नवी-दिल्ली : गुरुवारी(९ डिसें.)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लोकशाही शिखर परिषदेचे उद्घाटन केले. तसेच यावेळी जागतिक स्तरावर लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी भारत भागीदारांसोबत काम करण्यास तयार आहे. लोकशाहीच्या तत्त्वांनी जागतिक प्रशासनाला मार्गदर्शन केले पाहिजे आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी मुक्त आणि लोकशाही समाज जतन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी बोलत असतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,’जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत बहुपक्षीय मंचांसह जागतिक स्तरावर लोकशाही मूल्यांना बळकट करण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांसोबत काम करण्यास तयार आहे.’ तसेच लोकशाही देशांनी त्यांच्या संविधानात अंतर्भूत मूल्ये पूर्ण करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारतीय लोकशाही शासनाचे ४ स्तंभ म्हणून संवेदनशीलता, जबाबदारी, सहभाग आणि सुधारणा यावर भर दिला.
Today, 75 years ago our Constituent Assembly met for the first time. Distinguished people from different parts of India, different backgrounds and even differing ideologies came together with one aim- to give the people of India a worthy Constitution. Tributes to these greats. pic.twitter.com/JfJUFw2ThK
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2021
Today, as we mark 75 years of the historic sitting of our Constituent Assembly, I would urge my young friends to know more about this august gathering’s proceedings and about the eminent stalwarts who were a part of it. Doing so would be an intellectually enriching experience.
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’७५ वर्षांपूर्वी याच तारखेला भारताच्या संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले होते.’ तसेच कायद्याच्या राज्याचा आणि बहुसंख्यक आचारसंहितेचा आदर यासह लोकशाही भावना भारतीय लोकांमध्ये अंतर्भूत आहे,असेही मोदी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दलही जागरूक राहणे महत्वाचे-अमोल कोल्हे
- बिपीन रावत यांच्यासह इतरांवर आज अंत्यसंस्कार; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
- मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांचे रक्षण आवश्यक- शरद पवार