मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण 40 आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. उद्धव ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी ती मागणी अमान्य केल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून काढल्यानंतर त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली. मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा आदेश धुडकावला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदार सोबत घेऊन वेगळा गट स्थापन केला. यानंतर राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मोठी खळबळ उडवून दिली. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा शिंदेंनी केली. तसेच श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
यावर एका चर्चासत्रात पत्रकार प्रसन्न जोशी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवसैनिकांच्या कानाला झोंबेल. पण तांत्रिक दृष्टीने एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख आहेत. ते उद्धव ठाकरेंच्या आदेशाला धुडकावत असतील तर विधीमंडळ शिवसेना पक्ष प्रमुख हे एकनाथ शिंदे ठरतता, हे लक्षात घ्या, असे प्रसन्न जोशी म्हणाले.
संजय राऊतांचे विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची परिस्थिती विधानसभा बरखास्त करण्याकडे वाटचाल करत आहे, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात, असे मानले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना महाराष्ट्राच्या आमदारांनी आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकल्याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काझीरंगा हे पर्यटनासाठी चांगले ठिकाण आहे. तिथेही चांगला पाऊस पडतोय. ज्यांना निसर्ग बघायचा आहे ते तिथे जाऊ शकतात.
प्रत्यक्षात शिवसेना 15, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 44, इतर 16 असे फक्त 128 आमदार महाविकास आघाडी सरकारकडे उरले आहेत. म्हणजेच उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात येऊ शकते. दुसरीकडे भाजपकडे 106, एकनाथ शिंदे गट 40 आणि इतर 13 असे मिळून आता भाजप प्लससह एकूण 159 आमदार असतील. म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :