टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी शेतीच्या उपसा सिंचन योजनांवरील थकीत कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. यासाठी लागणारा आर्थिक खर्च आणि शेतकऱ्यांची संख्या याचा अहवाल विभागाने सादर करावा, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीसंदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत सूचना दिल्या.
शेतकरी कर्जमाफीबाबत आढावा घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनात झालेल्या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासह सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजीव कुमार मित्तल आदी उपस्थित होते.
शेतीसाठीच्या उपसा सिंचन योजनांचे कर्ज थकल्याने अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, असे सहकार मंत्री देशमुख यांनी या बैठकीत सांगितले. त्या अनुषंगाने हा निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच काही जिल्ह्यात शेतकऱ्यांना सहकारी संस्थांच्या धर्तीवर शेतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या जुन्या पैसा बँका या वित्तपुरवठा संस्था आहेत. सहकारी संस्थासारख्याच काम करीत असूनही नावात बँकेच्या उल्लेखामुळे कर्जमाफी योजनेत या संस्थातून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी योजनेचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांची यादी तालुकास्तरावर सहकारी संस्था सहायक निबंधकांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या मात्र लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन तालुकास्तरीय समितीने करावे, असे निर्देश सहकारमंत्री देशमुख यांनी दिले.
कर्जमाफी योजनेंतर्गत सन २०१५ -२०१६ मध्ये नियमित कर्ज भरलेल्या मात्र त्यानंतर सन २०१६-२०१७ मध्ये कर्जफेड न केलेल्या शेतकऱ्यांनाही नियमित कर्जफेडीच्या अनुषंगाने प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा विचार करण्यात यावा, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली.
- Sanjay Raut : “…अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा”, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना सल्ला
- Aditya Thackeray : “युवासैनिकांनो, आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता…”, आदित्य ठाकरेंचे आवाहन
- Draupadi Murmu : “अवघ्या 15 मिनिटांपूर्वी मोदींनी फोन करून…”, द्रौपदी मुर्मू यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Devendra Fadnavis : “ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
- Sanjay Raut : “आमदार-खासदार फोडून सरकारे बनविली…”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<