मुंबई : दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकूण सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्लीमध्ये काल 6 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याची माहीती मिळाली अन् राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरूनच भाजपने यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘दिल्ली पोलिस येऊन मुंबईतली आतंकवादी पकडत आहेत. मग आपली पोलिस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीये का ?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी केला होता. यावर आता राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
‘अशा रीतीने ताईंची बौद्धिक पातळी किती सुमार दर्जाची आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्र द्वेषाने ह्या ताईंना एवढं पछाडलं आहे की हे दहशदवादी दिल्लीत पकडले असताना त्यांना महाराष्ट्रात पकडलं असल्याचं बरळत आहेत. व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईंनी उद्यापासून बदामाचा खुराक चालू करावा म्हणजे बुद्धीला लागलेला गंज कमी होऊन त्यांच्या डोक्याला योग्य ती चालना मिळेल.’ असे ट्वीट करून चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
अशा रीतीने ताईंची बौद्धिक पातळी किती सुमार दर्जाची आहे हे दिसून येत आहे. महाराष्ट्रद्वेषाने ह्या ताईंना एवढं पछाडलं आहे की हे दहशदवादी दिल्लीत पकडले असताना त्यांना महाराष्ट्रात पकडलं असल्याचं बरळत आहेत.
व्हाटसऍप युनिव्हर्सिटीच्या या टॉपर ताईंनी— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 15, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ऊस तोडणी कामगारांनी ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं, युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
- भाजप-संभाजी ब्रिगेड युतीची चर्चा; संतोष शिंदे म्हणाले, ‘वैचारिक लढा चालूच राहील,परंतु…’
- जम्मू काश्मीर पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित; पर्यटन संचालकांनी दिली माहिती
- तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती