सांगोला : भाजप नेते किरीट सोमय्या सतत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे -पवार सरकार म्हणजे अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळेबाज सरकार असल्याची टीका केली आहे.
ठाकरे-पवार सरकार राज्याला लुटण्याचे काम करीत आहे. सांगोला साखर कारखान्यासह घोटाळ्यांची प्रकरणे आपल्याकडे आली असून, या सर्व घोटाळ्यांचा पाठपुरावा आपण करणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. तेयेथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान यावेळी त्यांनी राज्यातील अनेक मंत्र्यांच्या चौकशा सध्या सुरू असल्याचे म्हटले आहे. अनेक मंत्री सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. सध्याच्या ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री फरार आहेत, कमिशनर परदेशात गेले आहेत, पोलिस अधिकारी अटकेत आहेत. हे सरकार आहे की माफिया आहे, असा प्रश्न करून अनेक नेत्यांनी कारखाने लुटण्याचे काम केले असून, पवारांच्या घरात सर्वांचीच बेनामी मालमत्ता असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार