Shivsena | “आमच्या बाजूने निर्णय नाही लागला तर रक्तपात…”; ठाकरे गटाचं वादग्रस्त वक्तव्य

Shivsena | चंद्रपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते यांनी शरद कोळी (Sharad Koli) खळबळजनक विधान केले आहे. शरद कोळी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

“आमच्या बाजूने निर्णय नाही लागला तर रस्त्यावर रक्तपात”

“सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल. आमचा आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा मोदी-शाह, शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे”, असे धक्कादायक वक्तव्य शरद कोळी यांनी चंद्रपुरात केले आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याच दरम्यान शरद कोळी हे खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

“सत्तेवर बसलेली माकडं आहेत” 

“सत्तेवर बसलेली माकडं आहेत आणि ती विकली गेली आहेत असे सांगत न्याय मिळाला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, रक्तपात झाला तरी चालेल”, अशी टोकाची भूमिका शरद कोळी यांनी मांडली आहे. ‘शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देखील आम्हालाच मिळावे’, अशी मागणीही केली आहे.

“आमचा विश्वासघात झाला असून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळाले पाहिजे सोबतच एकनाथ शिंदे यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे”, असेही शरद कोळी यांनी मागणी केली आहे.

‘न्याय आमच्याच बाजूने लागेल’- Sharad Koli 

‘न्याय आमच्याच बाजूने लागेल’, असे म्हणत शरद कोळी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर सडकून टीका केली आहे. चंद्रपूर येथे बोलत असतांना शरद कोळी यांनी केलेले विधान बघता नवा वाद उभा राहील अशी स्थिती आहे. थेट न्यायालयावर शरद कोळी यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे वाद उभा राहू शकतो.

महत्वाच्या बातम्या-