Saturday - 25th June 2022 - 9:40 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी, अशोक चव्हाण यांची मागणी

by MHD News
Friday - 8th January 2021 - 6:38 PM
ashok chavhan मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी अशोक चव्हाण यांची मागणी
FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी इंद्रा साहनी प्रकरणाच्या निवाड्यातील ५० टक्क्यांची मर्यादा आणि १०२ व्या घटना दुरूस्तीचा राज्य सरकारांच्या अधिकारांवरील परिणाम आदी संवैधानिक व न्यायालयीन बाबींवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक पद्धतीने बाजू मांडावी, असे आवाहन मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. एसईबीसी आरक्षणाच्या खटल्यातील संवैधानिक पेच केंद्र सरकारच्या पातळीवरच सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असून, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील खासदारांनीही पंतप्रधानांची भेट घ्यावी, यादृष्टीने आपले प्रयत्न असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, २५ जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात एसईबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडेलच. सोबतच केंद्र सरकानेही अनुकूल भूमिका घेण्याची गरज आहे. मागील सुनावणीत घटनापिठाने केंद्र सरकारच्या अॅटर्नी जनरलला नोटीस दिली आहे. यानिमित्ताने मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारला आपली सहकार्याची भूमिका स्पष्ट करण्याची संधी मिळाली आहे.

सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना केंद्राने इंद्रा साहनी प्रकरणाचे पुनराविलोकन करण्याची विनंती करावी. कारण मराठा आरक्षणावर अंतरिम प्रतिबंध लागू करताना सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणाचा संदर्भ देत महाराष्ट्रातील आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याचे नमूद केले होते. बहुतांश राज्यातील आरक्षणाचे प्रमाण आज ५० टक्क्यांच्या वरच आहे. त्यामुळे ३० वर्ष जुन्या इंद्रा साहनी निवाड्याचे पुनराविलोकन आवश्यक असून, तो निकाल ९ न्यायमुर्तींनी दिलेला असल्याने त्याचे पुनराविलोकन करण्यासाठी ९ किंवा त्याहून अधिक सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकता चव्हाण यांनी विषद केली.

तामिळनाडूतील आरक्षणाचे प्रमाण ६९ टक्क्यांवर गेले आहे. आर्थिक मागास प्रवर्गाच्या १० टक्के आरक्षणामुळेही आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांवर गेलेले आहे. तरीही त्या दोन्ही आरक्षणाच्या अंमलबजावणीवर कोणतेही प्रतिबंध नाहीत. केवळ मराठा आरक्षणावरच तात्पुरते प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर तामिळनाडू व ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या प्रकरणांसोबत सुनावणी घेण्याची विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला करावी.

सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना आहे की नाही, असा संवैधानिक प्रश्न १०२ व्या घटना दुरूस्तीमुळे निर्माण झाला आहे. अशा संवैधानिक बाबींवर केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्टपणे बाजू मांडावी. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाला तामिळनाडू प्रमाणे घटनेतील नवव्या अनुसूचिचे संवैधानिक संरक्षण प्रदान करण्याची मागणीही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.

एसईबीसी आरक्षण टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपला प्रभाव वापरून केंद्राकडून योग्य पावले उचलली जातील, यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकजूट दाखवून एसईबीसी कायदा तयार केला होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या लढ्यात तीच एकजुटता दाखवण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने येत्या सोमवारी ११ जानेवारीला आपण दिल्लीत वकिलांची बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पहा अशोक चव्हाण यांची संपूर्ण पत्रकार परिषद 

महत्वाच्या बातम्या 

  • ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी , मात्र शरद पवारांनी आपलंसं केलं
  • शिवसेनेच्या खासदाराने केला छत्रपती संभाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख
  • हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार; भाजप नेत्याची बोचरी टीका
  • नाशिकमध्ये यंदाचे मराठी साहित्य संमेलन, भुजबळ यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
  • कंगनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोप धुडकावले !

ताज्या बातम्या

bjpbarredeknathshindefrombecomingcmsanjayraut मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी अशोक चव्हाण यांची मागणी
Editor Choice

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजपने रोखलं – संजय राऊत

National Executive meeting मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी अशोक चव्हाण यांची मागणी
Maharashtra

Shiv Sena : राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शिवसेनेने केले ‘पाच’ महत्वपूर्ण ठराव मंजूर

Uddhav Thackeray challenges rebellious MLAs मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी अशोक चव्हाण यांची मागणी
Maharashtra

Uddhav Thackeray : “हिमंत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावावर मतं मागा”, उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आव्हान

Atul Bhatkhalkar criticizes Sanjay Raut मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी अशोक चव्हाण यांची मागणी
Maharashtra

Atul Bhatkhalkar : “ज्यांना सत्ता सांभाळता आली नाही त्यांनी…”, फडणवीसांना दिलेल्या सल्ल्यानंतर भातखळकरांचा राऊतांना टोला

महत्वाच्या बातम्या

Chandrakant Khaires reaction after the meeting at Sena Bhavan अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या भाजपची मागणी
Aurangabad

Chandrakant Khaire : सेनाभवनातील बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रीया

Shiv Sainik aggressive MP Shrikant Shindes office was blown up अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या भाजपची मागणी
Editor Choice

Shrikant Shinde : शिवसैनिक आक्रमक! खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

bjpbarredeknathshindefrombecomingcmsanjayraut अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या भाजपची मागणी
Editor Choice

Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यापासून भाजपने रोखलं – संजय राऊत

Shinde Saheb came to Maharashtra Deepali Sayyeds reaction अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या भाजपची मागणी
Editor Choice

Deepali Syyed : “शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात येऊन… ” ; दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया

rebels are giving MLAs opium and marijuana from meals Sanjay Raut allegation अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या भाजपची मागणी
Editor Choice

Sanjay Raut : बंडखोर आमदारांना जेवणातून अफू आणि गांजा देत आहेत ; संजय राऊतांचा आरोप

Most Popular

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या भाजपची मागणी
Editor Choice

Aditya Thackeray : शिवसेनेचे मोठे नेते बैठकीला गैरहजर, आदित्य ठाकरेंचाही समावेश

Legislative council election Many BJP MLAs in touch with me Eknath Khadse suggestive statement अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या भाजपची मागणी
Editor Choice

Legislative council election : “भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात पण…” ; एकनाथ खडसेंचे सुचक वक्तव्य

Topic over Sanjay Rauts tweet Towards dismissal of Vidhan Sabha अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या भाजपची मागणी
Editor Choice

Sanjay Raut tweet : विषय संपला! संजय राऊतांचे ट्वीट, “विधान सभा बरखास्तीच्या दिशेने…”

Uddhav Thackeray and Eknath Shindes pair of Shriram Laxmana will remain Deepali Syed अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या भाजपची मागणी
Editor Choice

Deepali Sayyad : उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंची श्रीराम लक्ष्मणाची जोडी कायम राहील – दिपाली सय्यद

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA