Shivsena | मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. त्यामुळे आता या सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवलेल्या शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी सत्यजित तांबे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“त्यांनी सध्या निष्ठा कमी आणि निसटणे जास्त आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तांब्याचे पितळ होईल, हे लक्षात ठेवा. त्यांचे नाव जरी सत्यजित असले, तरी हे लोक त्यांना या निवडणुकीत पाडतील” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
“2014 साली निवडणूक प्रचारासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी 27 सभा घेतल्या होत्या. एवढ्या सभा कोणत्याही पंतप्रधानांनी घेतल्या नव्हत्या. इतक्या सभा घेऊनही नरेंद्र मोदी यांच्या छाताडावर बसून उद्धव ठाकरे यांनी 63 आमदार निवडून आणले होते. आमचे प्रबोधनकार म्हणायचे, दारूची नशा जाते, मात्र सत्तेची नशा जात नाही” असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
“शुभांगी ताई तुमच्या नावात शुभ आहे आणि उद्या आमच्या सोबत शुभ होणार आहे. 75 वर्षात गॅसची किंमत कधी बारशे रुपये झाली नव्हती”, असे सांगत अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Narendra Modi | “मधल्या काळात डबल इंजिन सरकार नव्हतं म्हणून मुंबई, महाराष्ट्राचं नुकसान”- नरेंद्र मोदी
- Narendra Modi | “मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता द्या”; पंतप्रधान मोदींचे आवाहन
- Devendra Fadanvis | “काही लोकांच्या बैईमानीमुळे डबल इंजिनचे सरकार पडले”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Bhaskar Jadhav | “… तेव्हा मोदींनी मुंबईची विशेष काळजी घेतली नव्हती अन् आता निवडणुका…”- भास्कर जाधव
- Ravikant Tupkar | “सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उर्फीच्या कपड्यांची जास्त काळजी”