Aditya Thackeray | ये डर अच्छा है; सिनेट निवडणुकांवरून आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारनं मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूका अचानक रद्द केल्या आहे. रातोरात या निवडणुका रद्द करण्यात आल्यामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.
तर या मुद्द्यावरून ठाकरे गटानं राज्य सरकारला चांगलं धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. भीतीपोटी मिंधे-भाजप सरकारनं या निवडणुका रद्द केल्या असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Yeh Dar Achcha Hai – Aditya Thackeray
ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले, “मिंधे-भाजप सरकारनं त्यांच्या बेकायदेशीर आणि भ्रष्ट राजवटीसाठी जनतेचा जनादेश गमावला आहे. मात्र, ये डर अच्छा है.
The Mindhe-BJP regime is so scared of elections in Maharashtra that they have suddenly cancelled the Mumbai University Senate Elections for the Graduate Constituency!
We are pretending to be a democracy, under an illegal regime with no mandate from the citizens. pic.twitter.com/bOhzrJpXJt
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 18, 2023
परंतु लोकशाही रद्द करणं हे आपल्या देशासाठी चांगलं नाही. देशभक्त म्हणून आम्ही या राजवटीचा सामना करणार आहोत. मिंधे-भाजप सरकार निवडणूकांना एवढं घाबरलेलं आहे की त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका रद्द केल्या.”
All in all, they mindhe-bjp knows they have lost the mandate of the people for their illegal and corrupt regime.
Yeh Darr Achcha Hai.
But cancelling democracy, isn’t good for our country.
We patriots will fight this regime.— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 18, 2023
दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले, “राज्य सरकारने अचानक या निवडणुका रद्द केल्या आहे.
मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण सध्याचं सरकार कोणत्याच निवडणुका घ्यायला तयार नाही. परंतु सरकार किती निवडणुका रद्द करेल?
उद्या भीतीपोटी ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देखील रद्द करतील का? सरकारनं भीतीपोटी सिनेट निवडणुका रद्द केल्या आहे.
या निवडणुकांसाठी आमची पूर्ण तयारी झालेली होती. आम्ही या निवडणुका जिंकू म्हणून राज्य सरकारनं या निवडणुका रद्द केल्या आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक; म्हणाले, “तोडफोड करून…”
- Narendra Modi | पेट्रोलचा दर होणार स्वस्त? महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारची मोठी योजना
- Bacchu Kadu | “छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रिपद…”; बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी
- Jitendra Awhad | “अरे पळकुट्या, नाव तर…”; जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
- Sanjay Raut | मविआचं जागा वाटप सूत्र ठरलं? संजय राऊतांचा मोठा खुलासा