Rohit Pawar | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. अशातच बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यांनतर विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला आहे.
“वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही?” असा प्रश्न रोहित पवार यांनी शिंदे सरकारला विचारला आहे.
वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी #कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 7, 2022
तसेच “रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?”, असा प्रश्नही रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
“महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू…करू… केंद्राशी बोलू…ही मुळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही”, अशा शब्दात रोहित पवारांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sudhir Mungantivar | ‘शिंदे सरकार नामर्द आहे’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर; म्हणाले,
- Chandrashekhar Bawankule | “षंढ, मर्दानगी, रेडे…राऊत जेलमधून ‘ही’ भाषा शिकून आले”; बावनकुळेंचा खोचक टोला
- Health Care Tips | रात्री कोमट पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Sanjay Raut | “हे नामर्द सरकार…” ; संजय राऊतांची शिंदे – फडणवीस सरकारवर जहरी टीका
- Health Care Tips | कोमट पाण्यामध्ये तूप मिसळून आंघोळ केल्याने मिळू शकतात शरीराला ‘हे’ फायदे