Supriya Sule | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण करून देत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली.
याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरविलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Sudhir Mungantiwar | “शिवरायांच्या जगदंबा तलवारीसह वाघनखंही महाराष्ट्रात आणणार”; सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
- Ajit Pawar on Karnataka CM | “तक्रार काय करता? आरे ला का रे उत्तर द्या” ; अजित पवारांचा मंत्र्यांना सल्ला
- Eknath Shinde | स्वतः एकनाथ शिंदेच म्हणाले, “राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”
- IND vs BAN | खराब फॉर्ममुळे ‘हे’ खेळाडू होऊ शकतात प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
- Akkalkot | “…अन्यथा कर्नाटकात जाणार” ; अक्कलकोटमधील 11 गावांचा ठराव! ग्रामस्थांचा सरकारला इशारा