पोहरादेवी : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी पोहरादेवी याठिकाणी डेरेदाखल आहेत. पोहरादेवी व संत सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर राज्य राठोड काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं.
हजारोंच्या संख्येने राठोड समर्थक जमा झाले असून पोलिसांना जमावाला आवर घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून त्यांची पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत.
पूजा चव्हाण हिच्याशी संबंधित अरुण राठोड याच्या संदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न करताच संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या चौकशीकडे बोट दाखवत अधिक बोलणे टाळले. ‘मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या चौकशीच्या तपासामध्ये सर्व बाहेर येईल. मला बाकी काही माहित नाही,’ असं भाष्य संजय राठोड यांनी केलं आहे.
संजय राठोड यांनी आरोप फेटाळले !
‘पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूने बंजारा समाजाला दुःख झाले आहे. मी देखील चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे काही राजकारण सुरु आहे ते अतिशय घाणेरडं आहे. माझ्यावर होणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे,’ असं देखील संजय राठोड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत’
- अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात, एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका – संजय राठोड
- गेल्या काही दिवसांमध्ये घाणेरडं राजकारण सुरु आहे – संजय राठोड
- डॉक्टर असूनही औषधाचा प्रचार कसा करता ? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना ‘आयएमए’ने फटकारले
- स्वतः शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचं ट्रेंड राजकारणात सुरु झालाय; चित्रा वाघ यांचा घणाघात