Share

Ambadas Danve | फक्त माफी मागून चालणार नाही तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला हवा – अंबादास दानवे

🕒 1 min readAmbadas Danve | मुंबई: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आहे.Related News for Youजयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला मास्टरप्लॅन… एका झटक्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?‘लाडकी बहीण योजना … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ambadas Danve | मुंबई: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला आहे.

या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आहे.

जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असं, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

Who exactly ordered the lathi attack? – Ambadas Danve

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “01 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला झाला. या हल्ल्याचे आदेश नेमके कोणी दिले होते? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या घटनेची जबाबदारी घ्यायला तयार नाही.

ज्यांनी हा आदेश दिला आहे, त्यांच्यावर सखोल कारवाई व्हायला हवी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणानंतर जाहीर माफी मागितली होती.

मात्र, जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे तरुण पेटलेले आहे.

त्यांना इतर समाजाचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हे आंदोलन थांबवायचं असेल, तर वटहुकूम काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासाठी कायदा आणला पाहिजे.”

पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन सध्या खूप तीव्र झालं आहे. हे आंदोलन शांततेत व्हावं, अशी आमची इच्छा आहे.

या आंदोलनामध्ये जनतेला इजा होऊ नये, असं आम्हाला वाटत आहे. मात्र, वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून सरकार हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

परंतु, मराठा समाज आता कुणालाच ऐकणार नाही. मराठा समाजाच्या या भूमिकेला शिवसेनाने (ठाकरे गट) पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, असं सरकार म्हणतं असतं. मग मराठा हिंदू नाहीये का? मराठ्यांवर लाठी चार्ज करणं चालतं का? सरकारचं हे नेमकं कोणतं हिंदुत्व आहे?”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!