Uddhav Thackeray – चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा…; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

Uddhav Thackeray  – बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिला. जे काही मिंधे सत्तेसाठी लाचार होऊन ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मिंध्यांनी स्वतः मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तसेच आता हे कोणाला जोडे मारहाण किंवा स्वतःच जोड्याने आपलं तोंड फोडून घेणार आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे.

भारतीय जनता पक्षाची कीव येते की, एका बाजूला मोहन भागवत मशिदीत गेले होते. दुसरीकडे बाबरी पाडल्याचेही म्हणतात. यांचे हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? भाजपने हे स्पष्ट करावे. भाजपकडे कधीही शौर्य नव्हते. बाबरी पाडली तेव्हा मुंबईत दंगली झाल्या तेव्हा शिवसेना सत्तेत नव्हती. तेव्हा मुंबई शिवसैनिकांनी आणि शिवसेना प्रमुखांनी वाचवली. गुजरात अहमदाबादमध्ये जे घडलं त्यात पोलिसांचा वापर केला गेला. मुंबई पोलीस आणि लष्कर शिवसैनिकांना मारत होते. काही दर्ग्यांचे रक्षणसुद्धा शिवसैनिकांनी केले आहे.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे

काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

“६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल नेहमीच बोलत असतात, पण मनात खरचं प्रश्न पडतो की ते त्यावेळी अयोध्येतही होते का?”

महत्वाच्या बातम्या

Exit mobile version