सिंधुदुर्ग : नवीन पक्ष निर्माण केलेल्या नारायण राणे यांनी मी लवकरच मंत्री मंडळात असेल अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच निर्माण केलेल्या स्वाभिमान पक्षाची १ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन विधानसभा आणि लोकसभेवर निवडणूक लढवणार असल्याच आज कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये असल्याचंही राणेंनी जाहीर केलं.
Loading...
मंत्रीपदावरून राणे म्हणाले दीर्घ काळ वाट पाहण्याची आपल्याला सवय नाही. आपण लवकरच मंत्रिमंडळात असू असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. कोकणात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प जर पर्यावरणाला घातक ठरणारा असेल, तर तो प्रकल्प होऊ देणार नाही, अशीही भूमिका राणेंनी घेतली