Share

Maharashtra Rain Update | राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा जोर कायम

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या विविध ठिकाणी परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. राज्यभरात शेतकरी आपली कामे करत असताना शेतीतील कामात अडथळा आता पावसाने निर्माण केला आहे. सध्या परतीच्या पावसाचा काळ चालू असल्याने शेतकरी आपल्या हाता तोंडाशी आलेल्या पिकासाठी चिंतेत आहे. विविध भागात सोयाबीन, कापुस आणि फळबागांना फटका बसत आहे.

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम 

मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम चालू आहे. अशात शेतात सोयाबीन काढणी चालू असताना काढून टाकलेले सोयबीन शेतकऱ्यांना गोळा देखील करता आलेले नाही. मोठ्या प्रमाणात पावसाने सोयाबीन उत्पादकांचे नुकसान केले आहे. कापुस पिक धारकांचे देखील नुकसान सध्या होत आहे.

परभणी, नांदेड, लातूर या भागात मुसळधार पाऊस कोसळलेला आहे. तर विदर्भात बुलढाणा भागात जनजीवन विस्कळीत करण्यासारखा पाऊस झाला आहे.

राज्यात पावसाचा जोर काही भागात कमी झाला असला तरी काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुणे, नाशिक सोलापुर, बुलढाणा या भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.

आजही हवामान खात्याकडून भंडारा, गोंदिया, नागपुर आणि वर्धा जिल्हे सोडून इतर भागात यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिणामी शेतकऱ्यांनी शेतातील कामे करताना काळजी घेण्याची गरज आहे. त्याचबाबरोबर हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या विविध ठिकाणी परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. राज्यभरात शेतकरी आपली कामे करत असताना शेतीतील कामात …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now