Uddhav Thackeray | मुंबई : राज्यात भाजप-शिवसेनेचं (BJP-Shiv Sena) सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणानंतर खबरदारी म्हणून उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी, नेते, आमदार, खासदार यांना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर येतेय.
याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फोन टॅपिंगचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे म्हणाले की, “याबाबत पक्षाकडून अधिकृत सूचना नाही. मात्र अनेकदा बोलताना चुकून चार चौघात एखादा शब्द निघून जातो. त्यामुळे रेकॉर्डिंग होते आणि त्याचा मोठा विषय बनवला जातो.”
“आत्ताच्या घडीला ज्याप्रमाणे राजकारण सुरू आहे, त्यानुसार आपापली सुरक्षा घेण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षातील प्रमुख लोकांनी आयफोन (I-Phone) वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांना दिल्या आहेत”, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सरकारचं जाणीपूर्वक सर्व हालचालींवर लक्ष असतं. आताचं सरकार कोणत्याही स्तराला जावू शकते. हे सरकार छोट्या-छोट्या शिवसैनिकांना त्रास देत आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास नसल्याचं अंबादास दानवे म्हणालेत. सरकार गैरफायदा घेऊ शकतं म्हणून अशा सूचना आम्ही देत असतो, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Makeup Remover | चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी दुधाचा ‘या’ प्रकारे करा वापर
- Ajit Pawar | “केंद्राला सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रातूनच, मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’”
- Family Vacation | फॅमिली सोबत सुट्टीवर जाण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम पर्याय
- Shubhangi Patil | काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याच्या आरोपावर शुभांगी पाटलांचं स्पष्ट वक्तव्य
- Ajit Pawar | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ दाव्यावर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “राजकीय द्वेषातून…”