Share

Eknath Shinde | “अविश्वास प्रस्ताव मांडून विरोधकांनी स्वतःचं वस्त्रहरण…”; मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार घडत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं घेरलं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकावर जोरदार टीका केली आहे. हा प्रस्ताव मांडून विरोधकांनी स्वतःच वस्त्रहरण केलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Published On: 

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार घडत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं घेरलं आहे.

या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकावर जोरदार टीका केली आहे. हा प्रस्ताव मांडून विरोधकांनी स्वतःच वस्त्रहरण केलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय.

खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे.

त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. कॉंग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे.”

The people of the country have repeatedly distrusted the opposition –  Eknath Shinde

पुढे ते (Eknath Shinde) म्हणाले, “देशातील जनतेने विरोधकांवर वारंवार अविश्वास दाखवलाय. २०१४ आणि २०१९ मध्ये सामान्य नागरिकांचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरील प्रगाढ विश्वास दिसून आला. २०२४ साली तो वृद्धिंगत होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.

भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत.

ते अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही