📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

Sambhajiraje Chhatrapati | अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाही – संभाजीराजे छत्रपती

🕒 1 min readSambhajiraje Chhatrapati | मुंबई: गेल्या महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. सत्तेत सामील होताच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.Related News for You‘लाडकी बहीण’ योजनेचं नाव बदलणार? अजितदादांच्या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sambhajiraje Chhatrapati | मुंबई: गेल्या महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. सत्तेत सामील होताच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

The three parties in power will not stay together in the future – Sambhajiraje Chhatrapati

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, “अजित पवार मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाणार, असं अनेक लोक म्हणतात.

मात्र, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही, हे मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो. भारतीय जनता पक्ष ज्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करत होता त्यांनाच ते आता सोबत घेऊन बसले आहे.

सध्या सत्तेत असलेले तिन्ही पक्ष भविष्यात एकत्र राहणार नाही. कारण हे तिन्ही पक्ष फक्त लोकसभेसाठी एकत्र आले आहे. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जातील.”

यावेळी बोलत असताना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं.

त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारण्याचं देखील भाजपनं सांगितलं होतं. मात्र, त्या स्मारकाचं जलपूजन होऊन नऊ वर्ष उलटून गेली आहे. मात्र नरेंद्र मोदी सरकारनं अद्याप त्यावर काम सुरू केलेलं नाही. ते स्मारक अजून पर्यंत पूर्ण का झालेलं नाही?”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!