मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणेंचे वर्चस्व पहावयास मिळाले. आता या निवडणुकीवरूनच शिवसेना खासदार संजय राऊत(Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्गात बँकेवरील वर्चस्वासाठी खुनाखुनी झाली व जिल्ह्यातील आमदारांना पलायन करावे लागले, याची नोंद इतिहासात राहील. कोकणात आजही लोक भुताखेतांच्या गोष्टीत रमतात, पण त्या अनेकदा भाकडकथाच असतात. एका जिल्हा बँकेवर विजय मिळवताच राज्यात सत्ता परिवर्तन होईल, अशी बोंब मारणे यास भाकडकथा नाही म्हणायचे तर दुसरे काय? मानगुटीवर बसलेली भुते उतरवणारे निष्णात लोकही त्याच कोकणात आहेत, हे काय भाजपवाल्यांना माहीत नाही? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचे या भागातील प्रमुख कार्यकर्ते व निवडणुकीचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर निर्घृण खुनी हल्ला झाला. नशीब बलवत्तर म्हणून परब वाचले. या खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आमदार पुत्र नितेश राणे संशयित आरोपी असून ते फरारी आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. याचा अर्थ असा की, पोलिसांकडे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे आहेत. न्यायालयाने ते मान्य केले. आता याचदरम्यान जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली व त्यांचे निकालही लागले. निकाल नारायण राणेकृत भाजपच्या बाजूने लागला. १९ पैकी ११ जागांवर भाजपच्या सिद्धिविनायक पॅनलने निर्विवाद बहुमत मिळविले. शिवसेनेसह महाविकास आघाडीस ८ जागा मिळवता आल्या. म्हणजे निवडणुकीत घासून टक्कर झाली व निसटता पराभव किंवा निसटता विजय झाला. तरीही भाजपचे पॅनल’ जिंकले. ११ विरुद्ध ८ हा निकाल यास दणदणीत विजयही म्हणता येणार नाही व दारुण पराभवही म्हणता येणार नाही. राज्यातील ३१ जिल्हा बँकांपैकी ज्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. त्या-त्या ठिकाणी टप्याटप्प्याने निवडणुका होत आहेत. मात्र, एक सिंधुदुर्ग सोडले तर निवडणुका पार पडलेल्यापैकी कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही.नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत साताऱ्यातील दोन राजे मडळांत शाब्दिक चकमकी झडल्या व निवडणुकीचे वातावरण तापले, पण सिंधुदुर्गप्रमाणे तेथे तलवारी, बदुका निघाल्या नाहीत. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
विरोधकांना धमकावणे, अपहरण करणे, खुनी हल्ले करणे,विरोधकांच्या बाबतीत अश्लील, असंसदीय भाषेचा वापर करण्याचे प्रकार सिंधुदुर्ग वगळता अन्यत्र कुठे झाले नाहीत.उदयनराजे शिवेंद्रराजे यांच्यात जिल्हा बँकेच्या निमित्ताने शाब्दिक जुगलबंदी झाली, पण रंगतदार ठरली. रंगतदार काहीच जे घडते रक्तरंजित असते, इतिहास एकाच व्यक्तीभोवती फिरत असतो. श्रीधर भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर हे राजकीय नरबळीच आहेत. नरबळी कसे गेले यासाठी केंद्रीय एखादी ‘एसआयटी’ नेमायला हवी. भारतीय पक्षानेही सिंधुदुर्गात याच दहशती हल्ल्यांचा पुरेपूर स्वाद पण हेच लोक खाटीकखान्यात बसून झोडत आहेत. सिंधुदुर्गात भाजपने १९ पैकी ११ जागा निवडणुकीत जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने तीन काठोकाठ गमावल्या. म्हणजे पहा, कणकवली उत्पादक संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. भाजपचे विठ्ठल देसाई होते. या मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना समान १७-१७ अशी मते मिळाली. टाकून निकाल घेण्यात आला चिठ्ठी सावंत यांच्याविरोधात गेली. त्यात भाजपचे देसाई विजयी ठिकाणीही महाविकास आघाडीचे उमेदवार थोडक्यात पडले. जिल्हा बँक राण्यांनी जिंकली हे सत्यच आहे. बँकेचा आणि महाराष्ट्राच्या सत्तेचा काही संबंध आहे काय? पण जिल्हा बँकेत जागा “आता अशी आरोळी केंद्रीय राणे यानी ठोकली. बँकेचे पॅनल जिंकल्याने महाराष्ट्रासारख्या राज्यात होतो, वेगळेच अकलेचे गणित यानिमित्ताने समजले. जिल्हा जिंकली म्हणजे जणू जागतिक बँकेवरच असे भाजप पुढान्यांना वाटत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली, तशा ३१ बहुसंख्य जिल्हा सहकारी बँकावर महाविकास आघाडीचाच ताबा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राणे यांनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरू झाली. गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी यावर चांगला टोला मारला आहे.”पूर्वी गावच्या जत्रेत नारळावरच्या आणि बत्ताशावरच्या कुस्त्या व्हायच्या. ती कुस्ती जिंकायची आणि हिंद केसरीला लढत दिली, असे सांगायचे. हा केविलवाणा प्रयत्न आहे,” अर्थात सिंधुदुर्गात जे खासदारकीला, आमदारकीला पराभूत झाले त्यांना जिल्हा बँकेचा विजय हा नवटाक चढल्यासारखाच वाटणार, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा विजय मिळताच आता मुंबईची महानगरपालिकाही जिंकू, असे काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केले. एकंदरीत एका जिल्हा बँकेच्या विजयाने भाजपला नवे वर्ष साजरे करण्याची संधीच प्राप्त झाली. जिल्हा बँका म्हणजे ग्रामीण भागाचे अर्थकारण करणाऱ्या नाड्या आहेत. शेतकरी, कष्टकरी लोकांना याच जिल्हा बँकांचा मोठा आधार असतो. सहकार चळवळीतून महत्त्वाचे कार्य करणारी संस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पहायला हवे. जिल्हा बँकांमुळेच संकटकाळातही ग्रामीण भागाचे अर्थचक्र सुरू असते. महाराष्ट्रात सहकाराचा जो पाया भक्कम आहे, तो जिल्हा सहकारी बँकांमुळेच. राज्यातील 31 जिल्हा सहकारी बँका आपापल्यापरीने ग्रामीण भागात काम करतात. निवडणुकांच्या माध्यमातून बँकांचे नेतृत्व केले जाते. त्यात काही चूक आहे असे वाटत नाही, पण सिंधुदुर्गात बँकेवरील वर्चस्वासाठी खुनाखुनी झाली व जिल्ह्यातील आमदारांना पलायन करावे लागले, याची नोंद इतिहासात राहील. भारतीय जनता पक्षाला वसतीत नाचायला व दुखात रडायला भाडोत्री लोक लागतात. असे लोक मिळाले की, ते आनंदाने बेहोश होतात. सिंधुदुर्गात तेच घडले. असा दावाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मी अजित दादांचा फॅन’; भाजप आमदाराने कौतुक करताच राष्ट्रवादीची ऑफर
- पहिल्या किसान रेल्वेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
- ओमायक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; जाणून घ्या काय म्हणाले AIIMS चे संचालक
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<