मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आज शिवसेने(Shivsena)चे नेते रामदास कदम(Ramdas Kadam) यांच्या पत्रकार परिषदेत उफाळून आले आहेत. रामदास कदम परिवहन मंत्री अनिल परबांना हरामखोर म्हणाले आहेत. रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अक्षरश: अनिल परब यांच्या बापाचाही उल्लेख केला आहे. हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे.
रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील वाद आता उघड वाद सुरू होण्याची शक्यता आहे. ‘अनिल परब यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. हवा गेली. त्यांचे पाय जमिनीवर नाही. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ‘या हरामखोराला आवरा’, असेही रामदास कदम म्हणाले आहेत. या सर्व प्रकरणावर भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास कदम यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे, असे निलेश राणे म्हणाले आहेत. रामदास कदम यांनी राणेंवर टीका करण्याचे काम केले कारण त्यांना ‘मातोश्री’तून बक्षीस हवे होते. रामदास कदम ते विरोधी पक्षनेते पद मिळवले आणि ते पद फक्त राणेंना शिव्या घालण्यासाठीच होते आणि आज त्यांची शिवसेनेमध्ये ना घर का ना घाटका अशी अवस्था झाली, असे निलेश राणे म्हणाले आहेत.
रामदास कदम आणि त्यांचा मुलगा आता कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांची किंमत शून्य आणि ती त्यांनीच करून घेतली आहे. राजकारणात खोट बोलून जास्त काळ टीकता येत नाही, हे रामदास कदम यांना आता कळून चुकले असेल, असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेत गद्दार दुसरं तिसरं कोणी नसून फक्त रामदास कदमच महागद्दार’
- रामदास कदमांच्या टीकेवर अनिल परबांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘हे हारमखोर, बेईमानी मंत्री राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांसोबत मला आणि शिवसेनेला संपवण्याचा घाट घालत आहेत’
- अमित शहांचा महाराष्ट्र दौरा; सहकार वाचवण्यासाठी सांगितला नवा प्लान
- सहकार क्षेत्रात जो पक्षपात होतोय, त्यात मी मूकदर्शक बनून राहू शकत नाही- अमित शहा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<