मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुप्रिया सुळे यांनी खास आमंत्रण दिले आहे. झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमांमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी “चंद्रकांतदादा लवकर घरी जेवायला या, तुमचा खास बेत करते” असे जेवणाचे खास आमंत्रण पाटलांना दिले आहे. कार्यक्रमादरम्यान राजकारणापेक्षा घरात लक्ष द्यावे या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना अनोख्या पद्धतीने जेवणाचे आमंत्रण दिले आहे. “मला घरातील काम किंवा स्वयंपाक करायला कधीही कमीपणा वाटत नाही, उलट मला जेवण बनवून खावू घालायला आवडतं. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचं ते विधान मी फार मनावर घेत नाही” असेही सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी बऱ्याच मोठ्या नेत्यांशी अभासीतपणे चर्चा केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच एकनाथ शिंदे यांचेही फोटो दाखवण्यात आले होते. या नेत्यांसोबत आपण कशाप्रकारे बोलू किंवा कशाप्रकारे मत व्यक्त करू याबाबत सुप्रिया सुळे यांनी दाखवले. याचवेळी सुप्रिया सुळे यांना चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी “चंद्रकांतदादा लवकर घरी जेवायला या, खास बेत करते”, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना जेवणाचे आमंत्रण दिले.
यावेळी सुळेंनी चंद्रकांत पाटलांचे कान टोचत त्यांना सादही घातली आहे. “माझ्या मतदारसंघाचा खासदार निधी अडकला आहे. तुमचे आणि मोदीजींचे संबंध चांगले आहेत. तुम्ही त्यांना तो निधी द्यायला सांगा ना, खूप कामं रखडली आहेत”, अशाप्रकारे त्यांनी चंद्रकांत पाटलांचे कान टोचले. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणासाठी मोर्चा काढला होता यावेळी ते बोलताना म्हणाले होते की, सुप्रिया सुळे, तुम्ही घरी जाऊन स्वयंपाक करा, नाहीतर कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर नंतर राजकीय वातावरणात जोरदार वादही रंगला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Abdul Sattar | अर्जुन खोतकर आमच्या सोबत नक्की येणार; अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा
- Sanjay Raut । थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे ?, संजय राऊतांचा राज्यपालांना संतप्त सवाल
- MNS । गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये; मनसेची राज्यपालांना वार्निंग
- NCP । महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
- Bhagat Singh Koshyari | ‘गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’, राज्यपाल कोश्यारींचं वादग्रस्त विधान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<