Ravi Rana | अमरावती : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे.
अशातच उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून मशाल यात्रा काढण्यात आली. त्यावेळी खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी रवी राणा यांच्यावर जातप्रमाण पत्रावरून टीका केली होती. त्या टीकेवर रवी राणा यांनी जोरदार पलटवार केला आहे.
“अरविंद सावंत यांनी काल जो मोठा पराक्रम केला त्यावेळी मोजून ३५ ते ४० लोक होते. या मूठभर लोकांच्या समोर एका खासदाराने बोलावं अशी त्यांची गत झाली आहे. अरविंद सावंत यांच्या टीकेला गंभीरतेने घेण्याची गरज नाही”, असा खोचक टोला रवी राणा यांनी अरविंद सावंत यांना लगावला आहे.
काय म्हणाले होते अरविंद सावंत?
“गोरा गोमटा वरवंटा लोक रंगाला बघून बोलतात, हा वरवंटा सगळ्यांच्या डोक्यावरून फिरतो, तरी कुणाला कळत नाही. जात प्रमाणपत्र खोटे असतानाही अजूनही अटक झाली नाही, शेवटी कोर्टाने पोलिसांना विचारले तुम्ही मॅनेज झालात का? हे दुर्दैवच आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | “जज साहब तारीख तो मिल रही पर इंसाफ…”; अंबादास दानवे यांची सत्तासंघर्षावर खोचक प्रतिक्रिया
- Ajit Pawar | राष्ट्रवादीत अमोल कोल्हे नाराज? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले…
- IND vs SL | इशान किशनला संघात स्थान न दिल्याने माजी खेळाडू संतापला, म्हणाला…
- Sanjay Raut | “सरकारमधल्या अतिशहाण्या मंत्र्यांनी कान कोरून…”; मुनगंटीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार
- Rose Water | हिवाळ्यामध्ये गुलाब जलाने चेहरा कसा स्वच्छ करायचा?, जाणून घ्या पद्धती