मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिंदे सरकारची सर्वांत पहिली मोठी घोषणा म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. सरकारने पेट्रोलवरील कर कमी करत सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनतर दुसरी मोठी घोषणा म्हणजे आता नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे. यानंतर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी म्हणले कि, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन एक घोषणा केली आहे. सरपंच आणी नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार आहे. थेट लोकांमधून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडावा असे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जर वाटत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील जनतेतून निवडला गेला पाहिजे, असं म्हणत मिटकरी यांनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार केले आहे.
दरम्यान, देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. मात्र आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Ashok Chavan | पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत करा – अशोक चव्हाण
- Maharashtra Cabinet : शिंदे, फडणवीसांची सावध भूमिका, 19 तारखेला दोन्ही बाजूचे प्रत्येकी 4 मंत्रीच शपथ घेणार?
- Sanjay Raut | शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडली आहे – संजय राऊत
- Uddhav Thackeray : लढाईला तयार राहा, शिवसेना मजबूत हे दाखवून द्या; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
- Sadabhau Khot | “…मंत्री मंडळात वाडप्यांची गरज नाही” – सदाभाऊ खोत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<