Chitra Wagh | थोडी तरी लाज बाळगा; चित्रा वाघांचा राहुल गांधींवर घणाघात
Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मणिपूर मुद्द्यावरून भाजप सरकारला धारेवर धरलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामुळं मणिपूर उध्वस्त होत आहे. त्याचबरोबर भाजप सरकारनं मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस सरकारच्या पापांची यादी खूप मोठी असल्याचं चित्र वाघ यांनी म्हटलं आहे.
The list of sins of Congress governments is long – Chitra Wagh
चित्रा वाघ (Chitra Wagh ) यांनी ट्विट करत राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “राहुल गांधी हे सांगा..
1975 : आणीबाणी लागू झाली, मग भारतमातेची हत्या कोणी केली?
1984 : शीख दंगलीत निष्पाप लोक मारले गेले, मग भारत मातेची हत्या कोणी केली?
1990: गिरिजा टिक्कूचा गळा करवतीने कापला, मग भारत मातेची हत्या कोणी केली?
26/11: दहशतवादी हल्ला झाला, 164 लोक मारले गेले, मग भारत मातेची हत्या कोणी केली?
2012 : निर्भयावर अत्याचार करून हत्या करण्यात आली, मग भारत मातेची हत्या कोणी केली?
काँग्रेस सरकारांच्या पापांची यादी मोठी आहे. पण मग राहुल गांधी गप्प का होते? थोडी तरी लाज बाळगा!
राहुल गांधी ये बताऐं ….@RahulGandhi
1975: आपातकाल लागू किया गया, तब भारतमाता की हत्या किसने की ?
1984: सिख दंगों में मासूम लोग मारे गए, तब भारतमाता की हत्या किसने की ?
1990: गिरीजा टिक्कू का गला आरी से काट दिया, तब भारतमाता की हत्या किसने की ?
26/11: आतंकी हमला हुआ, 164…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2023
दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “भाजपच्या राजकारणामुळं माणिपूर उध्वस्त झालं आहे. भारत आपला आणि आपल्या जनतेचा आवाज आहे.
त्या आवाजाची भाजप सरकारनं मणिपूरमध्ये हत्या केली आहे. त्याचबरोबर या सरकारनं मणिपूरमध्ये भारत मातेची देखील हत्या केली आहे.
जोपर्यंत मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात, मी असचं समजणार आहे. भारतीय सैन्य एका दिवसात मणिपूरची परिस्थिती नियंत्रणात आणू शकते. मात्र, मोदी सरकार या गोष्टी करायला तयार नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi | “मोदींनी मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या…”; राहुल गांधीजी मोदी सरकारवर बोचरी टीका
- Sharad Pawar | शरद पवारांना आणखी एक मोठा झटका! बड्या नेत्याचा राष्ट्रवादीला रामराम
- Narendra Modi | शरद पवारांना काँग्रेसमुळे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही – नरेंद्र मोदी
- Devendra Fadnavis | “… म्हणून काही लोक रोज पत्र लिहितात”; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला
- Sharad Pawar | “आपण आज ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व…”; हरी नरकेंच्या निधनानंतर शरद पवारांची भावून पोस्ट