Wednesday - 18th May 2022 - 9:33 AM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र

by MHD News
Sunday - 28th November 2021 - 8:00 AM
sanjay raut विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र

sanjay raut comments on bjp

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला, तो दिवस होता २८ नोव्हेंबर २०१९. दरम्यान, आज महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली असून त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेलाच घेतलेल्या शपथविधी सोहळ्यासही दोन वर्षे झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक मधून या दोन वर्षांतील राजकीय बदल सांगितले आहेत. तसेच विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच वेळी श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पहाटेच घेतली त्या सोहळ्यासही दोन वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री ठाकरे सध्या पाठीच्या दुखण्यामुळे इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे, पण दोन वर्षांत प्रकृती बिघडली आहे ती राज्यातील विरोधी पक्षाची. सरकारला दोन वर्षे झाली त्यानिमित्ताने श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ठाकरे सरकार आता लवकरच पडेल!’ म्हणजे तारखा देण्याच्या फंदातून व छंदातून भाजप अद्यापि बाहेर पडलेला नाही. ठाकरे सरकार पडणार व पुन्हा आम्ही शपथ घेणार, असे श्री. पाटील यांना वाटत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त त्यांनी इतकेच स्पष्ट केले पाहिजे की, नव्या सरकारचा शपथविधी ते मध्यरात्री करणार की पहाटे? हेच पाटील काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यकारिणीत म्हणाले होते, ‘सरकार पडेल व आम्ही सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षाने आता बाहेर पडले पाहिजे. आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी लागेल.’ तेच पाटील चार दिवसांत ठाकरे सरकार पडेल असे छातीठोकपणे सांगतात.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे हे गेल्या दोन वर्षांत सगळय़ांना पुरून उरले आहेत. गेल्या दोन वर्षांत ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी व कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी कोणतीच कसर सोडली नाही. ज्याला राजकारणात ‘बिलो द बेल्ट’ म्हटले जाते ते सर्व कमरेखालचे वार करूनही सरकार कायम आहे. विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय ती पहा.
1) भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप पुराव्याशिवाय करणे व फक्त धुरळा उडवणे. ते उद्योग आजही सुरूच आहेत.
2) सुशांतसिंह राजपूतसारख्या प्रकरणांना राजकीय रंग देऊन ठाकरे कुटुंब व सरकारला बदनाम करणे. या प्रकरणात कारण नसताना सीबीआयला घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्ततेवर पहिला प्रहार विरोधी पक्षाने केला.
3) महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याची व खाकी वर्दीचे खच्चीकरण करण्याची एकही संधी विरोधी पक्षाने सोडली नाही.
4) महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार, बलात्कार होतात असे चित्र निर्माण केले व राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून राज्यावर चिखलफेक केली.
5) परमबीर सिंह यांना ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून फडणवीस सरकारच्याच काळात नेमण्यात आले. कल्याण-डोंबिवली-ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी परमबीर हे अथक परिश्रम घेत होते. इतर पक्षांची माणसे फोडून त्यांचा भाजपात प्रवेश व्हावा यासाठी ते त्या काळात घेत असलेले कष्ट काय होते ते एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी सांगतील. तेच परमबीर पुढे मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. (राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक म्हणूनही त्यांना फडणवीस सरकारनेच नेमले.) सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणात हे महाशय सहज फरारी झाले. परमबीर यांनी राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप केले. त्यामागचे बोलवते धनी कोण हे स्पष्ट झाले आहे.
6) फरारी परमबीर यांच्या आरोपांवर अनिल देशमुख यांना ‘ईडी’ने तुरुंगात टाकले. एकनाथ खडसे यांचे जावईदेखील अटकेत आहेत.
7) शिवसेनेचे आमदार, खासदार यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धमकाविण्यात येत आहे.
8) कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या जावयांना खोट्या प्रकरणात ईडीने तुरुंगात टाकले. या प्रकरणाचे सूत्रधार अधिकारी वानखेडे यांना विरोधी पक्षाने पाठबळ दिले.
9) आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे व शरद पवारांच्यावर खोटे आरोप केले. पवारांच्या आप्तांवर इन्कमटॅक्सच्या धाडी घातल्या.
10) महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱयांचा संप चिघळविण्यासाठी विरोधी पक्षाने घेतलेले कष्ट अवर्णनीय आहेत. अमरावतीत जातीय दंगे भडकवून वातावरणात तणाव निर्माण केला.
हे सर्व प्रताप घडवूनही भाजपला सरकारवर साधा चरोटाही पाडता आला नाही. कारण भाजप जे करीत आहे ते राजकारण नसून वैफल्यातून फुटलेल्या कपट-कारस्थानांचे कोंब आहेत. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी जे कमावले ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावले. सत्ता हेच सर्वस्व असेच मानून त्यांची पावले पडत गेली व सत्ता गमावली या धक्क्यातून ते दोन वर्षांनंतरही सावरू शकले नाहीत, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

  • …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
  • ‘मी अनकम्फर्टेबल होतो’ म्हणत सुनील शेट्टीच्या मुलाने सांगीतला ‘तो’ अनुभव !
  • ‘किरीट सोमय्या यांना महत्व देण्याची गरज नाही’
  • २४ महिन्यांतील मविआचे १०० घोटाळे, किरीट सोमय्यांनी केले उघड
  • ‘या’ दोन सुपरस्टारसोबत रोहित शेट्टी करणार का काम?

ताज्या बातम्या

Atul Bhatkhalkar विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
Maharashtra

“सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?”, अतुल भातखळकरांचा महाविकास आघाडीला सवाल

P Chidambaram विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
India

११ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणासंदर्भात CBI ने घेतली पी. चिदंबरम यांची झडती

sanjay raut विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
Editor Choice

आजची मुंबईतली सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे – संजय राऊत

महत्वाच्या बातम्या

Atul Bhatkhalkar विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
Maharashtra

“सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?”, अतुल भातखळकरांचा महाविकास आघाडीला सवाल

P Chidambaram विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
India

११ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणासंदर्भात CBI ने घेतली पी. चिदंबरम यांची झडती

sanjay raut विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad win by 3 runs विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!

IPL 2022 MI vs SRH Sunrisers Hyderabad batting inning report विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
Editor Choice

IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!

Most Popular

IPL 2022 indian premier league Teams captions failed this season विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
IPL 2022

IPL 2022 : कॅप्टनच ठरले व्हिलन! यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वात खराब कामगिरी; वाचा!

विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
Editor Choice

केतकी चितळे कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही – सदाभाऊ खोत

IPL 2022 CSK vs MI Mumbai Indians win by 5 wickets विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
Editor Choice

IPL 2022 CSK vs MI : ना तुला ना मला..! मुंबईनं चेन्नईला ढकललं स्पर्धेबाहेर; वानखेडेवर ५ गड्यांनी हरवलं!

Praveen Darekar arrested and released in bogus labor case विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय संजय राऊतांचे टीकास्त्र
Editor Choice

बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकरांना अटक आणि सुटका!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA