Devendra Fadnavis | शेकापच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई : शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील (Dharyashil Patil) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर धैर्यशील पाटील यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कौतुक केलं आहे.

“धैर्यशील पाटील हे चांगले वक्ते आहेत, तसंच प्रत्येक गोष्टीचा ते सखोल अभ्यास करतात. मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न घेऊन माझ्याकडे ते आले होते जनतेत राहून जनतेची कामं करणं यासंदर्भातलं त्यांचं सातत्य महत्त्वाचं आहे. धैर्यशील पाटील भाजपत असले पाहिजेत असं आम्हाला वाटत होतं आणि त्यांचा प्रवेश झाल्याने आम्हाला आनंद होतो आहे”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया (Devendra Fadnavis’s Reaction)

“धैर्यशील पाटील हे फक्त राजकारणासाठी राजकारण करणारे नाहीत. तर समाजाचं हित समोर ठेवून राजकारण करणारे आहेत. आपले प्रश्न धडाडीने धैर्यशील पाटील मांडत असत. धैर्यशील पाटील यांनी कायमच समाजाभिमुख राजकारण केलं. तळगाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो”

“आज देशाचं नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांचं नेतृत्त्वही असाच विचार करणारं आहे. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की धैर्यशील पाटील यांनी पक्ष बदलला असला तरीही त्यांचा विचार बदललेला नाही. त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचा गमछा धैर्यशील पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतला. रायगड पालीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि शेकापचे दिलीप भोईर यांनी यापूर्वी भाजपत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता धैर्यशील पाटील हे देखील भाजपत आले आहेत. त्यामुळे रायगडमधला शेतकरी कामगार पक्ष कमकुवत झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.