Share

Sanjay Raut | भाजप वर्ल्ड कप जिंकण्याच्या थाटात होता – संजय राऊत

🕒 1 min readSanjay Raut | मुंबई: आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बड्या लोकांनी हजेरी लावली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.  … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई: आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बड्या लोकांनी हजेरी लावली.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.  भारतीय जनता पक्ष वर्ल्ड कप जिंकण्याच्या थाटात होता, असं म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपला धारेवर धरलं आहे.

Indian team has played very well – Sanjay Raut

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, “भारतीय संघ अत्यंत उत्तम खेळला आहे. ते हरले असले तरी आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये खेळण्याची जिद्द होती.

त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या दुःखात मी ( Sanjay Raut ) सहभागी आहे. भारतीय संघावर मी ( Sanjay Raut ) वैयक्तिक टीका करणार नाही. मात्र, भारतीय जनता पक्ष विश्वचषक जिंकण्याच्या थाटात होता.

भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला असता तर आनंद झाला असता. परंतु भारतीय जनता पक्षाकडून या सामन्यासाठी जे राजकारण करण्यात आलं होतं, जी व्यवस्था करण्यात आली होती, त्यावर दुर्दैवाने पाणी फिरलं आहे.

कपिल देव यांनी भारतीय संघाला सर्वप्रथम विश्वचषक जिंकून दिला होता. परंतु, काल झालेल्या सामन्यासाठी कपिल देव आणि त्यांच्या संघाला आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.

कारण कपिल देव त्या ठिकाणी उपस्थित असते तर इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं, याला म्हणतात राजकारण.

ज्या प्रकारचे क्रिकेटच्या पडद्यामागे राजकारण सुरू आहे, त्याच्यावर या देशात भविष्यामध्ये नक्की चर्चा होईल. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. त्याचबरोबर दिल्लीला क्रिकेटचा माहोल असतो.

क्रिकेटचे मोठे अंतिम सामने मुंबईतच होतात, आतापर्यंत अशी देशात परंपरा होती. परंतु, यांना मुंबईतून सगळच गुजरातला खेचून न्यायचं आहे. उद्योगधंद्यांसह क्रिकेटही यांना गुजरातला घेऊन जायचं आहे. त्यांच्या या ओढतानीमुळे ही गडबड झालेली दिसते.”

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!