ धावा वसूल करत आपला इरादा स्पष्ट केला आहे. इंग्लंडला विजयासाठी आता उरलेल्या १६ षटकांत २१६ धावांची गरज असून त्यांचा सध्याचा रनरेट ९.५० इतका आहे.
पॉवरप्लेमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव टाकण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरताना दिसत आहेत. सलामीवीर जोस बटलर १४ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने १८ धावांवर नाबाद खेळत असून तो डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. तर दुसऱ्या बाजूला नवा फलंदाज हॅरी ब्रूक १ चेंडूत १ धाव काढून खेळत आहे. अर्शदीप सिंगने आपल्या २ षटकांत २३ धावा दिल्या आहेत, तर हार्दिकने १ ओव्हरमध्ये केवळ १ धाव देत १ गडी बाद केला आहे.
वानखेडेवर २५४ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ षटकांत १ बाद २५ धावा केल्या आहेत. हार्दिक पांड्याने फिल सॉल्टला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले असून इंग्लंडला विजयासाठी आता उरलेल्या १७ षटकांत २२९ धावांची गरज आहे. सध्या इंग्लंडचा रनरेट ८.३३ इतका असून त्यांना विजयासाठी १३.५ च्या भयंकर वेगाने धावा कराव्या लागणार आहेत.
फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर आता कर्णधार जोस बटलरला साथ देण्यासाठी स्वतः इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक मैदानात आला आहे. २.१ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून इंग्लंडची धावसंख्या १ बाद १५ अशी आहे. हार्दिक पांड्याने आपल्या पहिल्या षटकात केवळ १ धाव देऊन १ महत्त्वाची विकेट काढली आहे, ज्यामुळे इंग्लंडचा रनरेट आता ६.९२ पर्यंत खाली आला आहे.
वानखेडेवर हार्दिक पांड्याने आपल्या गोलंदाजीची पहिली ओव्हर टाकायला येताच इंग्लंडचं कंबरडं मोडलं आहे. हार्दिकने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमक सलामीवीर फिल सॉल्टला (५ धावा) बाद करून भारताला खूप मोठं यश मिळवून दिलं आहे. सॉल्टने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण अक्षर पटेलने त्याचा सोपा झेल पकडला आणि इंग्लंडची सलामीची जोडी अवघ्या १३ धावांवर फुटली.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडला त्यांच्या सलामीवीरांकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र, हार्दिक पांड्याने अत्यंत चतुर गोलंदाजी करत सॉल्टला बाद केले आणि भारताला सामन्यात पहिले यश मिळवून दिले आहे. आता जोस बटलरला साथ देण्यासाठी मैदानात कोण येतंय आणि या धक्क्यातून इंग्लंड सावरतंय का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
वानखेडेवर इंग्लंडला पहिला मोठा धक्का बसला आहे. भारताने दिलेल्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना आक्रमक मूडमध्ये असलेल्या फिल सॉल्टला हार्दिक पांड्याने बाद केले आहे. पहिल्या ओव्हरमध्ये १३ धावा कुटून जोस बटलर आणि सॉल्टने चांगली सुरुवात केली होती, पण हार्दिकने आपल्या पहिल्याच षटकात सॉल्टला बाद करत ही सलामीची जोडी फोडली आहे.
कर्णधार जोस बटलरने ४ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने नाबाद ८ धावा केल्या आहेत, तर फिल सॉल्टने २ चेंडूंत १ चौकार मारून नाबाद ५ धावांवर खेळत आहे. अर्शदीप सिंगने या षटकात १३ धावा लुटवल्यामुळे आता अर्ली विकेट काढण्यासाठी भारतीय गोलंदाजांवर दबाव वाढला आहे. वानखेडेवर आता धावांचा पाठलाग करणं इंग्लंडसाठी किती सोपं होतं की टीम इंडिया कमबॅक करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
२५४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने आपल्या इराद्यांची चुणूक पहिल्याच षटकात दाखवली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात जोस बटलर आणि फिल सॉल्टने हात उघडले असून इंग्लंडने १ षटकाअखेर बिनबाद १३ धावा कुटल्या आहेत. इंग्लंडचा सध्याचा रनरेट (CRR) १३ इतका असून त्यांना विजयासाठी अजून २४१ धावांची गरज आहे.
वानखेडेच्या पाटा खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी कमाल केल्यानंतर आता खरी कसोटी गोलंदाजांची आहे. इंग्लंडला विजयासाठी २० षटकांत २५४ धावांचे महाकाय आव्हान पूर्ण करायचे आहे. सॉल्ट आणि बटलरसारखे स्फोटक फलंदाज क्रीझवर असल्यामुळे अर्शदीप सिंग आणि इतर भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्येच विकेट्स काढणं अत्यंत गरजेचं आहे.
भारताने दिलेल्या २५४ धावांच्या अतिविशाल आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत. इंग्लंडकडून आक्रमक फलंदाज फिल सॉल्ट आणि कर्णधार जोस बटलर यांनी डावाची सुरुवात केली आहे. तर टीम इंडियाकडून पहिले षटक टाकण्याची मोठी जबाबदारी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर सोपवण्यात आली आहे. आता अर्शदीप सुरुवातीलाच एखादा बळी घेऊन इंग्लंडला बॅकफूटवर ढकलतो का, हे पाहणं अत्यंत चुरशीचं ठरणार आहे.
आजच्या या ऐतिहासिक १९ षटकारांमध्ये संजू सॅमसनचा वाटा सर्वात मोठा आहे. त्याने एकट्याने ७ उत्तुंग षटकार मारले. त्याला भक्कम साथ देत शिवम दुबेने ४, तिलक वर्माने ३, ईशान किशन आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी २ आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने १ षटकार ठोकला. या स्फोटक फलंदाजीमुळेच इंग्लंडच्या गोलंदाजांची आज चांगलीच धुलाई झाली आणि भारताला २५३ धावांपर्यंत पोहोचता आले.
आज वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विक्रम नोंदवला आहे. आजच्या डावात भारतीय फलंदाजांनी मिळून तब्बल १९ गगनभेदी षटकार ठोकले आहेत. याआधी २०२४ च्या विश्वचषकात भारताने बांगलादेशविरुद्ध १३ षटकार मारले होते. तो रेकॉर्ड आज वानखेडेवर पार धुळीस मिळाला आहे.
भारताच्या या विशाल धावसंख्येचा पाया संजू सॅमसनच्या वादळी ८९ धावांनी रचला. त्याला शिवम दुबेने ४३ आणि ईशान किशनने ३९ धावा करत जबरदस्त साथ दिली. उपांत्य फेरीच्या सामन्यात आता इंग्लंडला विजयासाठी २० षटकांत २५४ धावांचे अतिविशाल आव्हान पार करावे लागेल. आता भारतीय गोलंदाज ही मॅच कशी जिंकून देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा काढण्याच्या प्रयत्नात ‘मॅच फिनिशर’ हार्दिक पांड्या रनआऊट झाला. त्याने अवघ्या १२ चेंडूंत ३ चौकार आणि २ उत्तुंग षटकारांच्या मदतीने २७ धावांची स्फोटक खेळी केली. डावाच्या अखेरीस अक्षर पटेल २ चेंडूंत २ धावांवर तर वरुण चक्रवर्ती १ चेंडूत ० धावांवर नाबाद परतले.
वानखेडे स्टेडियमवर आज टीम इंडियाच्या फलंदाजांनी अक्षरशः इतिहास रचला आहे! निर्धारित २० षटकांचा खेळ पूर्ण झाला असून भारताने इंग्लंडसमोर ७ बाद २५३ धावांचा महाकाय डोंगर उभा केला आहे. पहिल्या चेंडूपासून सुरू झालेला धावांचा पाऊस शेवटच्या चेंडूपर्यंत कायम राहिला, ज्यामुळे भारताची अंतिम धावगती (CRR) १२.६५ इतकी भयंकर होती. इंग्लंडच्या सर्व गोलंदाजांची आज चांगलीच पिसे निघाली आहेत.
हार्दिक पांड्या बाद झाल्यामुळे आता भारतीय डावाचा फक्त शेवटचा चेंडू (१९.५ षटके पूर्ण) शिल्लक राहिला आहे. टीम इंडियाचा धावफलक सध्या ७ बाद २५० असा अतिशय भक्कम स्थितीत आहे. आता शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलला साथ देण्यासाठी मैदानात कोण येतंय आणि या शेवटच्या बॉलवर किती धावा निघतायत, याकडे संपूर्ण वानखेडे स्टेडियमचं लक्ष लागलं आहे.
वानखेडेवर धावांचा पाऊस पाडणारा आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मोठी फटकेबाजी करणारा ‘मॅच फिनिशर’ हार्दिक पांड्या अखेर बाद झाला आहे. डावाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात मोठा फटका मारण्याच्या नादात हार्दिकने आपली विकेट गमावली. बाद होण्यापूर्वी त्याने ३ खणखणीत चौकार आणि २ गगनभेदी षटकारांच्या मदतीने २६ धावांची अत्यंत स्फोटक खेळी केली आणि संघाला २५० च्या पार नेण्यात मोलाचा वाटा उचलला.
तिलक वर्मा बाद झाल्यानंतर आता ‘फिनिशर’ हार्दिक पांड्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. हार्दिकने अवघ्या ११ चेंडूंत ३ खणखणीत चौकार आणि २ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद २६ धावा कुटल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट २३६.३६ च्या वेगात आहे. त्याला साथ देण्यासाठी आता अष्टपैलू अक्षर पटेल (२ चेंडूंत २ धावा) मैदानात आहे.
वानखेडेच्या मैदानावर आज टीम इंडियाने इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः कत्तल केली आहे. डावाच्या १९.४ षटकांतच भारताने ६ बाद २५० धावांचा प्रचंड डोंगर उभा केला आहे. भारतीय फलंदाजांनी आज असा काही धुमाकूळ घातला आहे की धावगती (CRR) आता थेट १२.७१ वर पोहोचली आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक आणि त्याचे सर्व गोलंदाज आज पूर्णपणे हतबल ठरले आहेत.
तिलक वर्माच्या या छोट्या पण अत्यंत आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाने १८.५ षटकांतच ६ बाद २३६ धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे. आतापर्यंत या डावात इंग्लंडने १० अतिरिक्त धावा (Extras) दिल्या आहेत. आता डावाचे अवघे ७ चेंडू शिल्लक आहेत.
वानखेडेवर सलग षटकार ठोकून जोफ्रा आर्चरची पिसे काढणारा तिलक वर्मा अखेर बाद झाला आहे. आर्चरनेच त्याला त्रिफळाचीत (Bowled) करत आपला बदला पूर्ण केला आहे. बाद होण्यापूर्वी तिलकने अवघ्या ७ चेंडूंत ३०० च्या भयंकर स्ट्राईक रेटने ३ उत्तुंग षटकारांच्या मदतीने २१ धावांची अतिशय स्फोटक खेळी केली.
तिलक वर्माच्या या अनपेक्षित आणि वादळी हल्ल्यामुळे टीम इंडियाने १८.३ षटकांतच ५ बाद २२९ धावांचा एवढा प्रचंड डोंगर उभा केला आहे. भारताचा रनरेट (CRR) आता थेट १२.४ वर गेला आहे. एका बाजूने तिलक आर्चरची धुलाई करत असताना, दुसऱ्या बाजूने ‘मॅच फिनिशर’ हार्दिक पांड्याही ८ चेंडूंत १४ धावांवर नाबाद खेळत आहे.
शिवम दुबे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या युवा तिलक वर्माने वानखेडेवर अक्षरशः कहर केला आहे. इंग्लंडचा सर्वात घातक मानला जाणारा गोलंदाज जोफ्रा आर्चरची त्याने पार पिसे काढली आहेत. आर्चरच्या गोलंदाजीवर तिलकने तब्बल ३ खणखणीत षटकार ठोकत इंग्लंडच्या तंबूत शांतता पसरवली आहे. या स्फोटक हल्ल्यामुळे तिलकने अवघ्या ६ चेंडूंत ३५० च्या भयंकर स्ट्राईक रेटने नाबाद २१ धावा कुटल्या आहेत. आज आर्चरची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्याने आपल्या ३.४ षटकांत तब्बल ५९ धावा लुटवल्या आहेत.
वानखेडेवर आज इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फुटला आहे. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज सॅम करन आज पूर्णपणे फ्लॉप ठरला असून त्याने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात तब्बल ५३ धावा लुटवल्या आहेत. सध्या ‘मॅच फिनिशर’ हार्दिक पांड्या ८ चेंडूंत १४ धावांवर (३ खणखणीत चौकार) नाबाद खेळत असून, तिलक वर्मानेही २ चेंडूंत ३ धावा करत आपलं खातं उघडलं आहे.
शिवम दुबे दुर्दैवीरीत्या रनआऊट झाल्यानंतर आता हार्दिक पांड्याची साथ देण्यासाठी युवा फलंदाज तिलक वर्मा मैदानात आला आहे. १८ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून टीम इंडियाने ५ बाद २१७ धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे. ५ विकेट्स गेल्यानंतरही भारताचा रनरेट १२.१ इतका जबरदस्त आहे.
शेवटच्या ‘डेथ ओव्हर्स’मध्ये जास्तीत जास्त धावा लुटण्याच्या नादात दोन फलंदाजांमध्ये जो गोंधळ उडतो, तोच इथे पाहायला मिळाला. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्यात धाव घेताना अचानक मोठं ‘मिसअंडरस्टँडिंग’ झालं आणि त्यात दुबेला आपली मौल्यवान विकेट गमवावी लागली. बाद होण्यापूर्वी त्याने ४३ धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्फोटक खेळी केली. आता शेवटच्या काही चेंडूंवर संपूर्ण जबाबदारी हार्दिक पांड्यावर आली आहे.
वानखेडेवर धावांचा पाऊस पडत असतानाच टीम इंडियाला एक अत्यंत अनपेक्षित आणि दुर्दैवी धक्का बसला आहे. खेळपट्टीवर चांगलाच जम बसवलेला आणि आपल्या अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचलेला ‘सिक्सर किंग’ शिवम दुबे दुर्दैवीरीत्या रनआऊट (Run Out) होऊन तंबूत परतला आहे.
शेवटच्या षटकांमध्ये आता ‘सिक्सर किंग’ शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई सुरू केली आहे. दुबे २४ चेंडूंत ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ४३ धावांवर नाबाद खेळत असून तो आता आपल्या अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तर दुसऱ्या बाजूला ‘मॅच फिनिशर’ हार्दिक पांड्यानेही अवघ्या ६ चेंडूंत ३ खणखणीत चौकार ठोकत १३ धावा कुटल्या आहेत. या दोघांचा २०० च्या आसपासचा स्ट्राईक रेट इंग्लंडचं टेन्शन वाढवत आहे.
संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतरही भारताची धावगती अजिबात कमी झालेली नाही. टीम इंडियाने अवघ्या १७.१ षटकांतच ४ बाद २११ धावांचा महाकाय टप्पा गाठला आहे. भारताचा रनरेट अजूनही १२.३ इतका जबरदस्त आहे. वानखेडेवर आज धावांचा अक्षरशः पाऊस पडत असून सॅम करन आणि जेमी ओव्हरटनसारखे इंग्लंडचे गोलंदाज पार हतबल झाले आहेत.
वानखेडेवर आता खऱ्या अर्थाने ‘डेथ ओव्हर्स’चा (शेवटची ४ षटके) थरार सुरू झाला आहे. एका बाजूने शिवम दुबे २१ चेंडूंत ३५ धावांवर (३ उत्तुंग षटकार) नाबाद खेळत असून त्याने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. आता सूर्या बाद झाल्यानंतर त्याला साथ देण्यासाठी ‘मॅच फिनिशर’ हार्दिक पांड्या मैदानात आला आहे. उरलेल्या २४ चेंडूंत ही स्फोटक जोडी इंग्लंडच्या गोलंदाजांची कशी पिसं काढते आणि टीम इंडियाची धावसंख्या किती पुढे नेते, याकडे संपूर्ण स्टेडियमचे डोळे लागले आहेत.
संजू सॅमसन बाद झाल्यानंतर मैदानात आलेला कर्णधार सूर्यकुमार यादवही फार काळ टिकू शकला नाही. आदिल रशीदच्या फिरकीवर मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्या (६ चेंडूंत ११ धावा) यष्टिचित (Stumped) झाला. दोन लागोपाठच्या विकेट्स गेल्या असल्या, तरी टीम इंडियाची धावगती (११.९ CRR) अजिबात कमी झालेली नाही. १६ षटकांअखेर भारताने ४ बाद १९० धावांचा प्रचंड डोंगर उभा केला आहे. वानखेडेवर आज इंग्लंडच्या गोलंदाजांना कुठूनही दिलासा मिळताना दिसत नाहीये.
सूर्याच्या या अनपेक्षित आणि लवकर बाद होण्यामुळे वानखेडेच्या स्टेडियमवर पुन्हा एकदा शांतता पसरली आहे. एका बाजूला शिवम दुबे खेळपट्टीवर उभा असला, तरी आता पडझड रोखण्यासाठी आणि धावगती कायम ठेवण्यासाठी त्याच्या साथीला ‘मॅच फिनिशर’ हार्दिक पांड्या मैदानात येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. धावसंख्या १६० च्या वर असली तरी, या दोन मोठ्या विकेट्समुळे इंग्लंडचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
वानखेडेवर संजू सॅमसन बाद झाल्याचा धक्का ओसरतो न ओसरतो तोच, टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. संजूची जागा घेण्यासाठी मैदानात आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव (सूर्या दादा) फार काळ टिकू शकला नाही आणि तोही तंबूत परतला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी या दोन मोठ्या विकेट्स घेत सामन्यात अचानक जोरदार कमबॅक केलं आहे.
अभिषेक शर्मा आणि ईशान किशन लवकर बाद झाल्यानंतर संजूने एकट्याने इंग्लंडच्या गोलंदाजी आक्रमणाचा पार धुव्वा उडवला होता. त्याचा तो २१७ चा भयंकर स्ट्राईक रेट इंग्लंडला चांगलाच महागात पडला. संजू बाद झाला असला, तरी त्याने आजच्या या महत्त्वाच्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाला एका विशाल धावसंख्येचा भक्कम पाया रचून दिला आहे. आता तो तंबूत परतल्यानंतर दुसऱ्या बाजूला असलेला ‘सिक्सर किंग’ शिवम दुबे ही आक्रमकता कशी पुढे नेतो, हे पाहणे चुरशीचे ठरणार आहे.
वानखेडेवर ऐतिहासिक शतकाकडे सुसाट निघालेला संजू सॅमसन अखेर बाद झाला आहे. अवघ्या ११ धावांसाठी त्याचे शतक हुकले आणि संपूर्ण स्टेडियममध्ये क्षणासाठी एकदम शांतता पसरली. बाद होण्यापूर्वी संजूने इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढत ४१ चेंडूंत ८९ धावांची (८ चौकार, ७ उत्तुंग षटकार) अतिशय वादळी खेळी केली. धावांचा पाऊस पाडणाऱ्या संजूची विकेट मिळवणे, हे इंग्लंडसाठी या सामन्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे.
इंग्लंडचा हुकमी एक्का जोफ्रा आर्चर आज पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत आपल्या ३ षटकांत तब्बल ४१ धावा दिल्या आहेत. एका बाजूने संजू सॅमसन शतकवीर होण्याच्या मार्गावर असताना, दुसऱ्या बाजूने शिवम दुबे (१२ चेंडूंत १८ धावा) त्याला उत्तम साथ देत आहे.
आज संजू सॅमसन वानखेडेवर इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. तो आपल्या बहुचर्चित शतकापासून फक्त ११ धावा दूर आहे. सध्या तो ४१ चेंडूंत तब्बल ८९ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याने आतापर्यंत ८ खणखणीत चौकार आणि तब्बल ७ उत्तुंग षटकार ठोकले असून, त्याचा स्ट्राईक रेट २१७ च्या भयंकर वेगात आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजांची वानखेडेवर अक्षरशः कत्तल सुरू आहे. १३ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून टीम इंडियाने २ बाद १६० धावांचा प्रचंड डोंगर उभा केला आहे. जोफ्रा आर्चरच्या या ओव्हरमध्ये १५ धावा वसूल करत भारतीय फलंदाजांनी धावगती (CRR) १२.३ वर नेऊन ठेवली आहे. आज इंग्लंडचा एकही गोलंदाज या वादळाला रोखू शकलेला नाही.
एका बाजूने शिवम दुबे इंग्लंडच्या गोलंदाजांना धूत असताना, संजू सॅमसनने अगदी हुशारीने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं आहे. संजू सध्या ३८ चेंडूंत नाबाद ७६ धावांवर (८ चौकार, ५ षटकार) भक्कमपणे उभा आहे. त्याचा २०० चा स्ट्राईक रेट अजूनही कायम आहे. आता या स्फोटक जोडीला फोडण्यासाठी इंग्लंडला काहीतरी चमत्कारच करावा लागेल.
संजू सॅमसन एका बाजूने किल्ला लढवत असतानाच, आता दुसऱ्या बाजूने शिवम दुबेनेही आपले खतरनाक इरादे स्पष्ट केले आहेत. सुरुवातीचे काही चेंडू शांत खेळणाऱ्या दुबेने थेट गिअर बदलत २ गगनभेदी षटकार ठोकले आहेत. तो आता अवघ्या ९ चेंडूंत १७ धावांवर खेळत असून त्याचा स्ट्राईक रेटही १८८ च्या पुढे गेला आहे.
वानखेडेवर टीम इंडियाच्या धावांची एक्सप्रेस थांबायचं नाव घेत नाहीये. १२ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून भारताने २ बाद १४५ धावांचा मोठा पल्ला गाठला आहे. विशेष म्हणजे भारताचा रनरेट (CRR) आता १२.१ वर पोहोचला आहे. हॅरी ब्रूकने गोलंदाजीत कितीही बदल केले, तरी इंग्लंडला धावांचा ओघ रोखण्यात पूर्णपणे अपयश आलं आहे.
वानखेडेवर संजू सॅमसनच्या या एकतर्फी वर्चस्वामुळे टीम इंडियाने सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली आहे. ११ षटकांअखेर ताज्या ‘लाईव्ह विनिंग पर्सेंटेज’ नुसार, भारताच्या विजयाची शक्यता आता ८७ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर इंग्लंडचा संघ अवघ्या १३ टक्क्यांवर फेकला गेला आहे. हॅरी ब्रूकचे सगळे गोलंदाज आज निष्प्रभ ठरताना दिसत आहेत.
संजू सॅमसन आज वानखेडेवर शतक ठोकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरल्याचे स्पष्ट दिसत आहे. तो सध्या अवघ्या ३७ चेंडूंत नाबाद ७५ धावांवर खेळत आहे. त्याने आतापर्यंत ८ खणखणीत चौकार आणि तब्बल ५ गगनभेदी षटकार ठोकले आहेत. त्याचा २०२.७० चा भयंकर स्ट्राईक रेट इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः झोप उडवत आहे. दुसऱ्या बाजूने शिवम दुबे (४ चेंडूंत ३ धावा) संयमाने खेळत त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम करत आहे.
ईशान किशन बाद झाल्यानंतरही टीम इंडियाने धावांचा वेग अजिबात कमी होऊ दिलेला नाही. ११ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून भारताने २ बाद १३० धावांचा भक्कम पल्ला गाठला आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर भारताचा रनरेट अजूनही ११.८ इतका जबरदस्त आहे. जेमी ओव्हरटनच्या या ११ व्या षटकातही भारतीय फलंदाजांनी ११ धावा वसूल करत इंग्लंडवरील दबाव कायम ठेवला आहे.
१० षटकांअखेर ताज्या आकडेवारीनुसार भारताच्या विजयाची शक्यता भक्कम ८४ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर इंग्लंड केवळ १६ टक्क्यांवर आहे. सॅम करन आणि आदिल रशीदसारखे गोलंदाज धावा रोखण्यात अपयशी ठरले आहेत. आता इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक विकेट्स काढण्यासाठी कोणता नवा प्लॅन आखतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एका बाजूला ईशान किशनची विकेट गेली असली तरी संजू सॅमसन आज थांबण्याचं नाव घेत नाहीये. तो सध्या ३४ चेंडूंत ६७ धावांवर नाबाद खेळत आहे. त्याने आतापर्यंत ८ खणखणीत चौकार आणि ४ उत्तुंग षटकार ठोकले असून त्याचा स्ट्राईक रेट अजूनही १९७ च्या घरात आहे. आता त्याला साथ देण्यासाठी ‘सिक्सर किंग’ शिवम दुबे मैदानात आला असून त्याने १ चेंडूत १ धाव काढून आपलं खातं उघडलं आहे.
वानखेडेवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्या १० षटकांचा खेळ पूर्ण झाला असून भारताने २ बाद ११९ धावांचा एवढा मोठा डोंगर उभा केला आहे. सध्या भारताचा रनरेट (CRR) ११.९ इतका आहे. संजू सॅमसन आणि ईशान किशनने दिलेल्या स्फोटक सुरुवातीमुळे टीम इंडिया आज एका विशाल धावसंख्येच्या दिशेने सुसाट निघाली आहे.
ईशान किशन बाद झाल्यानंतर टीम इंडियाने एक मोठा रणनीतिक बदल (Masterstroke) केला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः न येता त्याने डावखुऱ्या शिवम दुबेला फलंदाजीसाठी प्रमोट केलं आहे. आदिल रशीदसारख्या फिरकीपटूंवर आक्रमण करण्यासाठी आणि ११७ च्या धावसंख्येला आणखी वेगाने पुढे नेण्यासाठी दुबेला मैदानात उतरवण्यात आलं आहे. आता एका बाजूला ६६ धावांवर खेळणारा संजू सॅमसन आणि दुसऱ्या बाजूला शिवम दुबे, अशी अत्यंत स्फोटक जोडी खेळपट्टीवर आहे.
वानखेडेवर चौकार-षटकारांची बरसात करणारी संजू-ईशानची भक्कम जोडी अखेर फुटली आहे. इंग्लंडचा अनुभवी फिरकीपटू आदिल रशीदने १० व्या षटकात (९.३ ओव्हर्स) ईशान किशनला बाद करत इंग्लंडला मोठं यश मिळवून दिलं आहे. विल जॅक्सने त्याचा झेल पकडला. बाद होण्यापूर्वी ईशानने अवघ्या १८ चेंडूंत ३९ धावांची (४ चौकार, २ षटकार) अतिशय स्फोटक खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता.
भारताची ही स्फोटक फलंदाजी पाहून इंग्लंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. सॅम करन आणि लियाम डॉसनसारख्या गोलंदाजांची जोरदार धुलाई होत आहे. ९ षटकांतच भारताची धावसंख्या ११२ वर पोहोचल्यामुळे आज वानखेडेवर २००-२२० पेक्षा जास्त धावांचा टप्पा सहज पार होईल, असा स्पष्ट अंदाज दिसत आहे.
एका बाजूला संजू सॅमसन आपला रुद्रावतार चालूच ठेवत ३१ चेंडूंत ६५ धावांवर (८ चौकार, ४ षटकार) नाबाद खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूने ईशान किशननेही टॉप गिअर टाकत अवघ्या १६ चेंडूंत ३५ धावा (३ चौकार, २ षटकार) कुटल्या आहेत. या दोघांचाही स्ट्राईक रेट २०० च्या वर असल्यामुळे इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक पूर्णपणे गोंधळून गेला आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजांना टीम इंडियाच्या फलंदाजांनी अक्षरशः सळो की पळो करून सोडलं आहे. अवघ्या ९ षटकांचा खेळ पूर्ण झाला असून भारताने १ बाद ११२ धावांचा डोंगर उभा केला आहे. सध्या भारताचा रनरेट (CRR) १२.४ इतका आहे. वानखेडेच्या पाटा खेळपट्टीचा आणि छोट्या बाउंड्रीचा भारतीय फलंदाज पुरेपूर फायदा उचलत आहेत.
पॉवरप्ले संपल्यानंतरही धावांचा वेग कमी करण्यात इंग्लंडला कोणतंही यश आलेलं नाही. फिरकीपटू असो वा वेगवान गोलंदाज, सर्वांचीच आज वानखेडेवर जोरदार धुलाई होत आहे. अवघ्या ५१ चेंडूंत (८.३ षटके) १०० धावा कुटत भारताने या उपांत्य फेरीत इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे. रोहित-विराट नसतानाही टीम इंडियाची ही तरुण फळी जबरदस्त खेळ दाखवत आहे.
वानखेडेवर संजू सॅमसन आणि ईशान किशनने अक्षरशः कहर केला आहे. इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला या दोघांवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. या स्फोटक जोडीच्या जोरावर टीम इंडियाने अवघ्या ८.३ षटकांतच १०० धावांचा टप्पा अत्यंत दिमाखात ओलांडला आहे. सध्याचा रनरेट पाहता आज वानखेडेवर धावांचा मोठा डोंगर उभा राहणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
वानखेडेवर संजू आणि ईशानच्या या स्फोटक फलंदाजीमुळे टीम इंडियाने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली आहे. ताज्या ‘लाईव्ह विनिंग पर्सेंटेज’च्या आकडेवारीनुसार, भारताच्या विजयाची शक्यता आता थेट ८४ टक्क्यांवर गेली आहे, तर इंग्लंड केवळ १६ टक्क्यांवर फेकला गेला आहे. ही जोडी अशीच आणखी काही षटके टिकली, तर इंग्लंडसाठी या सामन्यात परतणे जवळपास अशक्य होईल.
एका बाजूने संजू सॅमसन २७ चेंडूंत ५३ धावांवर (७ चौकार, ३ षटकार) नाबाद खेळत असतानाच, आता दुसऱ्या बाजूने ईशान किशननेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉसनच्या षटकात मोठा फटका मारत ईशानने १४ चेंडूंत नाबाद २८ धावा (३ चौकार, १ षटकार) पूर्ण केल्या आहेत. या दोन आक्रमक फलंदाजांची जोडी फोडण्यासाठी आता इंग्लंडचे गोलंदाज अक्षरशः हतबल झालेले दिसत आहेत.
अभिषेक शर्माची विकेट लवकर गेल्यानंतरही संजूने टीम इंडियावर दडपण अजिबात वाढू दिलं नाही. त्याने थेट २०० च्या स्ट्राईक रेटने हल्ला चढवत इंग्लंडच्या पूर्ण प्लॅनिंगची वाट लावली आहे. आता ईशान किशनही त्याला उत्तम साथ देत असल्यामुळे, टीम इंडिया एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने सुसाट निघाली आहे.
हॅरी ब्रूकने पहिल्याच ओव्हरमध्ये सोडलेला तो कॅच इंग्लंडला आता खऱ्या अर्थाने रडवतोय! संजू सॅमसनने इंग्लंडच्या गोलंदाजांचा निर्दयीपणे समाचार घेत अवघ्या २६ चेंडूंत आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले आहे. तो सध्या ५२ धावांवर नाबाद खेळत असून, त्याच्या या खणखणीत खेळीने वानखेडेवरच्या प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे.
आज संजू सॅमसन इंग्लंडच्या गोलंदाजांना अजिबात जुमानत नाहीये. तो आता आपल्या वादळी अर्धशतकापासून अवघी ४ पावले दूर आहे. सध्या तो २५ चेंडूंत ४६ धावांवर (७ चौकार, २ षटकार) नाबाद खेळत आहे. दुसऱ्या बाजूला ईशान किशनही १० चेंडूंत १७ धावा करत स्ट्राईक रोटेट करण्याचं आणि गरज पडेल तिथे बाउंड्री मारण्याचं काम उत्तम प्रकारे करत आहे.
पॉवरप्ले संपताच सीमारेषेवर फिल्डर्स वाढले आणि हॅरी ब्रूकने लगेचच आपला अनुभवी फिरकीपटू आदिल रशीदला गोलंदाजीला आणलं. रशीदने पहिल्याच षटकात थोडा अंकुश ठेवत फक्त ६ धावा दिल्या. तरीही ७ षटकांअखेर भारताने १ बाद ७३ धावांचा टप्पा गाठला असून, धावगती अजूनही भक्कम १०.४३ च्या घरात आहे.
पॉवरप्लेमधील भारताची ही स्फोटक फलंदाजी पाहून इंग्लंडचा संघ आणि गोलंदाज पूर्णपणे दडपणाखाली आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, या महासंग्रामात आता भारताच्या विजयाची शक्यता थेट ७७ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर इंग्लंड केवळ २३ टक्क्यांवर फेकला गेला आहे. जेमी ओव्हरटन आणि सॅम करनसारख्या गोलंदाजांवर भारतीय फलंदाजांनी स्पष्टपणे वर्चस्व गाजवलं आहे.
हॅरी ब्रूकने कॅच सोडल्यानंतर संजू सॅमसन इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढतोय. पॉवरप्ले संपेपर्यंत संजूने अवघ्या २० चेंडूंत नाबाद ४१ धावा कुटल्या आहेत. यात तब्बल ६ खणखणीत चौकार आणि २ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. तो सध्या २०५ च्या स्ट्राईक रेटने खेळत असून आपल्या अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. दुसऱ्या बाजूने ईशान किशनही ९ चेंडूंत १६ धावा (३ चौकार) करत त्याला साथ देत आहे.
वानखेडेवर टीम इंडियाने पहिल्या ६ षटकांचा (पॉवरप्ले) पुरेपूर फायदा उचलला आहे. विल जॅक्सने अभिषेक शर्माची विकेट लवकर काढली असली, तरी संजू सॅमसन आणि ईशान किशनने धावगती अजिबात कमी होऊ दिली नाही. ६ षटकांअखेर भारताने १ बाद ६७ धावांचा डोंगर उभा केला असून, संघाचा रनरेट थेट ११.२ वर पोहोचला आहे.
मोठ्या नॉकआऊट सामन्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माने नेहमीच ‘संकटमोचक’ बनून सामने फिरवले आहेत. रोहितची मागच्या सेमीफायनलमधली ५७ धावांची खेळी असो वा विराटची फायनलमधली ७६ धावांची खेळी, आज या दिग्गजांची आठवण नक्कीच येत आहे. पण संजू आणि ईशान ज्या बेधडकपणे इंग्लंडच्या गोलंदाजांना फोडून काढत आहेत, ते पाहता ते रोहित-विराटचाच आक्रमक वारसा समर्थपणे पुढे चालवताना दिसत आहेत.
पॉवरप्लेमध्येच भारताने एवढी आक्रमक सुरुवात केली आहे की ‘लाईव्ह विनिंग पर्सेंटेज’चे आकडे पूर्णपणे टीम इंडियाच्या बाजूने झुकले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार भारताच्या विजयाची शक्यता आता थेट ७६ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर इंग्लंड फक्त २४ टक्क्यांवर फेकला गेला आहे. संजू आणि ईशानची ही जोडी अशीच खेळत राहिली, तर इंग्लंडचे गोलंदाज लवकरच हात टेकतील असा स्पष्ट अंदाज दिसत आहे.
वानखेडेवर टीम इंडियाने पहिल्या ५ षटकांतच इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विल जॅक्सने अभिषेक शर्माला (९ धावांवर) कॅच आऊट करत भारताला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर टीम इंडियाने ५ षटकांत १ बाद ५५ धावांचा टप्पा गाठला आहे. संजू सॅमसन तब्बल २०६ च्या स्ट्राईक रेटने खेळत असून त्याने १५ चेंडूंत ३१ धावा (४ चौकार, २ षटकार) कुटल्या आहेत. ईशान किशनही त्याला कडक साथ देत ८ चेंडूंत १५ धावांवर नाबाद आहे.
हॅरी ब्रूकने सोडलेला तो कॅच इंग्लंडला किती महागात पडणार? याचं उत्तर संजू सॅमसनने अवघ्या काही चेंडूंतच दिलं आहे. अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानंतर टीम इंडिया दबावात येईल असा इंग्लंडचा अंदाज होता. पण संजूने हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरवला आहे.
सध्या वानखेडेवर संजूची बॅट आग ओकत आहे. त्याने अवघ्या १४ चेंडूंत ३० धावा कुटत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली आहेत. जीवदान मिळाल्यानंतर तो आणखी आक्रमक झाला असून त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांची बरसात सुरू केली आहे.
संजूच्या या वादळी फलंदाजीमुळे ४ षटकांअखेर टीम इंडियाने ४५ धावांवर १ बाद अशी भक्कम मजल मारली आहे.
अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव सावरण्यासाठी आता तिसऱ्या क्रमांकावर डावखुरा फलंदाज ईशान किशन मैदानात आला आहे. वानखेडेवर सुरुवातीच्या थरारानंतर आता ३ षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे.
एका बाजूला संजू सॅमसनला कॅच सुटल्यामुळे मिळालेलं मोठं जीवदान आणि दुसऱ्या बाजूला ईशानची आक्रमक शैली, यावरच आता टीम इंडियाची मदार आहे. पॉवरप्लेची उरलेली ३ षटके हातात असून, या दोघांना आता इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करत धावगती वाढवावी लागणार आहे.
वानखेडेवर आताच एक अत्यंत नाट्यमय आणि मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चरला धुणारा संजू सॅमसन आता बाद होता होता थोडक्यात बचावला आहे.
आर्चरच्या वेगवान आणि बाऊन्सर चेंडूवर फटका मारण्याच्या नादात संजूच्या बॅटची कडा लागली. चेंडू हवेत गेला खरा, पण स्वतः इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने हा अत्यंत महत्त्वाचा कॅच हातातून निसटू दिला. अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानंतर टीम इंडियाला सावरण्याची पूर्ण जबाबदारी आता संजूवरच आहे. अशा वेळी फॉर्ममध्ये असलेल्या सॅमसनला मिळालेलं हे मोठं जीवदान इंग्लंडला आज खूप महागात पडू शकतं. या चुकीनंतर आता वानखेडेवर संजू आणखी आक्रमक होणार का, हे पाहणं रंजक ठरेल.
वानखेडेवर टीम इंडियाची आक्रमक सुरुवात झाल्यानंतर लगेचच मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने दुसऱ्या षटकात फिरकीपटू विल जॅक्सच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याचा हा ‘मास्टरस्ट्रोक’ अगदी अचूक ठरला. जॅक्सने सलामीवीर अभिषेक शर्माला बाद करत भारताची पहिली विकेट काढली आहे. पहिल्या षटकात संजू सॅमसनने आर्चरला धुतल्यानंतर मिळालेली ही विकेट इंग्लंडला नक्कीच सामन्यात परत आणणारी आहे.
जोफ्रा आर्चरच्या पहिल्या महागड्या षटकानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने लगेचच रणनीती बदलली आहे. वेगवान गोलंदाजाऐवजी त्याने दुसऱ्या षटकासाठी थेट फिरकीपटू विल जॅक्सला गोलंदाजीला आणले आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची आक्रमकता सुरुवातीलाच रोखण्यासाठी ब्रूकने हा मोठा डाव टाकला आहे. वानखेडेच्या खेळपट्टीवर पॉवरप्लेमध्येच जॅक्सच्या फिरकीला अभिषेक शर्मा कसं उत्तर देतो, यावर आता सर्वांच्या नजरा आहेत.
संजू सॅमसनने आर्चरला मारलेला तो ‘क्लासिक’ षटकार पाहून वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी अक्षरशः एकच कल्ला केला आहे. संपूर्ण स्टेडियममध्ये सध्या फक्त ‘संजू… संजू…’ च्या घोषणा घुमत आहेत. सुरुवातीच्या पॉवरप्लेचा (पहिली ६ षटके) जास्तीत जास्त फायदा उचलून इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा टीम इंडियाचा स्पष्ट प्लॅन यातून दिसून येत आहे.
जोफ्रा आर्चरसारख्या घातक गोलंदाजाला पहिल्याच ओव्हरमध्ये धूळ चारत संजू सॅमसनने टीम इंडियाचे इरादे स्पष्ट केले आहेत. तिसऱ्या चेंडूवर कडक चौकार आणि लगेच चौथ्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकत संजूने आर्चरची लय पूर्णपणे बिघडवली. पहिल्या ओव्हरअखेर भारताने विनाबाद १२ धावा कुटत अत्यंत आक्रमक आणि दमदार सुरुवात केली आहे.
सामन्यापूर्वीच अशी जोरदार चर्चा होती की आर्चरचा वेग आणि ‘हार्ड लेंथ’ सॅमसनसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. पण संजूने आज वेगळ्याच इराद्याने मैदानात पाऊल ठेवलंय. पहिल्या ४ चेंडूंतच १० धावा कुटून त्याने थेट आर्चरच्याच गोलंदाजीवर मोठा हल्लाबोल केलाय. आता या षटकातले उरलेले चेंडू आर्चर कसे टाकतो आणि त्याला सॅमसन कसं उत्तर देतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या नजरा खिळल्या आहेत.
सामन्याचा पहिलाच चेंडू पडला आणि सध्या टीम इंडियाचा स्कोअर पहिल्या ४ चेंडूंमध्येच विनाबाद १० धावांवर पोहोचला आहे. संजू सॅमसनने अगदी सुरुवातीपासूनच ‘अटॅकिंग’ (आक्रमक) पवित्रा घेतल्यामुळे जोफ्रा आर्चर आणि इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक सुरुवातीलाच दबावाखाली आलेले दिसत आहेत. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी किती अनुकूल आहे, हे सॅमसनच्या या बेधडक फटक्यांवरून स्पष्ट दिसत आहे.
सुरुवातच इतकी वादळी होईल, याचा इंग्लंडने स्वप्नातही विचार केला नसेल! जोफ्रा आर्चर विरुद्ध संजू सॅमसन या बहुचर्चित लढतीत सॅमसनने पहिल्याच ओव्हरमध्ये आपला हिसका दाखवून दिला आहे. आर्चरच्या गोलंदाजीवर संजूने तिसऱ्या चेंडूवर खणखणीत चौकार वसूल केला आणि त्यानंतर लगेचच चौथ्या चेंडूवर गगनभेदी षटकार ठोकत वानखेडे स्टेडियमला अक्षरशः वेड लावलं आहे.
पंचांनी ‘प्ले’ (Play) चा अधिकृत इशारा दिला आहे. वानखेडे स्टेडियमवरची शांतता आणि चाहत्यांची धाकधूक आता स्पष्ट जाणवतेय. अभिषेक शर्मा स्ट्राईकवर असून जोफ्रा आर्चरचा नवा कोरा चेंडू खेळण्यासाठी तो अगदी तयार आहे. उपांत्य फेरीच्या या महाथराराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे.
राष्ट्रगीत संपताच भारतीय चाहत्यांचा जल्लोष शिगेला पोहोचला आहे. पंचांनी (Umpires) मैदानाचा ताबा घेतला असून, टीम इंडियाचे सलामीवीरसंजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा खेळपट्टीवर दाखल झाले आहेत. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने आपल्या खेळाडूंना शेवटच्या टिप्स दिल्या असून, पहिलाच षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सज्ज झाला आहे.
भारत आणि इंग्लंडचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी (National Anthem) वानखेडेच्या हिरव्यागार मैदानावर दाखल झाले आहेत. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांनी मोबाईलचे फ्लॅशलाईट्स सुरू केले असून, संपूर्ण वानखेडे ‘जन गण मन’च्या निनादाने दुमदुमून गेलंय. हा प्रसंग पाहून आज टीम इंडियाचा आणि चाहत्यांचा उत्साह नक्कीच गगनाला भिडला आहे.
दुसरीकडे, इंग्लंडच्या संघात मात्र एक अत्यंत महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला आहे. वानखेडेच्या खेळपट्टीचा वेग लक्षात घेऊन इंग्लंडने फिरकीपटू रेहान अहमदला बाहेर बसवलं असून, त्याच्या जागी वेगवान अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटनला संघात सामील केलं आहे.
अधिकृत इंग्लंडचा संघ: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद.
सूर्यकुमार यादवने आपल्या यशस्वी ‘विनिंग कॉम्बिनेशन’वरच पूर्ण विश्वास दाखवला आहे. मागच्या सामन्यात वेस्ट इंडिजला हरवणाऱ्या संघात आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अधिकृत भारतीय संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंडने गोलंदाजी निवडल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने चाहत्यांची धाकधूक एका वाक्यात कमी केली आहे. “आम्ही टॉस जिंकलो असतो, तरी प्रथम फलंदाजीच निवडली असती,” असा मोठा खुलासा सूर्याने केला आहे. वानखेडेवर आज हवा खेळती असल्यामुळे दुसऱ्या डावात दव (Dew) पडण्याची फारशी शक्यता नाही, असा स्पष्ट अंदाज सूर्याने व्यक्त केला आहे.
अखेर ज्या क्षणाची सर्व चाहते वाट पाहत होते, तो क्षण आला आहे. वानखेडे स्टेडियमवर नाणेफेकीचा (Toss) कौल इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकच्या बाजूने लागला आहे. ब्रूकने कोणताही वेळ न दवडता प्रथम गोलंदाजी (चेस) करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, भारतीय संघाला आता प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागेल आणि इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभा करावा लागेल.
सध्या ‘एक्स’ (ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर #INDvsENG आणि #T20WorldCup हे दोन कीवर्ड्स टॉप ट्रेंडिंगमध्ये आहेत. सोशल मीडियावर चाहते प्रामुख्याने दोनच गोष्टींवर चर्चा करत आहेत. पहिली म्हणजे ‘वानखेडेवरचा टॉस कोण जिंकणार?’ आणि दुसरी म्हणजे ‘रोहित-विराटची उणीव’. मागच्या विश्वचषकात इंग्लंडला धुळ चारणाऱ्या या दोन दिग्गजांशिवाय टीम इंडियाच्या तरुण फळीची ही सर्वात मोठी परीक्षा असणार आहे, अशीच चर्चा सध्या इंटरनेटवर सुरू आहे.
वानखेडेवर होणाऱ्या या महासंग्रामात गुगल आणि क्रिकेट विश्लेषकांचे ताजे अंदाज (Win Probability) आता समोर आले आहेत. घरच्या मैदानावर आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा फायदा टीम इंडियाला मिळत असून, भारताच्या विजयाची शक्यता ५४ टक्के वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे इंग्लंडच्या विजयाचा अंदाज ४६ टक्के आहे. पण टी-२० फॉरमॅटचा वेग आणि इंग्लंडचा ‘नेव्हर गिव्ह अप’ ॲटिट्यूड पाहता, हा फरक कधीही पुसला जाऊ शकतो.
वानखेडेची खेळपट्टी आणि इथली छोटी बाउंड्री लाईन पाहता, इथं २०० धावांचं लक्ष्यही सुरक्षित मानलं जात नाही. २०१६ मध्ये विंडीजने भारताचं १९२ धावांचं तगडं आव्हान सहज पार केलं होतं. त्यामुळे आजच्या या IND vs ENG T20 World Cup 2026 उपांत्य फेरीत जो संघ धावांचा पाठलाग (चेस) करेल, त्याचं पारडं निश्चितच जड असेल असा क्रिकेट तज्ज्ञांचा अंदाज आहे.
२०१६ च्या त्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून डोळे झाकून प्रथम गोलंदाजी घेतली होती. दुसऱ्या डावात पडलेल्या प्रचंड दवामुळे (Dew) भारतीय गोलंदाजांना चेंडू पकडणंही अक्षरशः कठीण झालं होतं. आजच्या या हाय-व्होल्टेज सामन्यातही तोच ‘दव’ फॅक्टर गेम चेंजर ठरू शकतो. त्यामुळे आज वानखेडेवर नाणेफेकीचा (Toss) निकाल अक्षरशः अर्धी मॅच ठरवणार आहे.
भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी २०१६ ची ती रात्र आजही कुणी विसरू शकणार नाही. याच वानखेडेवर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने भारताचं फायनलचं स्वप्न एका झटक्यात धुळीस मिळवलं होतं. विराट कोहलीने ८९ धावांची वादळी खेळी करूनही भारताला तो सामना गमवावा लागला होता. आज इंग्लंडविरुद्ध पुन्हा तोच इतिहास घडू नये, यासाठी सूर्याच्या सेनेला प्रचंड सावध राहावं लागणार आहे.
वानखेडेवर दोन्ही संघांचा जोरदार सराव सुरू असून चाहत्यांची धाकधूक आता वाढू लागली आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली अधिकृत ‘प्लेइंग ११’ बरोबर संध्याकाळी ६:३० वाजता नाणेफेकीच्या (Toss) वेळी जाहीर केली जाईल. कर्णधार सूर्यकुमार यादव आज संघात कोणता धक्कादायक बदल करणार का, की जुन्याच ‘विनिंग कॉम्बिनेशन’वर विश्वास ठेवणार, याचा मोठा खुलासा अवघ्या काही मिनिटांतच होणार आहे. सर्वात आधी आणि १००% अचूक प्लेइंग ११ तुम्हाला इथेच पाहायला मिळेल. आमच्यासोबत जोडलेले राहा!
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आज पहिल्यांदाच टीम इंडिया रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळत आहे. मागच्या २०२४ च्या विश्वचषकात जेव्हा हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत भिडले होते, तेव्हा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा इंग्लंडच्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला होता. त्याने अत्यंत कठीण खेळपट्टीवर ३९ चेंडूंत ५७ धावांची (६ चौकार आणि २ षटकार) वादळी खेळी केली होती. त्याच्या याच कॅप्टन्स नॉकच्या जोरावर भारताने इंग्लंडला ६८ धावांनी धूळ चारून स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता. आज वानखेडेच्या घरच्या मैदानावर या दोन दिग्गजांची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. पण आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताची तरुण ब्रिगेड तोच इतिहास पुन्हा गिरवण्यासाठी सज्ज झाली आहे.
आता सर्वांच्या नजरा बरोबर ६:३० वाजता होणाऱ्या नाणेफेकीकडे (Toss) लागल्या आहेत. नाणेफेकीसाठी आता अवघा सव्वा तास शिल्लक आहे. सूर्या आणि हॅरी ब्रूक जेव्हा टॉससाठी मैदानात येतील, तेव्हा चाहत्यांची धाकधूक शिगेला पोहोचलेली असेल. नाणेफेकीचा कौल जो जिंकेल, तो फायनलच्या दिशेने पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल टाकेल, असेच सध्याचे वानखेडेवरचे समीकरण आहे.
सामना सुरू व्हायला अजून वेळ असला तरी, वानखेडे स्टेडियम आता जवळपास ८० टक्के भरले आहे. संपूर्ण स्टेडियममध्ये चाहत्यांच्या निळ्या जर्सीची लाट उसळली असून, प्रेक्षकांच्या ‘वंदे मातरम’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी अक्षरशः अंगावर काटा आणला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना या प्रचंड दडपणाचा सामना करावा लागणार, हे इथल्या वातावरणावरून स्पष्ट जाणवतंय.
भारतीय खेळाडूंनी मैदानावर ‘वॉर्म-अप’ला (सराव) सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग एका बाजूला गोलंदाजीचा सराव करत असून, अचूक यॉर्कर टाकण्यावर त्यांचा खास भर दिसत आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंडचे फलंदाजही नॉकिंग (Knocking) करताना दिसत आहेत. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसमोर सराव करत असल्यामुळे स्टेडियममधला माहोल आता चांगलाच तापला आहे.
टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर दाखल झाली असून, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी थेट खेळपट्टीकडे धाव घेतली आहे. दोघेही खेळपट्टीचा अगदी बारकाईने अभ्यास करत असून, क्युरेटरसोबत त्यांची चर्चा सुरू असल्याचे मैदानावरून थेट चित्र दिसत आहे. ‘दव’ (Dew) फॅक्टर आणि खेळपट्टीवरील गवताचा अंदाज घेत अंतिम ‘प्लेइंग ११’ ची जुळवाजुळव सुरू आहे.
हवामान खात्याकडून आलेली सर्वात ताजी आणि दिलासादायक अपडेट म्हणजे, सध्या मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे परिसरात लख्ख ऊन पडलेलं आहे. आकाशात ढगाळ वातावरण अजिबात नाही. त्यामुळे आज पावसामुळे षटकं कमी होण्याचा कोणताही धोका नाही. चाहत्यांना आज विनाअडथळा पूर्ण ४० षटकांचा थरार अनुभवता येणार आहे.
सध्याची सर्वात मोठी अपडेट म्हणजे, भारतीय खेळाडूंचा ताफा त्यांच्या हॉटेलमधून वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात टीम इंडियाची बस मरीन ड्राईव्हवरून स्टेडियमच्या दिशेने निघाली आहे. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह अगदी आत्मविश्वासाने बसमध्ये चढताना दिसले. अवघ्या काही मिनिटांतच दोन्ही संघ त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचतील.
मैदानावरील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या सामन्याचे मैदानी पंच (Umpires) आणि मॅच रेफ्री यांनी नुकतीच खेळपट्टीची अंतिम पाहणी केली आहे. खेळपट्टीवरील हेवी रोलर आता बाजूला काढण्यात आला आहे. खेळपट्टीवर अगदी हलकं गवत सोडण्यात आलंय, ज्यामुळे सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये जोफ्रा आर्चर आणि बुमराहच्या चेंडूंना चांगला बाऊन्स मिळण्याची स्पष्ट शक्यता आहे.
सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार असला तरी, वानखेडे स्टेडियमचे दरवाजे (Gates) प्रेक्षकांसाठी अधिकृतपणे उघडण्यात आले आहेत. तीन टप्प्यांच्या कडेकोट सुरक्षा तपासणीनंतर चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात आहे. आतमध्ये आतापासूनच ‘इंडिया… इंडिया…’च्या घोषणा घुमायला सुरुवात झाली असून, स्टेडियम खचाखच भरायला सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, तिथून थोड्याच वेळात टीम इंडियाची बस वानखेडे स्टेडियमकडे रवाना होईल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात हा नवा तरुण संघ उपांत्य फेरीत कसा खेळतो, हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
हा सामना पाहण्याची क्रेझ इतकी मोठी आहे की, अधिकृत तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सर्व तिकिटे ‘सोल्ड आऊट’ (Sold Out) झाली होती. तरीही अनेक चाहते स्टेडियमबाहेर या आशेने उभे आहेत की ऐनवेळी कुणीतरी त्यांना तिकीट देईल. तिकिटांचे भाव ब्लॅकमध्ये गगनाला भिडल्याचीही जोरदार चर्चा स्टेडियमबाहेर ऐकायला मिळत आहे.
उपांत्य फेरीचा हा महासंग्राम आणि स्टेडियमवर होणारी लाखो चाहत्यांची गर्दी पाहता, मुंबई पोलिसांनी वानखेडे परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. चर्चगेट आणि मरीन ड्राईव्हकडे जाणारे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, चाहत्यांना सुरळीत प्रवेश मिळावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे.
सामना सुरू व्हायला अजून काही तास शिल्लक असले, तरी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमबाहेर क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात सगळीकडे फक्त ‘टीम इंडिया’च्या निळ्या जर्सी घातलेले चाहते दिसत आहेत. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘इंडिया… इंडिया…’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे.
जे चाहते सध्या प्रवासात आहेत किंवा ऑफिसमधून मोबाईलवर सामना पाहणार आहेत, त्यांच्यासाठी ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ (Disney+ Hotstar) ॲपवर या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे, मोबाईल युजर्ससाठी हा उपांत्य फेरीचा सामना हॉटस्टारवर अगदी मोफत (Free) पाहता येणार आहे.
जर तुम्ही स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहू शकत नसाल, तरीही घरबसल्या या अटीतटीच्या सामन्याचा थरार तुम्हाला अनुभवता येणार आहे. या हाय-व्होल्टेज उपांत्य फेरीच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) भारतात ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’च्या (Star Sports Network) विविध चॅनेल्सवर संध्याकाळी ७ वाजल्यापासून पाहता येईल. सोबतच स्टार स्पोर्ट्सच्या प्रादेशिक वाहिन्यांवर मराठीतूनही कॉमेंट्री ऐकता येईल.
खेळपट्टीवर थोडं गवत मुद्दाम सोडण्यात आलंय, जे सुरुवातीच्या षटकांमध्ये जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळवण्यासाठी मदत करेल. पण रात्री ८ नंतर मुंबईत मोठ्या प्रमाणावर दव (Dew) पडण्याचा स्पष्ट अंदाज आहे. दव पडल्यास चेंडू ओला होऊन गोलंदाजांच्या हातातून निसटू शकतो. त्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी (चेसिंग) करण्याचाच सुरक्षित निर्णय घेईल.
वानखेडेची खेळपट्टी आज गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणार की फलंदाजांसाठी नंदनवन? मैदानावर काम करणाऱ्या क्युरेटरकडून आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वानखेडेची लाल मातीची खेळपट्टी फलंदाजीसाठी एकदम ‘पाटा’ (Flat) असणार आहे. इथे चेंडू बॅटवर अगदी सहज येतो आणि बाउंड्री लाईन छोटी असल्यामुळे आज प्रथम फलंदाजी करणारा संघ २०० पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा करण्याची दाट शक्यता आहे.
वेगवान गोलंदाजांसोबतच आज दोन जादुई फिरकीपटूंमध्येही मोठी चुरस असेल. कुलदीप यादवने आपल्या ‘चायनामॅन’ गोलंदाजीने नेहमीच इंग्लंडच्या फलंदाजांना सतावलं आहे. दुसरीकडे, आदिल रशीदने मधल्या षटकांत विकेट्स काढण्यात हातखंडा मिळवला आहे. आज वानखेडेच्या लाल मातीवर कुणाची फिरकी जास्त वळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दुखापतीतून सावरल्यानंतर जोफ्रा आर्चरने आपला जुना वेग आणि लय पुन्हा पकडली आहे. सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्येच संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासारख्या फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीरांना बाद करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार ब्रूक नक्कीच आर्चरचा शस्त्रासारखा वापर करेल. आर्चरच्या सुरुवातीच्या स्पेलवर भारताची धावगती अवलंबून असेल.
टी-२० फॉरमॅटमध्ये बुमराहचा इकॉनॉमी रेट आणि त्याची अचूकता नेहमीच फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरते. शेवटच्या षटकांमध्ये (Death Overs) त्याच्याविरुद्ध धावा काढणं भल्याभल्या फलंदाजांना जमत नाही. आज सॅम करन आणि लियाम डॉसनसारख्या स्फोटक फलंदाजांना अखेरच्या षटकांत रोखण्याची सर्वात मोठी जबाबदारी बुमराहच्याच खांद्यावर असेल.
आजच्या महासंग्रामात खरी टक्कर जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर या दोन जगातल्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये आहे. या दोघांनाही आयपीएलमध्ये ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळल्यामुळे वानखेडेच्या खेळपट्टीचा इत्थंभूत अंदाज आहे. बुमराहचे अचूक यॉर्कर इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवणार, की आर्चरचा वेगवान बाऊन्सर टीम इंडियाला धक्के देणार, यावरच फायनलचं तिकीट ठरणार आहे.
मायकेल वॉनने टीम इंडियाच्या आणखी एका कच्च्या दुव्यावर बोट ठेवलं आहे. या विश्वचषकात भारताने आतापर्यंत तब्बल १३ कॅचेस सोडले आहेत, जे सर्व संघांमध्ये सर्वात जास्त आहेत. यावर बोलताना वॉनने टोला लगावला की, “इंग्लंडची फिल्डिंग आणि विकेट्समधील धावणं एकदम ‘टॉप क्लास’ आहे. नॉकआऊट सामन्यांमध्ये अशा छोट्या चुकाही महागात पडतात.” त्यामुळे आज भारतीय खेळाडूंना फिल्डिंगमध्ये जीव ओतून खेळावं लागणार आहे.
सुनील गावस्कर यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक सध्या भयंकर आक्रमक खेळतोय. त्याला रोखण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवला सुरुवातीलाच जसप्रीत बुमराहचा योग्य वापर करावा लागेल. गावस्कर म्हणतात, “बुमराहला सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्येच गोलंदाजीला आणणं अत्यंत गरजेचं आहे. बुमराह विरुद्ध ब्रूक हाच आजच्या सामन्यातील सर्वात निर्णायक क्षणांपैकी एक असेल.”
दुसरीकडे, भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला इंग्लंडच्या एका विशिष्ट खेळाडूपासून सावध राहण्याचा गंभीर इशारा दिला आहे. गावस्करांच्या मते, “इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स हा सध्या तुफान लयीत आहे. जर वानखेडेवर थोडी जरी फिरकी मिळाली, तर तो भारताची झोप उडवू शकतो.” या विश्वचषकात जॅक्सने तब्बल ४ वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब पटकावला आहे. संजू सॅमसन आणि सूर्या त्याला कसे सामोरे जातात, यावरच आजच्या सामन्याचा निकाल ठरेल, असं गावस्कर म्हणाले.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने या उपांत्य फेरीपूर्वी एक अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना वॉन म्हणाला, “सध्या इंग्लंडची फिरकी गोलंदाजी भारतापेक्षा जास्त घातक आहे.” वॉनने स्पष्टच सांगितलंय की, भारताचा प्रमुख फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आता महागडा ठरत असून, इंग्लंडचे आदिल रशीद, लियाम डॉसन आणि विल जॅक्स हे तिघे या विश्वचषकातील सर्वोत्तम स्पिनर्स आहेत. त्यामुळे आज वानखेडेवर इंग्लंडच बाजी मारेल, अशी ठाम भविष्यवाणी वॉनने केली आहे.
दुसरीकडे, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी या विश्वचषकात एक मोठा बदल केला आहे. गंभीरने स्पष्ट केलंय की तो क्रिकेटमधील ‘डेटा’वर विश्वास ठेवत नाही, तर तो ‘इन्स्टिंक्ट’ला (Instinct) महत्त्व देतो. त्यामुळे आज वानखेडेवर परिस्थितीनुसार आणि खेळपट्टीच्या अंदाजानुसार सूर्या अचानक काही धक्कादायक निर्णय घेताना दिसू शकतो.
भारताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने या स्पर्धेत आतापर्यंत १२ विकेट्स घेतल्या आहेत. ब्रूकनेही वरुणची ताकद मान्य करत म्हटलंय की, “वरुण हा सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. पण मी त्याच्याविरुद्ध जास्तीत जास्त धावा लुटण्याचा नक्की प्रयत्न करेन.” त्यामुळे आज वानखेडेवर वरुणची फिरकी चालते की ब्रूकची बॅट, हे पाहणं अत्यंत चुरशीचं ठरेल.
यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडने अनेक सामने संघर्ष करून जिंकले आहेत. यावर बोलताना ब्रूकने टीम इंडियाला सूचक इशारा दिला आहे. “आम्हाला सामना जिंकण्यासाठी ‘परफेक्ट’ खेळण्याची अजिबात गरज नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीतून सामना फिरवू शकतो,” असा ठाम विश्वास ब्रूकने व्यक्त केला. इंग्लंडच्या या ‘नेव्हर गिव्ह अप’ (Never give up) वृत्तीमुळे आज टीम इंडियाला सावध राहावं लागणार आहे.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे. “यजमान भारताविरुद्ध त्यांच्याच आयकॉनिक मैदानावर (वानखेडेवर) विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळणं, हे आमच्या संघातील अनेक खेळाडूंचं स्वप्न होतं,” असं ब्रूक म्हणाला. भारताला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवण्यासाठी इंग्लंडचा संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे संकेत त्याने दिले आहेत.
डेथ ओव्हर्समध्ये (शेवटच्या षटकांत) वेगाने धावा काढण्याची आणि विकेट्स घेण्याची जबाबदारी हार्दिक आणि सॅम करन या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंवर असेल. हार्दिकचे उत्तुंग फटके आणि करनचे स्लोअर बाऊन्सर्स यांच्यात आज वानखेडेवर जोरदार संघर्ष पाहायला मिळेल.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक यंदाच्या विश्वचषकात भयंकर आक्रमक लयीत आहे. पण जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याला शांत ठेवण्यासाठी सज्ज आहे. ‘यॉर्कर किंग’ बुमराह विरुद्ध ब्रूकचे मोठे फटके, हा आजच्या सामन्यातील सर्वात मोठा आणि निर्णायक ‘एक्स-फॅक्टर’ ठरणार आहे.
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव फिरकी गोलंदाजांना कसा फोडून काढतो हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पण इंग्लंडचा अनुभवी स्पिनर आदिल रशीदकडे त्याला अडकवण्यासाठी खास ट्रॅप असू शकतो. मधल्या षटकांमध्ये जेव्हा हे दोघे आमनेसामने येतील, तेव्हा सामन्याचं पारडं कोणत्याही बाजूला फिरण्याची दाट शक्यता आहे.
संजू सॅमसन सध्या तुफान फॉर्मात आहे, त्याने मागच्याच मॅचमध्ये नाबाद ९७ धावा कुटल्या होत्या. पण आज त्याच्यासमोर जोफ्रा आर्चरच्या वेगवान चेंडूंचं मोठं आव्हान असेल. आयपीएलमध्ये एकत्र खेळल्यामुळे या दोघांनाही एकमेकांचे कच्चे दुवे अचूक माहीत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये ही ‘काटे की टक्कर’ पाहण्यासारखी असेल.
गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२५ मध्ये जेव्हा हे दोन संघ आमनेसामने आले होते, तेव्हा टीम इंडियाने इंग्लंडची अक्षरशः पिसे काढली होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना २४७ धावांचा डोंगर उभा केला होता आणि त्यानंतर इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या ९७ धावांत गुंडाळला होता. भारताने तो सामना १५० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. आज पुन्हा एकदा तशीच वादळी कामगिरी पाहायला मिळेल अशी चाहत्यांना आशा आहे.
आजचा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या मैदानावरील रेकॉर्ड पाहिल्यास दोन्ही संघ अगदी तोडीस तोड वाटतात. वानखेडेवर भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत २ टी-२० सामने झाले आहेत. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकून बरोबरी साधली आहे. त्यामुळे आज या घरच्या मैदानावर टीम इंडिया वर्चस्व गाजवणार की इंग्लंड धक्का देणार, हे पाहणं अत्यंत रंजक ठरेल.
सलग तिसऱ्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हे दोन संघ भिडत आहेत. २०२२ च्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा १० गडी राखून लाजिरवाणा पराभव केला होता. मात्र २०२४ च्या विश्वचषकात भारताने याचा सव्याज बदला घेत इंग्लंडला ६८ धावांनी धूळ चारली आणि स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता. आता २०२६ च्या या ‘टाय-ब्रेकर’ सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
टी-२० क्रिकेटचा एकूण इतिहास पाहिला, तर टीम इंडियाचं पारडं नेहमीच जड राहिलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण २९ टी-२० सामने झाले आहेत. यापैकी तब्बल १७ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर इंग्लंडला केवळ १२ वेळा बाजी मारता आली आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार तरी आजच्या सामन्यात भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला असेल.
चाहत्यांची धाकधूक वाढवणारी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे, मुंबईत आज हवामान पूर्णपणे क्लिअर आहे. त्यामुळे ओव्हर्स कट होणार नाहीत. पण जर अचानक काही गडबड झालीच, तर आयसीसीने उपांत्य फेरीसाठी ‘रिझर्व्ह डे’ आणि जास्तीचा १२० मिनिटांचा वेळ राखून ठेवला आहे.
सुपर-८ मध्ये सलग ३ सामने जिंकून इंग्लंडने इथवर धडक मारली आहे. त्यांचा कर्णधार हॅरी ब्रूकने आतापर्यंत २२८ धावा कुटल्या आहेत.
संभाव्य संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), फिल सॉल्ट, विल जॅक्स, जेकब बेथेल, सॅम करन, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि टॉम बँटन.
IND vs WI सामन्यात संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची जी वादळी खेळी केली होती, त्यामुळे तो आज नक्कीच सलामीला येऊ शकतो.
संभाव्य संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.
सध्या दुपारचे १ वाजत आहेत आणि सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नाणेफेक ६:३० वाजता होईल आणि तेव्हाच १०० टक्के खात्रीशीर प्लेइंग ११ समोर येईल. खोटा सस्पेन्स नको, पण तज्ज्ञांच्या मते आज दोन्ही संघांमध्ये कोणते संभाव्य खेळाडू उतरतील याची पक्की यादी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत २९ सामने झाले आहेत. यापैकी १७ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर १२ सामन्यांत इंग्लंडने बाजी मारली आहे. वानखेडे मैदानावर मात्र या दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध आतापर्यंत एक-एक सामना जिंकून बरोबरी साधली आहे.
सुपर-८ च्या शेवटच्या ‘करा किंवा मरा’ सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला धूळ चारून उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात संजू सॅमसनने ५० चेंडूंत नाबाद ९७ धावांची वादळी खेळी केली होती. त्याचा हाच जबरदस्त फॉर्म आज जोफ्रा आर्चर आणि इंग्लंडच्या इतर गोलंदाजांना घाम फोडण्यासाठी निर्णायक ठरू शकतो.
वानखेडे स्टेडियमची लाल मातीची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी उत्तम मानली जाते. इथे चेंडू बॅटवर चांगला येतो, त्यामुळे आज धावांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र, दुसऱ्या डावात दव (Dew) पडण्याची शक्यता असल्यामुळे नाणेफेक (Toss) जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता हा थरार सुरू होईल. सलग तिसऱ्या टी-२० विश्वचषकात हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत भिडत आहेत. २०२२ मध्ये इंग्लंडने तर २०२४ मध्ये भारताने बाजी मारली होती. त्यामुळे आज कोण जिंकणार याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय.