Sunday - 26th June 2022 - 4:54 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरेंनी…”, संजय राऊत यांचे टीकास्त्र

by MHD News
Sunday - 8th May 2022 - 9:27 AM
raj thackeraysanjay raut फुले विरुद्ध टिळक वादावर संजय राऊत यांचे भाष्य

“हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरेंनी...", संजय राऊत यांचे टीकास्त्र

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात महात्मा फुले विरुद्ध लोकमान्य टिळक असा वाद चांगलाच पेटून उठलेला दिसत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून भाष्य केले आहे. रायगडावरील शिवरायांची समाधी कोणी शोधून काढली यावर इतिहास चिवडण्याचे काम काहींनी सुरू केले आहे. तसेच हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरे यांनी संभाजीनगरातील सभेत लावला. त्यात तितकेसे तथ्य नाही, असेही राऊत म्हणाले.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरे यांनी संभाजीनगरातील सभेत लावला. त्यात तितकेसे तथ्य नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजीराजांच्या समाधीचा रायगडावरून शोध लावला याबाबत एकमत आहे, पण त्याबाबत दोन भिन्न प्रवाह आहेत व दोन्ही प्रवाहांचा आदर करणे हेच योग्य आहे. 1869 साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड किल्ल्यावरील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला. शिवरायांची समाधी तेव्हा भग्नावस्थेत होती. शिवराय नावाचे तुफान त्या भग्न समाधीत शांतपणे पहुडले होते. ते तुफान पुन्हा उठल्याशिवाय गुलामगिरीत खितपत पडलेल्या तरुणांना प्रेरणा मिळणार नाही हे फुले यांनी ओळखले व त्यांनी शिवरायांची समाधी जगासमोर आणली.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘धनंजय कीर यांनी महात्मा फुले यांचे चरित्र लिहिले. त्यात ते सांगतात, ”महात्मा फुले हे भारताच्या सामाजिक क्रांतीचे पितामहच होते. फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडचा दौरा केला. त्यांच्या मनात शिवाजीराजांच्या कार्याविषयी व संघर्षाविषयी सन्मान होता. रायगडावर जाऊन ते या महान राजांची समाधी शोधू लागले. सुकलेली पाने व दगडांच्या ढिगाखाली गाडलेली ही समाधी त्यांनी शोधून काढली.” त्यानंतर शिवरायांच्या शौर्यावर पोवाडा लिहिला, इतकेच नव्हे तर, रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्जही महात्मा फुलेंनी केला होता’, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

  • “फुले विरुद्ध टिळक हा वाद निरर्थक, शिवराय महाराष्ट्रात जन्मले हेच…”, संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
  • IPL 2022 PBKS vs RR : राजस्थान इज बॅक..! वानखेडेवर पंजाब किंग्जला हरवलं; मुंबईकर खेळाडू चमकला!
  • IPL 2022 : “आई फक्त तुझ्यासाठी…” स्पेशल जर्सी घालून मैदानात उतरले लखनऊचे खेळाडू; पाहा VIDEO!
  • IPL 2022 LSG vs KKR : केएल राहूल शून्यावर OUT..! लखनऊचं कोलकाताला १७७ धावांचं आव्हान
  • IPL 2022 LSG vs KKR : लखनऊ ऑन टॉप..! कोलकाताचा तब्बल ७५ धावांनी उडवला धुव्वा

ताज्या बातम्या

The rebels will not be allowed to return to the Vidhan Bhavan Aditya Thackerays serious warning फुले विरुद्ध टिळक वादावर संजय राऊत यांचे भाष्य
Editor Choice

Aditya Thackeray : बंडखोरांना परत विधानभवनाची पायरी चढू देणार नाही; आदित्य ठाकरेंचा गंभीर इशारा

Raosaheb Danve फुले विरुद्ध टिळक वादावर संजय राऊत यांचे भाष्य
Maharashtra

Raosaheb Danve : “राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून…”, रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

Uday Samant फुले विरुद्ध टिळक वादावर संजय राऊत यांचे भाष्य
Maharashtra

Uday Samant : शिवसेना नेते उदय सामंत नॉट रिचेबल?; राजकीय चर्चांना उधान

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads2022062cb75e60f18e0ba7daa396ad9e74fd61jpg फुले विरुद्ध टिळक वादावर संजय राऊत यांचे भाष्य
Editor Choice

Aditya Thackeray : “पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण…”; आदित्य ठाकरे यांचा बंडखोरांना टोला

महत्वाच्या बातम्या

https://maharashtradesha.com/wp-content/uploads/2022/06/noname-3.png
Editor Choice

Ram Satpute : राऊतांच्या धमक्यांना भीक न घालता उदय सामंत गुवाहाटीला रवाना – राम सातपुते

did-arundhati-leave-the-series-where-does-mom-do-what
Entertainment

‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीने मालिका सोडली?

You call me stupid dumb but I Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
Editor Choice

Kirit Somaiya : “तुम्ही मला तोतरा, बोबड्या म्हणा, पण मी…” ; किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका

The rebels will not be allowed to return to the Vidhan Bhavan; Aditya Thackeray's serious warning
Editor Choice

Aditya Thackeray : बंडखोरांना परत विधानभवनाची पायरी चढू देणार नाही; आदित्य ठाकरेंचा गंभीर इशारा

Raosaheb Danve
Maharashtra

Raosaheb Danve : “राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून…”, रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

Most Popular

sanjay raut
Maharashtra

Sanjay Raut : “आम्ही हार मानणार नाही ज्यांना…”, संजय राऊतांचा इशारा

Invisible force is working to overthrow the government - Mahesh Tapase
Editor Choice

Mahesh Tapase : सरकार पाडण्यासाठी अदृश्य शक्ती काम करत आहे – महेश तपासे

"The Election Commission is capable of making decisions"; Reaction of Dilip Walse Patil
Editor Choice

“निवडणूक आयोग निर्णय घेण्यास सक्षम आहे ” ; दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

Speaking about Eknath Shides revolt Ajit Pawar remembered the morning swearing in ceremony said
Editor Choice

Ajit Pawar : एकनाथ शिदेंच्या बंडासंदर्भात बोलताना अजित पवारांना आठवला पहाटेचा शपथविधी, म्हणाले…

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA